शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Editorial: संपादकीय: भडका आणि होरपळ अन् घसरता रुपया; एक गोष्ट केंद्राच्या नक्कीच हातात आहे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 08:36 IST

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चलनवाढ अथवा महागाईचा दर गत आठ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचला आहे.

महागाईचा चांगलाच भडका उडाला आहे. सर्वसामान्य माणूस त्यामध्ये पुरता होरपळून निघत आहे. कोविड-१९ महासाथ हे काळेकुट्ट दु:स्वप्न होते. जवळपास दोन-अडीच वर्षे त्या काळ्या छायेखाली काढल्यानंतर नुकताच कुठे सामान्य माणूस थोडासा सावरू लागला होता. तेवढ्यातच महागाईचे संकट कोसळले आहे. भाजीपाल्यापासून धान्यापर्यंत, स्वयंपाकाच्या गॅसपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत, प्रत्येक जीवनावश्यवक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. जोडीला अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर ७८ रुपयांवर जाऊन पोहचला आहे. स्वाभाविकच आयात महागली आहे आणि त्याचाही परिणाम महागाई वाढण्यात होत आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चलनवाढ अथवा महागाईचा दर गत आठ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचला आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार गणना केला जाणारा महागाईचा दर एप्रिल महिन्यात ७.८ टक्क्यांवर पोहोचला. ही मे २०१४ मधील ८.३ टक्के या पातळीनंतरची सर्वोच्च पातळी आहे. त्यापूर्वी नोव्हेंबर २०१३मध्ये तर महागाई दराने ११.५१ टक्क्यांची पातळी गाठली होती. रिझर्व्ह बँकेनुसार, महागाईचा दर ६ टक्क्यांच्या आत असायला हवा. तो त्यावर गेल्यास महागाईचे चटके सोसवेनासे होतात आणि अर्थव्यवस्थेला फटका बसू लागतो. त्यामुळे महागाईचा दर खाली आणण्यासाठी तातडीची उपाययोजना आता आवश्यक झाली आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने नुकतीच व्याज दरांमध्ये वाढ केली. निकट भविष्यात पुन्हा एकदा व्याज दर वाढविले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दुर्दैवाने व्याज दरातील वाढ ही वरवरची मलमपट्टी आहे. केवळ तेवढाच उपाय महागाई रोखण्यासाठी पुरेसा नाही. मुळात सध्याच्या महागाईच्या भडक्याला सर्वाधिक कारणीभूत असलेले घटक म्हणजे इंधन दरवाढ, जागतिक पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेले अवरोध आणि घसरता रुपया ! त्यापैकी इंधन दरवाढीसाठी प्रामुख्याने रशिया-युक्रेन युद्ध कारणीभूत आहे. पुरवठा साखळीमधील अवरोधांसाठी, युद्धासोबतच, नव्याने तोंड वर काढत असलेल्या कोविड-१९ महासाथीमुळे चीनच्या अनेक भागांमध्ये लावण्यात आलेली टाळेबंदी बव्हंशी जबाबदार आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमधील टाळेबंदी हे दोन्ही घटक पूर्णपणे भारत सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहेत. रुपयाचे अवमूल्यन या तिसऱ्या घटकासाठीही पहिले दोन घटक बऱ्याच प्रमाणात जबाबदार असल्यामुळे, भारत सरकार त्या बाबतीतही फार काही करू शकण्याच्या परिस्थितीत नाही.

रशिया-युक्रेन युद्धामुळे खनिज तेलाचे दर तर भडकले आहेतच, पण सूर्यफूल तेलाचे दरही चांगलेच वाढले आहेत. त्यातच इंडोनेशियाने पामतेलाच्या निर्यातीवर बंदी लादल्याने जागतिक बाजारपेठेत एकूणच खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होऊन, खाद्यतेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळेही महागाईचा दर वाढण्यास हातभार लागला आहे. शेअर बाजार गडगडत असल्याने समभागांमधील गुंतवणूक काढून सुवर्ण खरेदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. त्यामुळे सोन्याची आयात वाढत आहे. रुपयाचे अवमूल्यन, वाढती आयात, त्यासाठी खर्ची पडणारे विदेशी चलन, त्यामुळे रुपयाच्या अवमूल्यनात पडणारी भर, अशा या दुष्टचक्रामुळे महागाई आणखी भडकत आहे. महागाईचा दर कमी करण्यासाठी हे दुष्टचक्र भेदणे गरजेचे आहे.

भारत सरकार ना रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकत, ना चीनमधील टाळेबंदी उठवू शकत, ना खनिज तेल उत्पादक देशांवर उत्पादन वाढविण्यासाठी दबाव निर्माण करू शकत; परंतु केंद्र व राज्य सरकारे इंधनावरील भरमसाठ करांमध्ये नक्कीच कपात करू शकतात. या व्यतिरिक्त देशातील खासगी खनिज तेल शुद्धीकरण कारखाने इंधनाच्या देशांतर्गत पुरवठ्यात कपात करून इंधन दरवाढीस चालना तर देत नाहीत ना, याकडेही केंद्र सरकारने लक्ष पुरवायला हवे. त्याशिवाय केंद्र सरकार येत्या खरीप हंगामात तेलवाणांसाठी आकर्षक हमीभावांची घोषणा करून देशांतर्गत खाद्यतेल उत्पादनवाढीस नक्कीच चालना देऊ शकते. या उपायामुळे खाद्यतेल आयात कमी होऊन महागाईला काही प्रमाणात आळा बसू शकतो आणि शेतकऱ्यांनाही थोडेफार ‘अच्छे दिन’ अनुभवता येतील ! आज जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यात आंतरराष्ट्रीय पटलावरील घडामोडींच्या बऱ्यावाईट परिणामांपासून कोणताही देश अलिप्त राहू शकत नाही; पण आपल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले सरकारने उचलायलाच हवी ! 

टॅग्स :InflationमहागाईFuel Hikeइंधन दरवाढRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया