शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

भ्रष्टाचाराच्या तक्रारीत महाराष्ट्र अव्वल पण शिक्षा देण्यास विलंब हे चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 08:36 IST

महाराष्ट्रात भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी होण्याचे प्रमाण मोठे असूनही शिक्षेची टक्केवारी खूप कमी असण्यामागे खटला चालण्यास होणारा विलंब हे प्रमुख कारण आहे.

भ्रष्टाचारात सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राने पहिला क्रमांक राखला आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरोच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीने ही वस्तुस्थिती समोर आणली आहे. देशात २०१६, २०१७ आणि २०१८ या तीनही वर्षी, भ्रष्टाचाराची जेवढी प्रकरणे नोंदविली गेली, त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदविली गेली. महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद बाब ही, की राज्यात २०१८मध्ये भ्रष्टाचाराच्या नोंद झालेल्या प्रकरणांपैकी केवळ १५ टक्के प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा झाली. देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्राला ही वस्तुस्थिती नक्कीच मान खाली घालायला लावणारी आहे. देशात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदविली जाणे ही महाराष्ट्रासाठी गौरवशाली नसली तरी नामुश्कीचीही बाब नाही; मात्र आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत खाली घसरणे नक्कीच चिंताजनक आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत अप्रगत असलेल्या राज्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या कमी प्रकरणांची नोंद झाली, याचा अर्थ त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा भ्रष्टाचार कमी आहे, असा अजिबात होत नाही. त्या राज्यांमधील जनता भ्रष्टांच्या विरोधात तक्रारी नोंदविण्याची हिंमत दाखवत नाही, हा त्याचा अर्थ! महाराष्ट्रातील नागरिक भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतात म्हणून आपल्या राज्यात सर्वाधिक प्रकरणे दाखल झाली आहेत; तथापि, नागरिकांनी तक्रारी करण्याची हिंमत दाखवूनही भ्रष्टांना शिक्षा होत नसेल, तर उद्या महाराष्ट्रातील नागरिकही गुपचूप बसणे पसंत करतील! महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये तक्रारींची नोंद होण्याचे प्रमाण बरेच कमी असले तरी, दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे. महाराष्ट्रात २०१८मध्ये एकूण ९३० प्रकरणांची नोंद झाली आणि त्यापैकी ३७४ प्रकरणांमध्ये सुनावणी पूर्ण होऊन केवळ ५६ जणांना शिक्षा झाली. दुसरीकडे त्याच वर्षात मध्य प्रदेशमध्ये ३१० प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन, तब्बल २२४ जणांना शिक्षा झाली. ही तुलनात्मक आकडेवारी अत्यंत बोलकी आहे.

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी यासंदर्भात व्यक्त केलेली खंत आणि चिंतेची राज्यातील सत्ताधाºयांनी गंभीर दखल घ्यायला हवी. गेल्या शतकातील नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण बरेच जास्त होते आणि त्यामुळे आताची घसरलेली टक्केवारी धक्कादायक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अ‍ॅण्टिकरप्शन ब्युरोच्या प्रमुखाचे पद रिक्त ठेवणे, अधिकाºयांची नेमणूक गुणवत्तेच्या आधारे न करता मर्जीतील अधिकारी नेमणे, राजकीय नेत्यांच्या मर्जीप्रमाणे चौकशी बंद करणे आदी कारणांमुळे ही परिस्थिती ओढवल्याचे निरीक्षण बोरवणकर यांनी नोंदविले आहे. महाराष्ट्रात भ्रष्ट अधिकारी-कर्मचाºयांच्या विरोधात तक्रारी होण्याचे प्रमाण मोठे असूनही शिक्षेची टक्केवारी खूप कमी असण्यामागे, खटला चालण्यास होणारा विलंब हे प्रमुख कारण आहे.

बरेचदा आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी सुरू होण्यात बराच काळ निघून जातो. त्यामुळे सुनावणी सुरू होईपर्यंत बºयाच गोष्टी बदललेल्या असतात. कधी कधी तर तपास अधिकारीच सेवानिवृत्त झालेला असतो. एवढा उशीर झाल्याने अनेकदा तक्रारदाराचाही प्रकरणातील रस संपलेला असतो किंवा आरोपीने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्याच्याशी संधान साधलेले असते! भ्रष्टाचाºयांचे काहीही वाकडे होत नाही, हा संदेश सर्वसामान्य जनता आणि भ्रष्टाचाराची संधी उपलब्ध असलेल्यांमध्ये जाणे ही अत्यंत घातक गोष्ट आहे. त्याचे दोन परिणाम संभवतात. पहिला हा की, सर्वसामान्य जनता भ्रष्टाचाºयांची तक्रार करण्यास पुढे येणार नाही आणि दुसरा हा की, भ्रष्टाचारी निर्ढावतील! त्याचा एकत्रित परिणाम असा होईल, की भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात बोकाळेल. भ्रष्टाचार ही अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी असते. भ्रष्टाचारामुळे अंतत: संपूर्ण अर्थव्यवस्थाच पोखरली जाते. जगात यापूर्वी अनेक देशांमध्ये हे घडले आहे. आपल्या देशात त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल, तर राज्यकर्ते आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच सावध झालेले बरे!

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस