शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संपादकीय - दोन स्वागतार्ह घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:00 IST

राहुल गांधींची काश्मीरभेट या एकवाक्यतेच्या दिशेने जाणारी व राजकीय संबंधांना एक चांगला आकार देणारी ठरेल. पण राजकारणातील काही अपक्व माणसांना तेढ वाढविण्यात व त्यावर आपल्या मनाचा कंडू शमवून घेण्यात रस असतो.

नुकत्याच घडलेल्या दोन चांगल्या घटनांमुळे देशाचे राजकीय वातावरण निवळायला मदत होण्याची शक्यता आहे. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरभेटीचे दिलेले निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. आपल्या भेटीत आपण जनतेशी, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे नेते आणि लष्करी व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे राहुल गांधींनी हे निमंत्रण स्वीकारताना राज्यपालांना कळविले आहे. ही भेट प्रत्यक्षात घडून आलीच तर काश्मीर प्रश्नावर आता तापलेले राजकारण काहीसे थंड होण्याची व त्यामुळे या प्रश्नावर अधिक विधायक वाटचाल व चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. टीका करणे म्हणजे विरोध नव्हे. सरकारच्या कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद असले तरी अंतिम लक्ष्याबाबत त्यांच्यात एकवाक्यता आहे. राहुल गांधींची काश्मीरभेट या एकवाक्यतेच्या दिशेने जाणारी व देशातील राजकीय संबंधांना एक चांगला आकार देणारी ठरेल.समाजात व राजकारणात असणाºया काही अपक्व माणसांना तेढ वाढविण्यात व त्यावर आपल्या मनाचा कंडू शमवून घेण्यात रस असतो. पण अशी माणसे समाजकारणात एक विषाक्त प्रवाह सोडत असतात. चर्चेची जागा वादाने आणि टीकेची जागा हाणामारीने घ्यायची नसते. सध्या ट्रोलवर येणारे ‘संदेश’ सरकारच्या टीकाकारांवर कमालीची अमंगल व अभद्र टीका करताना दिसतात. ते थांबायलाही या भेटीने मदत होईल. काश्मीरचा प्रश्न केवळ प्रादेशिक वा भौगोलिक नाही. तो मानवी व राष्ट्रीय आहे. त्यामुळे त्याविषयीच्या चर्चेत वादविवादालाही संयम राखणे गरजेचे आहे.आतापर्यंतची संसदेतील चर्चा तशी राहिलीही आहे. हेच वातावरण पुढे चालू राहिल्यास आपण एकात्मतेच्या दिशेनेही वाटचाल करू शकू. राजकारणाला धर्माची कडा आली की ते अतिशय असहिष्णू होते. संसदेतील चर्चेला अशी कडा आल्याचे दिसले नाही. सारी चर्चा राजकीय परिणामांवर केंद्रित राहिली. अनिष्ट व अमंगल आले ते ट्रोलवाल्यांनी लोकांमध्ये पसरविलेल्या संदेशातील शिवीगाळीचे होते. ते थांबणे व आताची चर्चा अधिक विधायक व सभ्यतेची होणे गरजेचे आहे. या संदर्भात राहुल गांधींची काश्मीरभेट महत्त्वाची ठरणारी आहे. या आठवड्यात होत असलेली दुसरी महत्त्वाची व चांगली घटना डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदप्रवेशाची आहे. दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद सांभाळणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. सिंग यांनी त्यांच्या राज्यसभेतील उमेदवारीचा अर्ज राजस्थानातून भरला आहे. त्या राज्यात काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने तेथून त्यांची निवड निश्चित व सहजपणे होणारीही आहे. ज्या दिवशी ते राज्यसभेतून निवृत्त झाले त्या दिवशी त्यांच्या सभागृहातील नसण्याने संसद व देश यांचे नुकसान होईल, अशीच भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व माध्यमांनी व्यक्त केली होती.त्याआधी ते आसामातून राज्यसभेवर येत. आता आसामात भाजपचे बहुमत असल्याने व तो पक्ष डॉ. सिंग यांना पाठिंबा देण्याची शक्यता नसल्याने गेले काही महिने ते संसदेबाहेर राहिले. परिणामी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवरील त्यांची मते व अभिप्राय यांना देशाला मुकावे लागले. डॉ. सिंग हे काँग्रेस पक्षाचे नेते असले तरी त्यांचे अध्ययन व दृष्टी पक्षीय नाही. प्रसंगी आपल्या पक्षालाही नाराज करीत त्यांनी त्यांची मते देशहितार्थ मांडली आहेत. असे नेते संसदेत असणे ही त्या सन्माननीय व्यासपीठाचे वजन व प्रतिष्ठा वाढविणारी बाब आहे. त्यांनी राजस्थानातून संसदेत येणे हे त्याचमुळे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. साºया जगाच्याच अर्थकारणाला सध्या ओहोटी लागली आहे. ‘अशा जागतिक स्वरूपाच्या आर्थिक संकटातून त्याला बाहेर काढण्याची क्षमता डॉ. मनमोहन सिंग यांच्यात आहे’ हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी काढलेले उद्गार सार्थ आहेत. डॉ. सिंग यांच्या आर्थिक विचारांचा आदर साºया जगातच केला जातो. अशी व्यक्ती संसदेबाहेर असणे ही बाब देशहिताची नाही. ती आता दुरुस्त होत आहे ही बाब आनंदाची व स्वागतार्ह आहे. देश आर्थिक आपत्तीतून वाटचाल करीत आहे. बेकारीचे संकट वाढण्याची शक्यता आहे, ही बाब डॉ. सिंग यांची गरज सांगणारी आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंग