शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - अमृत कसले?- विषवल्लीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 09:13 IST

कारण या कट्टरपंथीयांनी अजनाला पोलिस ठाण्यात घुसखोरी करताना त्यांच्या खलिस्तानच्या मागणीचा अंदाज आला.

गेल्या काही दिवसांपासून 'वारिस पंजाब दे' या नावाच्या दहशतवादी संघटनेचे नाव देशपातळीवर चर्चेत आले होते. कट्टरपंथी असलेला केवळ एकोणतीस वर्षांचा अमृतपाल सिंग सध्या या संघटनेचे नेतृत्व करीत होता. मागील फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अमृतसरमधील अजनाला पोलिस ठाण्याच्या समोर तलवारी आणि बंदुका घेऊन अमृतपाल सिंगच्या पुढाकाराने हल्ला करण्यात आला. तुफान सिंग नामक कट्टरपंथीयाची सुटका करावी, या मागणीसाठी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांचा हा हल्ला होता. अजनाला पोलिस ठाण्यात सर्व कट्टरपंथीयांनी घुसखोरी केली. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांना तुफान सिंगला सोडून द्यावे लागले, तेव्हा पंजाब पोलिस आणि केंद्र सरकारचे डोळे उघडले. कारण या कट्टरपंथीयांनी अजनाला पोलिस ठाण्यात घुसखोरी करताना त्यांच्या खलिस्तानच्या मागणीचा अंदाज आला.

अमृतपाल सिंग याने पंजाब पोलिसांना शरण येण्यासाठी जे स्थळ निवडले त्यावरून तरी 'वारिस पंजाब दे' ही संघटना पुन्हा एकदा स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राच्या मागणीसाठी शीख समाजातील तरुणांना संघटित करीत आहे हे स्पष्ट होते. मोगा जिल्ह्यातील रोडे गावातील गुरुद्वारामध्ये आपण शरण येऊ, असा निरोप अमृतपाल सिंग याने पंजाब पोलिसांना धाडला आणि तो जेथे कोठे लपला होता तेथून रोड़े गावात शनिवारी रात्री आला. त्याच्यासोबत नेहमीच बंदूकधारी अंगरक्षकांचा गराडा असतो. त्याच्यासह रोडे हा खलिस्तानवादी कट्टरपंथीय जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या जन्मगावी पोहोचला. रविवारी पहाटे शरण येण्याचा निरोप धाडत आपल्या सहकाऱ्यांसमोर छोटेसे भाषणही त्याने केले. अमृतपाल सिंग याला पोलिसांनी वेढा घालून अटकेची प्रक्रिया पूर्ण करीत असताना जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या तेथे हजर होता. फेब्रुवारीत अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला केला तेव्हा डोळे उघडलेल्या पंजाब पोलिसांनी कारवाई सुरू केली गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी सुमारे ७८ जणांना अटक केली. याच दरम्यान इंग्लंड आणि अमेरिकेसह खलिस्तानच्या मागणीला सर्वाधिक बळ देणाऱ्या कॅनडातील शीख समुदायांनी जोरदार निदर्शने करीत हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भारत सरकारचेही डोळे उघडले आणि संबंधित देशाच्या राजदूताकरवी भारताने स्पष्ट शब्दांत नापसंती दर्शविली. इंग्लंडमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्यात आला. तेथील सरकार भारतीय दूतावासास संरक्षण देण्यात कमजोर ठरले होते. फुटीरवादी कारवाया करणारा दुसरा भिंद्रनवाले तयार होत असल्याची जाणीव केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला झाली.

केंद्रीय सुरक्षा दलाचे विविध विभाग आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे अमृतपाल सिंगला पकडण्याची मोहीम सुरू केली. संपूर्ण देशाची अंतर्गत कायदा-सुव्यवस्था पाहणाऱ्या यंत्रणा कामाला लागल्यानंतर काल, रविवारी पस्तिसाव्या दिवशी अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आली. अमृतपाल सिंगची अटक ही त्याची शरणागती होती का? ती शरणागती जरी असली तरी त्याला पकडण्याची मोहीम सुरू झाल्यानेच त्याने शरण येण्याची तयारी दर्शविली असणार आहे. अमृतपाल सिंगला अटक करून आसामच्या उत्तर भागात असलेल्या दिब्रुगढ सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यासाठी त्याची खास विमानाने रवानगी करण्यात आली. त्याची आणि तो ज्या संघटना बांधत होता, त्यांच्या हालचाली आणि उद्देश राष्ट्रविरोधीच होता. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत त्यास अटक करण्यात आली. त्याच्या आठ प्रमुख साथीदारांनाही गेल्या महिन्याभरात अटक करून याच जेलमध्ये डांबण्यात आले आहे. देशातील पंजाब या सुपीक प्रांताने दहशतवादाने एकदा स्वतःला जाळून घेतले आहे. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत हे घडले आणि काँग्रेस सरकारने लष्करी कारवाई करीत जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या गटाची दहशत मोडून काढली होती. त्यातून पुढे इंदिरा गांधी यांची हत्या झाली. हा सारा इतिहास आपणास माहीत आहे.

अमृतपालसारखी विषवल्ली पुन्हा वाढू देणे भारताच्या अखंडतेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे खलिस्तानी पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. पंजाबमधील दहशतवादाची कारणे आणि त्या प्रांताच्या शेजारी असणारी पाकिस्तानची सीमा याचाही खूप जवळचा संबंध आहे. लढाऊ आणि शूरवीर असणाऱ्या पंजाबच्या तरुणांचा पाकिस्तानला गैरफायदा घ्यायचा आहे. तो प्रयत्न पाकिस्तानने पुन्हा एकदा चालू केला होता. अमृतपाल सिंगच्या अटकेने हे कटकारस्थान उद्धवस्त होईल अशी आशा करूया!

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंगPunjabपंजाबPoliceपोलिस