शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी बदलले डावपेच; पण संपणार का सरकारसमोरील पेच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 07:40 IST

पंतप्रधान मोदींनी सोमवारी राज्यसभेत केलेले भाषण सरकारचे धोरण व डावपेच दाखविणारे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन कमकुवत होईल, ...

पंतप्रधान मोदींनी सोमवारी राज्यसभेत केलेले भाषण सरकारचे धोरण व डावपेच दाखविणारे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन कमकुवत होईल, हा सरकारचा होरा चुकला. प्रजासत्ताक दिनात शोभा झाल्यावर आंदोलनकर्ते किंवा त्यांच्या मागे असलेले परपुष्ट आंदोलनजीवी (हा मोदींचा शब्द) यांनी आपले डावपेच बदलले. आंदोलनाचा शीख चेहरा मागे पडला आणि टिकैत यांचा जाट चेहरा पुढे आला. पंजाब - हरयाणापुरते आंदोलन हा आरोप फेटाळण्याचा हा प्रयत्न आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आंदोलक बावरले होते. आंदोलकांशी संवाद साधण्याची चांगली संधी त्यावेळी सरकारला होती. परंतु, संवादापेक्षा दंड्यावर सरकारने भर दिला आणि आंदोलन हा शेतकऱ्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला.

तटस्थ विचार केला तर सरकार बरेच मागे आले असल्याने शेतकरी नेत्यांनी चर्चेला सुरुवात करण्यास हरकत नव्हती. तसे न करता, कायदे मागे घ्या व हमी किमतीला कायद्याचे स्वरुप द्या, अशा अव्यवहारी मागण्या कायम ठेवण्यात आल्या. पंतप्रधान ज्यांना आंदोलनजीवी म्हणतात त्या गटाच्या या मूळ मागण्या आहेत. कायद्यातील तरतुदींबाबत सरकार आज ताठर नाही. तरीही ते ताठर असल्याची प्रतिमा पोलिसी बळाचे अनावश्यक प्रदर्शन, पत्रकारांपासून अनेकांवर सरसकट देशद्रोहाचे कलम लावण्याचा मूर्खपणा सरकारने केल्याने झाली. याउलट भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या साध्यासुध्या मागण्या पोलिसी बळाने चिरडल्या जात आहेत, असे चित्र जगभरात निर्माण करून त्यामागे हट्टाग्रह लपविण्याचे आंदोलनकर्त्यांचे डावपेच यशस्वी झाले.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे राज्यसभेतील भाषण ऐकले तर मोदींचे डावपेच लक्षात येतात. शत्रुपक्षातील विसंवाद हेरून त्यावर मारा करण्यात सेनापतीचे कौशल्य असते. आंदोलक आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्यातील विसंवादावर बोट ठेवून आपल्या विरोधी आघाडीतील या फटी अधिक मोठ्या करण्याची धडपड मोदी यांनी भाषणातून केली. शेती कायदे राहणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले व आंदोलनजीवी हे नवे विशेषण त्यांनी वापरले. त्यातून टीकेची झोड उठणार हे मोदींना पक्के माहित आहे व अशी झोड उठावी, हाच त्यांचा उद्देश आहे. मोदींचे भाषण बारकाईने ऐकले तर शेतकरी आंदोलकांना त्यांनी आंदोलनजीवी म्हटलेले नाही तर या आंदोलनाचा आसरा घेऊन स्वतःची विचारधारा आणि स्वतःचा चेहरा समाजात रेटणाऱ्यांना त्यांनी हे विशेषण दिले आहे. या गटांचे नेतृत्व, उघड वा आडून, शेतकऱ्यांनी मानू नये, असे मोदींना सुचवायचे आहे.
शेतकऱ्यांमध्येही गरीब व श्रीमंत शेतकरी असा भेद करून शेती सुधारणा गरीब शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त आहेत, हे मोदींनी जोरकसपणे सांगितले. काही श्रीमंत शेतकरी तुम्हाला वेठीस धरीत आहेत, असे गरीब शेतकऱ्यांवर बिंबविण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. तिसरा डावपेच विरोधी पक्षांतील दुही व दुटप्पीपणा उघड करण्यावर आहे. शेतीमधील आर्थिक सुधारणांचा स्पष्ट पाठपुरावा करणारे डॉ. मनमोहनसिंग यांचे वक्तव्य मोदींनी वाचून दाखविले. शरद पवार व अन्य नेत्यांच्या आर्थिक सुधारणावादी दृष्टीकोनाचा उल्लेख केला. काँग्रेसमधील विसंवादावर बोट ठेवले व काँग्रेसने जन्माला घातलेल्या सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचे धाडस आपण करीत आहोत, असा दावाही केला. आर्थिक सुधारणा होताना काँग्रेसवर एकेकाळी होणारे आरोप आज आपल्यावर होत आहेत, असे सांगून शेती सुधारणांची मालकी त्यांनी काँग्रेसच्या गळ्यात टाकली.मोदींच्या या डावपेचांचा काय प्रभाव पडतो, हा आता कळीचा प्रश्न आहे. नव्या कृषी कायद्यांना, कम्युनिस्ट पक्ष वगळता तत्वतः कोणत्याच राजकीय पक्षांचा विरोध नाही. पण विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा स्वभाव नसल्याने मोदींच्या सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत नाही. शेती कायद्यांना कडवा विरोध पंजाबमधील शेतकऱ्यांचा आहे व टिकैत यांच्यासाठी तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची प्रतिष्ठा त्यांनी स्वतःशी जोडली आहे. टिकैत यांचा प्रभाव कमी करणे मोदींना जमलेले नाही. शेती कायद्याबाबत सरकार आता इतके खाली उतरले आहे की, आणखी खाली येण्याची शक्यता नाही. मोदींच्या वतीने शेतकऱ्यांशी बोलू शकेल, असा नेता भाजपमध्ये नाही. अशा आवर्तात मोदी सापडले आहेत. समस्येची उकल केवळ डावपेचातून होत नाही तर विश्वासाची सांधेजोडही करावी लागते. ती करण्याचा मार्ग मोदींच्या भाषणातून दिसला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतManmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेस