शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मोदींच्या भाषणांमुळे सरकार-शेतकऱ्यांमधील कटुता मिटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 6:31 AM

अडीच महिन्यांत हे आंदोलन मोडीत काढण्याचे झालेले प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हिंसाचार, राजधानीच्या प्रवेशमार्गावर खोदलेले खंदक, अणकुचीदार खिळ्यांचा गालिचा वगैरे घटनाक्रमामुळे एक प्रचंड कटुता शेतकरी व सरकारमध्ये निर्माण झाली आहे. ती संसदेतल्या राजकीय भाषणांनी दूर होणार नाही.

राजधानी दिल्लीच्या आजूबाजूला लाखालाखाच्या उपस्थितीत किसान महापंचायती सुरू आहेत. उत्तर प्रदेश किंवा हरयाणा या भाजपशासित राज्यांनी घातलेले निर्बंध झुगारून शेतकरी एकत्र येताहेत. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात प्रदीर्घ लढाईचा पुन्हा पुन्हा उच्चार करताहेत. बुधवारच्या सहारनपूरच्या महापंचायतीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही हजेरी लावली. दुसरीकडे संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात या कायद्यांचा बचाव करण्याची जबाबदारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खांद्यावर घेतली आहे. आधी राज्यसभेत व बुधवारी लोकसभेत त्यांनी या कायद्यांचे समर्थन करतानाच ज्या तरतुदीवर आंदोलक शेतकऱ्यांना तीव्र आक्षेप आहे त्याबद्दल काही गोष्टी विस्ताराने स्पष्ट केल्या.

शेतमालाला हमीभाव म्हणजे ‘एमएसपी’ आधीही होता, तो आहेच व राहीलही, हे त्यांनी राज्यसभेत सांगितले होते. लोकसभेत त्यांनी नवी स्पष्टीकरणे व किंचित माघारीचे संकेत दिले. कृषी कायदे राज्यांना ऐच्छिक आहेत, हा त्यापैकी ठळक खुलासा. शेती हा राज्यांचा विषय असताना केंद्राने राज्य सरकारांना विश्वासात न घेता आधी अध्यादेश आणले व नंतर संसदेत घाईघाईत कायदे संमत करून घेतले, हा मोठा आक्षेप आहे. त्यावर, ‘या कायद्यांची  कोणावरही अजिबात सक्ती नाही. अंमलबजावणी ऐच्छिक आहे. तो अधिकार पूर्णपणे राज्यांचा’, असे मोदींनी स्पष्ट केले हे बरे झाले. उत्तर भारतात ज्यांना मंडी म्हणतात त्या बाजार समित्या बंद करण्याचे सरकारचे कारस्थान असल्याचा शेतकरी आंदोलकांचा मुख्य आक्षेप आहे. या पार्श्वभूमीवर, हे कायदे लागू झाल्यापासून एकही बाजार समिती बंद झालेली नाही, उलट बाजार समित्यांचे अधिक बळकटीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, हा पंतप्रधानांचा पुनरुच्च्चार. अर्थात हे दोन्ही मुद्दे मूळ कायद्यात नाहीत.
याशिवाय नरेंद्र मोदी लोकसभेतील भाषणात जे काही म्हणाले ते सारे राजकारण आहे. नेहमीप्रमाणे ते काँग्रेसवर तुटून पडले. तो संभ्रमित पक्ष असल्याची टीका केली. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना त्यांनी कधीतरी राजकीय गुरु संबोधले होते, आणि त्यांचे बोट धरून राजकारणात चालत आलो, असे म्हटले होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरही मोदींनी ‘यू-टर्न’चा आरोप केला. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांचा संदर्भ गेले काही दिवस भाजपचे सगळे बडे नेते देत आहेत. काल, पंतप्रधानही त्यावर बोलले. बाजार व्यवस्थेत सुधारणांची गरज आहे, यावर अजिबात दुमत नाही. या सुधारणा करताना राज्य सरकारांना आणि या प्रक्रियेतील असंघटित व जोखमीचा घटक असलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, एवढीच अपेक्षा वेगवेगळ्या स्तरांवर व्यक्त होत आहे.
राज्यसभेत पंतप्रधानांनी केलेला ‘आंदोलनजीवी’ शब्दप्रयोग नाही म्हटले तरी त्यांच्या अंगलट आला. ‘मै भी चौकीदार’च्या शैलीत अनेकांनी ‘होय, आम्ही आंदोलनजीवी’ असल्याचे सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे आंदोलन पवित्र आहे, आंदोलकांबद्दल आदर आहे; पण, आंदोलक वेगळे व त्यांच्या जिवावर जगणारे आंदाेलनजीवी वेगळे असा खुलासा पंतप्रधानांना करावा लागला. संतापलेल्या शेतकऱ्यांना चुचकारायचे व त्याचवेळी आंदोलनाच्या नेत्यांवर तुटून पडायचे, असा हा पवित्रा आहे. संसदेत असे दोन पावले मागे येण्याचे संकेत नरेंद्र मोदींनी दिले तरी त्यामुळे तयार झालेला कृषी कायद्यांना विरोधाचा चक्रव्यूह भेदला जाईलच असे नाही.अडीच महिन्यांत हे आंदोलन मोडीत काढण्याचे झालेले प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हिंसाचार, राजधानीच्या प्रवेशमार्गावर खोदलेले खंदक, अणकुचीदार खिळ्यांचा गालिचा वगैरे घटनाक्रमामुळे एक प्रचंड कटुता शेतकरी व सरकारमध्ये तयार झाली आहे. ती संसदेतल्या राजकीय भाषणांनी दूर होणार नाही. विशेषत: प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारामुळे अडचणीत आलेल्या आंदोलनात राकेश टिकैत यांच्या अश्रूपाताने नवा जीव ओतला गेला. हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील जाट समुदाय मैदानात उतरला. त्यामुळे सरकारपुढील आव्हान बिकट बनले. संवादाचा धागा क्षीण झाला. त्यानंतर वेळोवेळी संवादाचा सेतू जोडण्याचे संकेत मोदींनी दिले आहेत. पण, त्यासाठी राजकीय टीकाटिप्पणी थोडी मागे ठेवावी लागेल. ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ या पौराणिक वाक्याने स्पष्ट होणाऱ्या ‘व्हॉट अबाउटिझम’च्या सवयीला मोडता घालावा लागेल. वेळप्रसंगी मनाचा मोठेपणा दाखवून आंदोलनाचा तिढा सोडविण्यासाठी शेतकरी नेत्यांशी संपर्क साधायलाही हरकत नाही. त्यात कसलाही कमीपणा नाही.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभा