शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कसं असेल कोरोनानंतरचं जग?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 8:14 AM

ही नवी व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीयांना आता टाळेबंदी उठण्याचे वेध लागले आहेत. सरकार ३ मेनंतर टाळेबंदी वाढविणार नाही, किमानपक्षी कोविड-१९ आजाराचा फार कहर नसलेल्या भागांमधील टाळेबंदी तरी निश्चित हटविण्यात येईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. एकदा का टाळेबंदी हटली की, आयुष्य पूर्ववत होईल, असेही अनेकांना वाटत असेल. दुर्दैवाने त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही. इतिहासात बीसी आणि एडी या दोन कालदर्शक संज्ञांचा नेहमीच वापर होतो. बीसी म्हणजे बिफोर ख्राईस्ट किंवा ख्रिस्त जन्मापूर्वी आणि एडी म्हणजे अ‍ॅनो डोमिनी किंवा ख्रिस्त जन्मानंतर! यापुढे बीसी (कोविडपूर्व) आणि पीसी (कोविडोत्तर) अशा दोन नव्या संज्ञा प्रचलित झाल्यास आश्चर्य वाटता कामा नये! त्यामागचे कारण हे आहे की, भविष्यातील जग डिसेंबर २०१९ पूर्वीच्या जगासारखे अजिबात नसेल.

कोविड-१९ आजाराला आळा घालण्यासाठी बहुतांश देशांनी टाळेबंदी या उपाययोजनेचा सहारा घेतला आहे; मात्र, ही स्थिती कायमस्वरूपी ठेवली जाऊ शकत नाही. जीव वाचविण्याकरिता टाळेबंदी अनिश्चित काळासाठी जारी ठेवल्यास, आजाराने मरणार नाहीत एवढे लोक उपासमारीने मरण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे आज ना उद्या टाळेबंदी उठवावीच लागणार आहे. मात्र, तसे करताना एक नवी व्यवस्था जन्माला येणार आहे आणि त्या नव्या व्यवस्थेमुळेच उद्याचे जग कालच्या जगापेक्षा खूप वेगळे असू शकते. कोविड-१९ आजारास कारणीभूत नॉव्हेल कोरोना विषाणूला अटकाव करणारी लस शोधण्यात वैज्ञानिकांना अद्याप यश आलेले नाही आणि काही वैज्ञानिकांच्या मते, कदाचित तशी लस कधीच निर्माण होणार नाही. जीवघेण्या एचआयव्ही विषाणूला प्रतिबंध करणारी लस तरी कुठे अजून तयार करता आली आहे? कोरोना विषाणूच्या यापूर्वी सापडलेल्या प्रजातींसाठी तरी कुठे लस शोधता आली आहे? जर कोरोना प्रतिबंधक लस शोधता आली नाही, तर ‘कोविड-१९’चा प्रकोप अधूनमधून होतच राहील व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शारीरिक अंतर पाळणे, स्वत:ला वेळोवेळी निर्जंतुक करून घेणे, वारंवार हात धुणे याला पर्यायच नसेल.शारीरिक अंतर पाळावे लागण्याची मजबुरीच पुढील काळात नव्या व्यवस्थेला जन्म देणार आहे. ही व्यवस्था मानवी समाजाचा संपूर्ण चेहराच बदलणारी असेल. आरोग्य व्यवस्था, उपभोग आकृतिबंध, अर्थव्यवस्था, एवढेच नव्हे तर प्रचलित राजकीय व्यवस्थांवरही त्याचे दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. शारीरिक अंतर पाळण्याच्या मजबुरीपोटी टाळेबंदी उठल्यानंतरही चित्रपटगृहे अथवा नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटकांचा आस्वाद घेणे शक्य होणार नाही. चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करायची झाल्यास किमान दोन आसने आणि दोन रांगांचे अंतर पाळावे लागेल; त्यामुळे तिकिटांचे दर एवढे महागतील की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतील. परिणामी, भविष्यात मनोरंजनाची साधने सामूहिकऐवजी वैयक्तिक असतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये जाऊन चित्रपट, नाटके बघण्याचे दिवस कदाचित भूतकाळात जमा होतील. शारीरिक अंतर पाळायचे झाल्यास सार्वजनिक वाहतूक एवढी महागेल की, ती सर्वसामान्यांना परवडणार नाही आणि त्यामुळे लोकांना कमीत कमी प्रवास करावा लागेल, अशी नवीच व्यवस्था कदाचित जन्माला घालावी लागेल; त्यामुळे घरूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) टाळेबंदीतील तात्पुरती व्यवस्थाच कदाचित उद्याच्या जगातील कायमस्वरुपी व्यवस्था असू शकेल.
निकट भविष्यात क्रीडा क्षेत्रही खूप बदललेले दिसू शकते. विना प्रेक्षकांच्या मैदानात सामने हेच कदाचित क्रीडा क्षेत्राचे भविष्य असू शकते. आजवर विकसित पाश्चात्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या वर्चस्वाच्या जोरावर जगावर मजबूत पकड बनवून ठेवली होती. मात्र, कोरोना आपत्तीसमोर त्यांनी सपशेल हार पत्करल्याचे चित्र दिसत आहे, तर तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशांनी या आपत्तीला खूप चांगल्या प्रकारे तोंड दिले आहे; त्यामुळे भविष्यात पाश्चात्य देशांची जगावरील पकड चांगलीच ढिली होऊन नवी जागतिक व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कदाचित प्रत्यक्षात या सगळ्याच गोष्टी घडणारही नाहीत. कदाचित काही घडतील, काही घडणार नाहीत किंवा काहीतरी वेगळेही घडेल; पण एक मात्र निश्चित, की कोविडोत्तर जग हे कोविडपूर्व जगासारखे असणार नाही!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या