शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Editorial : लाखाचे बारा हजार झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:21 IST

राज्य सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावून नीट पंचनामे करून जेवढी जादा मदत देता येईल ते पाहावे. राजकीय कुरघोडीतून लाखाचे बारा करण्याचा निर्णय घेऊ नये. या बारा हजारांनी शेतक-यांचे नुकसान भरून येणार नाही.

कोरोना महामारीने संपूर्ण देश अडचणीतून जात असताना महाराष्ट्र राज्य अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने दुहेरी संकटात सापडले आहे. एकीकडे  राज्य सरकारचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यात या नैसर्गिक आपत्तीने अडचणींचा डोंंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची मदत घ्यायची असते, किंबहुना केंद्राने ती द्यायची असते. दिल्लीच्या  तख्तावर बसलेल्या सत्ताधीशांना केवळ राजकारणात रस आह. तो दूर ठेवून  तारतम्यभावाने विचार करण्याची सुबुद्धी होईल, असे वाटत नाही. तख्तावर बसण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने हातचे काही राखून न  ठेवता ओझ्याने झोळी फाटेल एवढं दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एकमेकांना अडवण्याचे राजकारण आड आलं.  अन्यथा, भाजपा शिवसेनेला १६९ आमदार महाराष्ट्रातील जनतेनेच दिले होते.  तरीदखील भाजपाचे नेत देवेंद्र  फडणवीस  महणतात, अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या  शेतक-याना दिलेली मदत म्हणजे सूड उगवणे आहे.केद्र सरकारकडून ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगतात. त्याचा प्रतिवाद करता येत नसल्याने सूडाची भाषा बोलून नुकसानीने जखमा झालेल्या शेतक-यांना अडचणींवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलीमदत ही अत्यंत तोकडी आहे. दहा हजार कोटींपैकी केवळ ५ हजार ५०० कोटी रुपये शेतक-यांसाठी आहेत. रस्ते, पूल, पाणी योजना दरुस्तकरण्यासाठीचा निधीदेखील याच पॅकेजमध्ये धरला आहे. वास्तविक, हे पॅकज केवळ राजकीय दबावाखाली जाहीर केल आहे. अद्याप शेतातील साठलेले पाणीही आटलेले नाही. पंचनामे झालेले नाहीत. कोणत्या पिकांचे किती क्षेत्र पाण्यात कुजले आहे, किती एकर शेती वाहून गेली आहे? याचा आकडा कागदावर पूर्णपणे मांडायचा आहे. आणखी आठ दिवस थांबले असते तर बिघडले नसते. महाराष्ट्र हे  मोठे राज्य आहे. लाखो शेतकरी आहेत. विविध विभागात अनेक पिके आहेत. कोणाची झोपडी वाहून गेली आहे, कोणाची विहीर पाण्याबरोबरच मलब्याने भरून गेली आहे. गोठ्यातील जनावरे हलविताना वाहून गेली आहेत. ही सर्व बारीकसारीक नोंद करावी लागणार आणि खर्चाचा अंदाज बांधावा लागणार आहे. लाखाचे नुकसान झाले असताना बारा हजार देण्याचा निर्णय म्हणजे एखादाला लाख रुपये दिल्यावर त्याने  त्यात भर न घालता बारा हजार केल तर त्याला लाखाचे बारा हजार केले,  असे ग्रामभाषेत म्हणतात. तसेच हे पॅकज आहे.उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळात अनेक विषयांवर राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन कुटुंबप्रमुखाप्रमाणे  समजून सांगत.  प्रसंगी कठोर होत.मंदिर/ प्रार्थनास्थळ उघडणार नाही, परीक्षा घेणार नाही, आदी विषयांवर ते शेवटपर्यत  ठाम राहिले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. कोरोनावर मात करण्यास मदतदेखील झाली. या प्रमाणे आणखी एक आठवडा थांबून पंचनामे नीट  करून पॅकेज जाहीर करायला हवे होते. थयथयाट करणा-या विरोधकांच्या मागण्यांना भीक घालायला नको होती. केंद्र सरकारने जीएसरी आणि इतर  करांतील ३८ हजार कोटींचा महाहाराष्ट्राचा वाटा अद्याप मिळालेला नाही.चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांना मदतीचा हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला, त्यावर निर्णय नाही. जीएसटीसाठी अनेक स्मरणपत्रे पाठविली त्याचं उत्तर नाही. महाराष्ट्र हा प्रांत याच देशात आहे. दिल्लीच्या तिजोरीत लाखो, कोटींची भर महाराष्ट्र घालत असतो.  याचा विसर पडलेला दिसतो. चक्रिवादळ आणि अतिवृष्टीने महाराष्ट्राच्या काही भागाेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेत  प्रचंड  नुकसान झाले. असताना केंद्रीय मंत्रिमंडळातील एकही सदस्य फिरकत नाही. केंद्र  सरकार पथक पाठवीकारकसत नाही. बिगरभाजपच सरकार स्वीकारता, तर त्याचा सूड घेण्याचा हा प्रकार आहे, याची जाणीव महाराष्टालील शेतकऱ्यांना एकदा जर  झाली तर त्यांचा उदक झालयावशिाय राहणार नाही. यावर प्रतिवाद  करताना केंद्राच्या धोरणानुसार महाराष्ठ्र् सरकार दीड लाख कोटी रुपयांचे  कर्ज काढू शकते, असा सल्ला महाराष्ट्राचे  पाच वर्षे  नेतृत्व करणारे  , तेव्हा याला केवळ राजकीय सूड म्हणाावे लागते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र