शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
4
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
5
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
6
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
7
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
9
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
10
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
11
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
12
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
13
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
14
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
16
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
17
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
18
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
19
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
20
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 4:16 AM

घाशीराम कोतवाल, अनैतिक, बेबंद कारभार व त्याला असलेल्या नाना फडणवीस यांच्या आशीर्वादाचे उत्तम चित्रण आहे. या सर्व घटना घडून २४४ वर्षे झाली तरी परिस्थितीत तसूभरही बदल झालेला नाही.

 काही प्रवृत्ती कालातीत असतात. भर राजसभेत द्रौपदीची वस्त्रे फेडणाऱ्या दु:शासनाची प्रवृत्ती जशी आपल्याला वरचेवर अनुभवास येते तशीच घाशीराम कोतवाल हीदेखील प्रवृत्ती आहे. पेशवाईतील नाना फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्यात घाशीरामाला पोलीसप्रमुख नेमला होता. मोरोबा कान्होबा या लेखक व इतिहास संशोधकांच्या ग्रंथात घाशीरामाच्या अनैतिक, बेबंद कारभार व त्याला असलेल्या नाना फडणवीस यांच्या आशीर्वादाचे उत्तम चित्रण आहे. या सर्व घटना घडून २४४ वर्षे झाली तरी परिस्थितीत तसूभरही बदल झालेला नाही.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर कार्यक्रमात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची केलेली बदली ही नैमित्तिक नसून त्यांच्याकडून झालेल्या काही अक्षम्य चुकांमुळे केल्याचे जाहीर केल्यानंतर परमबीर यांच्यातील आक्रमक ‘पोलीसवाला’ जागृत झाला. देशमुख यांनी पोलीस दलातील तुलनेने फारच कनिष्ठ अधिकारी असलेल्या सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा सनसनाटी आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयास लिहिले व हेतूत: माध्यमांना दिले. यामुळे देशमुख अडचणीत येणे स्वाभाविक आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडे प्रभावी संख्याबळ असून, समाजमाध्यमांवरील बोलक्या मध्यमवर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. संजय राठोड किंवा सचिन वाझे प्रकरणात जेव्हा सत्ताधारी या दोघांची पाठराखण करू पाहत होते तेव्हा भाजपने याच बळाचा वापर करून सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचे वातावरण निर्माण करून दोघांनाही पायउतार होण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप हा मुद्दा तापवत ठेवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.  

शरद पवार यांनी मोठ्या खुबीने देशमुख यांच्या चौकशीचा व भवितव्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला आहे. अगदी अलीकडे पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याकरिता भाजपने आंदोलन केले. मात्र आज तेच भाजपचे नेते पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत गप्प आहेत. त्यामुळे पूजाला न्याय मिळणे दुर्लक्षित राहिले व केवळ राठोड घरी बसले. देशात काही वर्षांत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्या. त्यामध्ये किरकोळ लोकांना अटक केली गेली. मात्र सूत्रधार मोकाट राहिले. ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या संशायस्पद मृत्यूबाबत तेच घडण्याची दाट शक्यता आहे.

भाजपने गेल्या सहा वर्षांत देशात काही नरेटिव्हज सेट केली आहेत. म्हणजे विशिष्ट पक्ष हे भ्रष्ट पक्ष आहेत, अमुक नेता ‘पप्पू’, तर तमुक नेता ‘पार्टी अनिमल’ आहे वगैरे. त्यामुळे भाजपविरोधी सरकारची किंवा व्यक्तींची कुठलीही कृती ही त्या नरेटिव्हला पोषक ठरली की, ते भाजपच्या पथ्यावर पडते. मुंबईतील डान्सबार, बार, हॉटेल यांच्याकडून अनेक नियमांचे उल्लंघन झालेले असल्याने पोलीस, महापालिका यांना नैमित्तिक हप्ते दिले जातात हे वैश्विक सत्य आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात ही हप्तेबाजी पूर्णपणे बंद होती, असे छातीठोकपणे सांगण्याची हिंमत भाजप नेतेही करणार नाहीत. किंबहुना पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांपासून भ्रष्टाचार सुरू होतो. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने हे घडले असावे. परमबीर सिंग यांनी आयुक्तपदावर असताना हे पत्र लिहिले असते तर ते अधिक सचोटीचे ठरले असते. कारवाई झाल्यानंतर पत्र लिहिणे ही पश्चातबुद्धी आहे. यापूर्वी सुबोध जयस्वाल यांनीही पोलिसांच्या बदल्यांबाबत एक स्फोटक अहवाल दिला होता. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपल्या अहवालावर कार्यवाही न झाल्याने जयस्वाल केंद्र सरकारच्या सेवेत गेल्याचा दावा फडणवीस यांनी केला. गेल्या सहा वर्षांत समाजात आमचे-तुमचे हा दुभंग निर्माण झाला आहे तसा तो आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही निर्माण झाला आहे. काही अधिकारी हे भाजपच्या खूप जवळ असल्याची उघड चर्चा होते, हे दुर्दैवी आहे. नोकरशहांना राजकीय मते असली तरी ती त्यांच्या वर्तनातून प्रकट व्हायला नको. मात्र गुप्तेश्वर पांड्ये असो की, सत्यपाल सिंह ही त्याची ढळढळीत उदाहरणे आहेत. जगभर प्रतिष्ठा असलेल्या मुंबई पोलीस दलाची मान या घटनांमुळे शरमेने खाली गेली आहे. मुळात हे सर्व प्रकरण ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली मोटार ठेवण्यातून व मनसुख हिरेन यांच्या हत्येतून उद‌्भवले आहे. या दोन्ही घटनांचा सखोल तपास व्हायला हवा. आणि सर्व संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या तात्काळ आवळल्या जायला हव्यात.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखMumbai policeमुंबई पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा