शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

Editorial : लाखाचे बारा हजार झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:21 IST

राज्य सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावून नीट पंचनामे करून जेवढी जादा मदत देता येईल ते पाहावे. राजकीय कुरघोडीतून लाखाचे बारा करण्याचा निर्णय घेऊ नये. या बारा हजारांनी शेतक-यांचे नुकसान भरून येणार नाही.

कोरोना महामारीने संपूर्ण देश अडचणीतून जात असताना महाराष्ट्र राज्य अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने दुहेरी संकटात सापडले आहे. एकीकडे  राज्य सरकारचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यात या नैसर्गिक आपत्तीने अडचणींचा डोंंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची मदत घ्यायची असते, किंबहुना केंद्राने ती द्यायची असते. दिल्लीच्या  तख्तावर बसलेल्या सत्ताधीशांना केवळ राजकारणात रस आह. तो दूर ठेवून  तारतम्यभावाने विचार करण्याची सुबुद्धी होईल, असे वाटत नाही. तख्तावर बसण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने हातचे काही राखून न  ठेवता ओझ्याने झोळी फाटेल एवढं दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेकांना अडवण्याचे राजकारण आड आलं.  अन्यथा, भाजपा शिवसेनेला १६९ आमदार महाराष्ट्रातील जनतेनेच दिले होते.  तरीदखील भाजपाचे नेत देवेंद्र  फडणवीस  महणतात, अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या  शेतक-याना दिलेली मदत म्हणजे सूड उगवणे आहे.केद्र सरकारकडून ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगतात. त्याचा प्रतिवाद करता येत नसल्याने सूडाची भाषा बोलून नुकसानीने जखमा झालेल्या शेतक-यांना अडचणींवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलीमदत ही अत्यंत तोकडी आहे. दहा हजार कोटींपैकी केवळ ५ हजार ५०० कोटी रुपये शेतक-यांसाठी आहेत. रस्ते, पूल, पाणी योजना दरुस्तकरण्यासाठीचा निधीदेखील याच पॅकेजमध्ये धरला आहे. वास्तविक, हे पॅकज केवळ राजकीय दबावाखाली जाहीर केल आहे. अद्याप शेतातील साठलेले पाणीही आटलेले नाही. पंचनामे झालेले नाहीत. कोणत्या पिकांचे किती क्षेत्र पाण्यात कुजले आहे, किती एकर शेती वाहून गेली आहे? याचा आकडा कागदावर पूर्णपणे मांडायचा आहे. आणखी आठ दिवस थांबले असते तर बिघडले नसते. महाराष्ट्र हे  मोठे राज्य आहे. लाखो शेतकरी आहेत. विविध विभागात अनेक पिके आहेत. कोणाची झोपडी वाहून गेली आहे, कोणाची विहीर पाण्याबरोबरच मलब्याने भरून गेली आहे. गोठ्यातील जनावरे हलविताना वाहून गेली आहेत. ही सर्व बारीकसारीक नोंद करावी लागणार आणि खर्चाचा अंदाज बांधावा लागणार आहे. लाखाचे नुकसान झाले असताना बारा हजार देण्याचा निर्णय म्हणजे एखादाला लाख रुपये दिल्यावर त्याने  त्यात भर न घालता बारा हजार केल तर त्याला लाखाचे बारा हजार केले,  असे ग्रामभाषेत म्हणतात. तसेच हे पॅकज आहे.उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळात अनेक विषयांवर राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन कुटुंबप्रमुखाप्रमाणे  समजून सांगत.  प्रसंगी कठोर होत.मंदिर/ प्रार्थनास्थळ उघडणार नाही, परीक्षा घेणार नाही, आदी विषयांवर ते शेवटपर्यत  ठाम राहिले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. कोरोनावर मात करण्यास मदतदेखील झाली. या प्रमाणे आणखी एक आठवडा थांबून पंचनामे नीट  करून पॅकेज जाहीर करायला हवे होते. थयथयाट करणा-या विरोधकांच्या मागण्यांना भीक घालायला नको होती. केंद्र सरकारने जीएसरी आणि इतर  करांतील ३८ हजार कोटींचा महाहाराष्ट्राचा वाटा अद्याप मिळालेला नाही.चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांना मदतीचा हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला, त्यावर निर्णय नाही. जीएसटीसाठी अनेक स्मरणपत्रे पाठविली त्याचं उत्तर नाही. महाराष्ट्र हा प्रांत याच देशात आहे. दिल्लीच्या तिजोरीत लाखो, कोटींची भर महाराष्ट्र घालत असतो.  याचा विसर पडलेला दिसतो. चक्रिवादळ आणि अतिवृष्टीने महाराष्ट्राच्या काही भागाेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेत  प्रचंड  नुकसान झाले. असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील एकही सदस्य फिरकत नाही. केंद्र  सरकार पथक पाठवीकारकसत नाही. बिगरभाजपच सरकार स्वीकारता, तर त्याचा सूड घेण्याचा हा प्रकार आहे, याची जाणीव महाराष्टालील शेतकऱ्यांना एकदा जर  झाली तर त्यांचा उदक झालयावशिाय राहणार नाही. यावर प्रतिवाद  करताना केंद्राच्या धोरणानुसार महाराष्ठ्र् सरकार दीड लाख कोटी रुपयांचे  कर्ज काढू शकते, असा सल्ला महाराष्ट्राचे  पाच वर्षे  नेतृत्व करणारे  , तेव्हा याला केवळ राजकीय सूड म्हणाावे लागते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र