शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

विदर्भाच्या मागासलेपणाच्या भळभळत्या जखमेवर ठाकरे सरकारनं मीठच चोळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 05:43 IST

विदर्भ राज्याची मागणी विदर्भावरील अन्यायातून समोर आली. नागपुरात अधिवेशनच न घेणे हा आजवर होत आलेल्या घोर अन्यायाचाच एक भाग आहे.  

विदर्भाच्या जखमेवर मीठ 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यासाठी सरकारने जी कारणे दिली आहेत ती हास्यास्पद तर आहेतच, पण विदर्भाला उद्वेग आणणारी आहेत. काय तर म्हणे, नागपूरच्या आमदार निवासातील एका इमारतीत कोविड सेंटर आहे म्हणून तिथे आमदारांच्या निवासाची व्यवस्था करता येणार नाही. सरकारने ठरविले तर रात्रीतून व्यवस्था उभी राहाते आणि बहाणेबाजी करायची तर कुठलाही तर्क देता येतो. मुंबईतील मनोरा आमदार निवास चार वर्षांपासून पाडलेले आहे. जवळपास तेवढ्याच काळापासून मॅजेस्टिक आमदार निवास बंद आहे. तेथे आधी राहणाऱ्या दीड-दोनशे आमदारांना महिन्याकाठी एक लाख रुपये देऊन त्यांची फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. महिनोगणती अशी व्यवस्था केली जाऊ शकते, तर मग नागपुरातही आमदारांना हॉटेलांमध्ये चार आठवडे थांबविता आले असतेच. तसेही किती आमदार हे नागपूरच्या आमदार निवासात राहतात? बहुतेकांचे कार्यकर्तेच तेथे मुक्काम ठोकून असतात. मूळ प्रश्न अधिवेशन नागपुरात घेण्याच्या सरकारच्या मानसिकतेचा असून ती मानसिकताच दिसत नसल्याने बहाणे केले जात आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते आणि दोन्ही सभागृहांतील सदस्य उपस्थित राहू शकतील एवढे सभागृह नागपूरच्या विधानभवनात नाही हे दुसरे एक तकलादू कारण. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणारे हे पहिलेच सरकार ठरले असते. या सरकारने  एकच अधिवेशन नागपुरात घेतले. नंतर कोरोनाचे कारण देत ठेंगा दाखविला. २७ महिन्यांपासून सरकार नागपुरात गेलेले नाही. खर्चाचे कारण देत असाल तर ‘होऊ द्या खर्च...’ म्हणत होत असलेल्या उधळपट्टीची सरकारी यादीही मोठी आहे. त्या तुलनेने अधिवेशनाचा खर्च नगण्य अन‌् वाजवीच आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी नागपूर हे सी. पी. अँड बेरार प्रांताच्या राजधानीचे शहर होते. राजधानीचे कुंकू पुसून मोठे मन करीत विदर्भ महाराष्ट्रासोबत गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखही आहेत आणि त्यांच्या पक्षाचा विदर्भ राज्याला असलेला विरोध सर्वश्रूत आहे. विदर्भ राज्याची मागणी विदर्भावरील अन्यायातून समोर आली. नागपुरात अधिवेशनच न घेणे हा आजवर होत आलेल्या घोर अन्यायाचाच एक भाग आहे.  

या सरकारच्या नकाशात विदर्भ नाहीच की काय? मुंबईतील गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकही क्षण सभागृहात गेले नव्हते, तरी अधिवेशन झालेच ना? आताही त्यांच्या प्रकृतीचे कारण असेल तर ते चार आठवड्यात दोन-तीन वेळा नागपुरात येऊ शकले असते. ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी विदर्भावरील अन्याय दूर केला नाही तर विदर्भ राज्य देईन’, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रामटेकच्या सभेत म्हटले होते. हा अन्याय त्यांच्या युती सरकारमध्येच नव्हे, तर नंतरच्या प्रत्येक सरकारमध्ये कायम राहिला आहे. विदर्भाचा अनुशेष किती, राज्यपालांच्या सुत्रांनुसार विदर्भाला निधीचे वाटप झाल्यानंतर त्यातील किती निधी पश्चिम महाराष्ट्र वा इतरत्र पळविला, याची इत्यंभूत  माहिती देणारी यंत्रणा विदर्भ वैधानिक विकास मंडळामुळे उपलब्ध होती. तीच दोन वर्षांपासून बंद पाडली आहे. या मंडळाचा कार्यकाळ वाढविण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवायलाही सरकार तयार नाही.

सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवार यांनी  या मंडळाच्या आवश्यकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे आता मंडळांना मुदतवाढ न मिळण्यामागे कोण आहे, हेदेखील लपून राहिलेले नाही. अधिवेशन नागपुरात न घेणे, विकास मंडळांना मुदतवाढ न देणे अशामुळे शिवसेना विदर्भविरोधी आहे आणि राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रवादी आहे, या भाजपच्या टीकेला बळच मिळते. महाराष्ट्रात सामील होताना झालेल्या नागपूर करारातच नागपूरमध्ये दरवर्षी एक विधिमंडळ अधिवेशन भरेल आणि सरकार त्या निमित्ताने नागपुरात राहील, असे स्पष्टपणे नमूद केले होते. नागपुरात अधिवेशन म्हटले की, विदर्भातील प्रश्नांची (निदान) चर्चा होते. मात्र, आता अधिवेशनच होत नसल्याने हे सारे बासनात गुंडाळले जाणार आहे. अधिवेशन पळवून सरकारने आजही कायम असलेल्या विदर्भाच्या मागासलेपणाच्या भळभळत्या जखमेवर मीठच चोळले आहे.  कोरोनामुळे अधिवेशन झाले नसले तरी विदर्भाला पॅकेज देणारच, असा मनाचा मोठेपणा सरकारने गेल्या वर्षी दाखविला नव्हता. नागपूर अधिवेशनाला यंदाही खो देणाऱ्या ठाकरे सरकारने किमान यंदा तरी ते औदार्य दाखवावे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार