शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
2
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
3
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
4
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
5
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
6
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
7
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
8
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
9
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
10
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
11
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
12
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
13
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
14
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
15
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
16
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
17
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
18
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
19
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल

संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:24 IST

माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत.

महाराष्ट्रभर सध्या दोन प्रश्न भलतेच चर्चेत आहेत. पहिला- विधानसभेचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे मोबाइलवर जंगली रमी खेळत होते, की पत्त्यांचाच साॅलिटेयर गेम? आणि दुसरा- शेतकरी आत्महत्यांच्या रूपाने शेती व्यवसायाचा कडेलोट होत असताना कृषिमंत्र्यांनी अशी असंवेदनशीलता दाखवूनही त्यांचे मंत्रिपद शाबूत राहील का? महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा मुद्दा थेट दिल्लीत नेला आहे. असंवेदनशील कृषिमंत्रीमहाराष्ट्राला नको असे साकडे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चाैहान यांना घातले आहे. पण, या प्रश्नांची उत्तरे चाैहान यांच्याकडे नाहीतच.महाराष्ट्रात तीन पक्षांचे महायुती सरकार सत्तेवर असल्याने माणिकरावांना धनंजय मुंडे यांच्या मार्गाने जावे लागेल का, याचे उत्तर नैतिकतेवर नव्हे तर राजकीय समीकरणांवर अवलंबून असेल. माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. महायुती सरकारला, कोकाटे यांच्या मंत्रिपदाला जेमतेम आठ महिने होताहेत आणि जवळपास दर महिन्याला एक वाद असा माणिकरावांचा स्कोअर आहे. खोटी कागदपत्रे देऊन सदनिका मिळविल्याच्या तीस वर्षे जुन्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे आमदारकी अडचणीत आली. पण, वरच्या न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती दिल्याने गोळी कानाजवळून गेली.भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेली एक रुपयात विमा योजना सरकारने गुंडाळली तेव्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लपविताना कृषिमंत्री म्हणाले, ‘आजकाल भिकारीदेखील १ रुपया घेत नाही; परंतु आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयात विमा देतो..!’ साहजिकच विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी केवळ उभ्या पिकाचेच पंचनामे होतील असे ठणकावून सांगितले आणि ‘पीक निघाल्यानंतर काय ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असा सवाल विचारला. कर्जमाफीचा मुद्दा निघाला तर ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले, ‘कर्जाचे पैसे तुम्ही शेतीत गुंतवता का? तुम्ही कर्जे घेता, ती फेडत नाही. त्या पैशांतून साखरपुडे करता, लग्न समारंभावर खर्च करता आणि नंतर कर्जमाफी मागता’. हे विधानही त्यांना भोवले. दिलगिरी व्यक्त करावी लागली.कांद्याच्या घसरलेल्या दरासाठीही त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार ठरवले. ‘एखाद्या शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळाला की सगळे कांदा लावत सुटतात. प्रत्येकानेच कांदा लावला तर भाव पडणारच’, या त्यांच्या वक्तव्यात तसे पाहता कांदाच काय, पण कोणत्याही पिकाच्या बाजारपेठेचे वास्तव होते खरे. तथापि, मंत्रिपदावर बसलेल्या माणसाने इतके परखड बोलायचे नसते हे भान त्यांना राहिले नाही. नंतर एका समारंभात बोलताना माणिकरावांनी त्यांच्याकडील कृषिमंत्रिपदाची तुलना ओसाड गावच्या पाटीलकीशी  केली. ते म्हणाले, ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे.’माणिकराव कोकाटे शेती खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणत असले तरी प्रत्यक्षात शेती, शिक्षण, आरोग्य या खात्यांची मंत्रिपदे म्हणजे काटेरी मुकुट असतो. या खात्यांचा एकूण कारभारच इतका गुंतागुंतीचा आणि झालेच तर खालपासून वरपर्यंत चिरीमिरीचा आहे की, आतापर्यंत मोजकेच मंत्री ही खाती सांभाळूनही निष्कलंक राहू शकले आहेत. त्यातही शेती हा व्यवसाय मुळात प्रचंड तोट्याचा. त्याला लोकसंस्कृतीपासून ते जागतिक व्यापारापर्यंत असंख्य संदर्भ. त्याविषयी अधिकारवाणीने बोलणारेही खूप. ही बोलणारी मंडळी तज्ज्ञ वगैरेही असतात. गरिबाला, संकटात सापडलेल्या माणसाला सल्ले देणारे खूप असतात. म्हणूनच, शेतकऱ्याला सल्ले देणारे जसे पैशाला पायलीभर तसेच मंत्र्यालाही सल्ले देणारे खूप. त्यांनी ऐकले तर ठीक. अन्यथा... बरेच बरे. शेतकरी जसा चोहोबाजूंनी संकटांनी घेरलेला, तसाच या खात्याचा मंत्रीही संकटांच्या कोंढाळ्यात असतो.अशावेळी शांतपणे आपल्या खात्याचे काम पाहणे, आवश्यक असेल तेवढेच कमीतकमी बोलणे आणि महत्त्वाचे म्हणजे या खात्याचा केंद्रबिंदू जो शेतकरी त्याच्याबद्दल सहानुभूती, कळवळा, संवेदनशीलता बाळगणे, हे भान कृषिमंत्र्यांनी बाळगायलाच हवे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाच्या पहिल्या दिवसापासून हे उमजलेले नाही. तेव्हा, मोबाइलवरील गेमच्या वादात बरोबर कोण, चुकीचे कोण, कृषिमंत्री की विरोधक? हे महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा फटकळ, परखड बोलण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या मंत्र्यांमध्ये संवेदनशीलता नाही, हे अधिक महत्त्वाचे. 

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेMaharashtraमहाराष्ट्रministerमंत्री