शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवा; आधी दंगल शमवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 06:10 IST

दिल्ली जळत असतानाचे राजकीय आरोप-प्रत्यारोप; सोशल मीडियावरील कट्टरतेचे प्रदर्शन सजगपणे टाळायला हवे. देशाची राजधानीच सुरक्षित नाही, असा संदेश सर्वत्र गेल्यास होणारी नाचक्की मोठी असेल.

शीखविरोधी दंगलीनंतरची अशांतता राजधानी अनुभवते आहे. दोन महिन्यांपासून शाहीन बागमध्ये सुरू असलेले आंदोलन असे हिंसक कसे झाले? कुणाचे चुकले? यामागे कोण आहेत? भारताच्या प्रत्येक प्रांताच्या, भाषेच्या गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दिल्लीकरांवर हिंसाचाराची काजळी कशी दाटली? अशा असंख्य प्रश्नांनी दिल्लीच नव्हेतर, देशवासीयांना अस्वस्थ केले आहे. दिल्ली व देश वाचवायचा असेल तर आधी ही दंगल शमायला हवी. तिच्या वेदना शमायला दीर्घकाळ लागतो. भारताच्या सर्वसमावेशक सार्वभौमत्वाच्या हजारो वर्षांच्या तपस्येला एका दगडाने तडा जातो. इतके आपण अमानवी झालो आहोत?

दंगे करणारे, भडकवणारे कोणत्याही जात, धर्माचे नसतात. त्यांना चेहरा नसतो. दिल्लीत या जमावाने २४ जणांचे बळी घेतले. अंकित शर्मा या २५ वर्षीय आयबी कर्मचाऱ्यास दगडाने ठेचून मारले. त्याचे शव १२ तासांनी सापडले. पोलीस कर्मचारी रतन लाल यांच्यावर गोळी झाडली. जवानांवर दंगेखोरांनी अ‍ॅसिड फेकले. दगड, विटा, अ‍ॅसिड, मिरचीपूड, बंदुकांचा सर्रास वापर झाला. दिल्ली, देशाला अशांत करण्याचा हा संघटित प्रयत्न होता. देशाच्या राजधानीत कायदा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडण्याजोगी स्थिती निर्माण झाली.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा मंजूर झाल्यावर देशभरात त्याचे समर्थन-विरोध करणारे पुढे आले. दिल्लीत आधी विरोधकांचा आवाज बुलंद होता. ते रस्त्यावर ठाण मांडून होते. गेल्या तीन दिवसांपासून समर्थकही रस्त्यावर उतरले आणि संघर्ष पेटला. हा भाग एनसीआरमुळे थेट उत्तर प्रदेशपर्यंत भिडणारा. त्यामुळे दंगलीची धग तिथवर पोहोचण्याची भीती होती. दिल्लीत जमावबंदीपाठोपाठ, संचारबंदी लागू झाली. शेकडो गाड्या, टायर मार्केट भस्मसात झाले. दंगेखोरांना कायद्याची भीती उरली नसल्याचे यातून दिसले. सामाजिक सौहार्द जपण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले.
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शाहीन बागच्या आंदोलकांशी केंद्र सरकारने एकदाही चर्चेची तयारी दाखवली नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी केली. ती चर्चा अखेरच्या टप्प्यात असतानाच दंगलीचा वणवा भडकावा? बलाढ्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात- त्यातही दिल्लीत असताना राजधानी अशांत व्हावी, हा योगायोग नक्कीच नाही. सुदैव एकच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आधी दंगल शमवण्यावर एकमत झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. पोलीस, निमलष्करी दलाचे सशस्त्र जवान तैनात झाले.
परिस्थिती आटोक्यात येईलच, पण नुकसान अपरिमित झाले. कुणाचा रोजगार गेला, कुण्या आईने लेक; तर देशाने शूरवीर गमावला. कुणाचे घर बेचिराख झाले. गमावल्याची यादी न संपणारी... मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सैन्याला पाचारण करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती भीषण असल्याची टिप्पणी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले. हा राजकीय गदारोळ दिल्लीला, देशाला नवा नाही. पण दिल्ली जळत असताना आरोप-प्रत्यारोप थांबायला हवेत. राजधानी सुरक्षित नाही- असा संदेश संपूर्ण देशभर आणि पुढे जगभर गेल्यास होणारी नाचक्की भरून यायला वेळ लागेल. पोलीस म्हणतात-स्थिती आटोक्यात आहे. मग अजूनही दगडफेक सुरू कशी?
सोशल मीडियावरून कट्टरतेचे प्रदर्शन मांडले जात आहे. आता वेळ आहे समाजाने सजगपणे वागण्याची. अन्यथा दिल्लीची जखम भळभळती राहील. खरे आव्हान सुरक्षायंत्रणेसमोर आहे ते, दंगल पसरवणाºया, भडकवणाऱ्यांना शोधण्याचे. त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे. या क्षणी सुरक्षा यंत्रणांवर अविश्वास दाखवून चालणार नाही. दंगल शमवतानाच पोळलेली मने राज्यकर्त्यांना सांधावी लागतील. दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. पण सरकार, राजकीय पक्ष, प्रत्येक दिल्लीवासी, देशवासीयांसाठीही हा परीक्षेचाच काळ आहे. ज्यात उत्तीर्ण-अनुत्तीर्ण फक्त मानवता होईल!

टॅग्स :delhi violenceदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक