शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:21 IST

देशात लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय पक्ष आहेत, पण ते पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे. त्याचे सभासद असे स्वत:ला बाजारात मांडून बसले आणि मिळेल त्या किमतीत विकले जाऊ लागले, तर पक्ष आणि लोकशाहीही टिकणार नाही.

कर्नाटकात भाजपचे घोडे न्हाले आहे. तेथे सत्तारूढ असलेले जेडीएस व काँग्रेसचे सरकार १८ महिन्यांच्या कालावधीनंतर उलथविण्यात व त्या जागी आपण खरेदी केलेल्या दोन पक्षांच्या आमदारांच्या मदतीने आपले सरकार स्थानापन्न करण्यात तो पक्ष यशस्वी झाला आहे. कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तरी बहुमताला आवश्यक एवढे आमदार त्याच्याजवळ नव्हते. तरीही तेथील राज्यपालांनी भाजपच्याच येडियुरप्पांना त्यांचे सरकार बनविण्याचे निमंत्रण दिले. १५ दिवस सत्तेवर राहून ते सरकार अपेक्षेप्रमाणे पडले व काँग्रेसने, आपला पक्ष मोठा असतानाही, जेडीएसच्या कुमारस्वामींना पाठिंबा दिल्याने त्यांचे सरकार सत्तेवर आले.

१८ महिन्यांत या सरकारवर कोणताही मोठा आरोप नव्हता वा त्याच्या कोणत्याही चुका दाखविणे भाजपला जमले नव्हते, परंतु सत्तेवाचून तळमळणारे त्याचे पुढारी येडियुरप्पा थेट पहिल्या दिवसापासून कुमारस्वामींचे सरकार पाडण्यास व त्यासाठी वाटेल ती किंमत मोजून आमदारांची खरेदी करण्याच्या तयारीला लागले होते. सारा देश आपल्या झेंड्याखाली आणण्याच्या महत्त्वाकांक्षेने ग्रासलेल्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचाही अर्थातच त्यांना पाठिंबा होता. मग त्यांनी फोडलेले आमदार पळविले. त्यांना प्रथम मुंबईत व नंतर गोव्यात नेऊन त्यांची सरबराई केली. तशाही आपल्या आमदार व खासदारांच्या पक्षनिष्ठा आता विकाऊच झाल्या आहेत. त्यांना मतदारांची भीती नाही आणि त्यांच्यावर पक्षाच्या नेतृत्वाचे वजन नाही. त्यामुळे पक्ष कोणताही असला, तरी आपल्या लहरीनुसार फुटणे व आमिषांना बळी जाण्याची त्यांना फारशी शरम राहिली नाही. या बेशरमपणावर येडियुरप्पा यांना आपले सरकार आणण्याचा विश्वास वाटत होता व तो खराही ठरला.

त्यातून जेडीएस पक्षाचे ज्येष्ठ नेते एच.डी. देवेगौडा यांचे पक्षातील वजन आता कमी झाले आहे. एकेकाळी पंतप्रधान राहिलेल्या या नेत्याची आजची स्थिती जेवढी दयनीय तेवढीच हास्यास्पद आहे. काँग्रेसचे कानडी नेते सिद्धरामय्या हे एक यशस्वी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या वाट्याचे मुख्यमंत्रिपद कुमारस्वामींना, त्यांचा पक्ष लहान असतानाही देऊ केला. त्यांच्यावर पक्षाचा विश्वास होता. मात्र, त्यांचेही काही आमदार घोडेबाजारात उतरले व येडियुरप्पाच्या कारस्थानात सामील झाले. त्यामुळे कर्नाटकात जे घडले ते राजकारण नाही, ते कारस्थान आहे. सत्तेवरील चांगले काम करीत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांना आमिष दाखवून फोडणे हा घडवून आणलेला अपघात आहे. दुर्दैवाने अशा अपघातापासून आपला एकही पक्ष दूर राहिला नसल्याने, येडियुरप्पा यांचे याबाबतचे पाप सार्वत्रिक म्हणावे असे आहे. देशात लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय पक्ष आहेत, पण ते पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकणार आहे. त्याचे सभासद असे स्वत:ला बाजारात मांडून बसले आणि मिळेल, त्या मोबदल्यात विकले जाऊ लागले, तर पक्ष आणि लोकशाहीही टिकणार नाही.

या संपूर्ण प्रकारात येडियुरप्पांची महत्त्वाकांक्षा विजयी ठरली. त्यांनी कुमारस्वामींचा पराभव केला नाही, तर जेडीएस व काँग्रेससह लोकशाहीचाही पराभव केला आहे. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या पक्षाला त्याची कारस्थाने अशीच यशस्वी ठरावी, अशा शुभेच्छाही दिल्या पाहिजेत. काँग्रेस व जेडीएस दोन पक्ष आपले आमदार राखण्यात व त्यांची मर्जी सांभाळण्यात अपयशी झाले किंवा कमी पडले, याचा त्यांनाही दोष द्यावा लागेल. मात्र, त्याच वेळी त्या दोन्ही पक्षांची आर्थिक ताकद केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या तुलनेत कमी आहे. तात्पर्य, आपल्या लोकशाहीचे वारू असेच रखडत व लंगडत चालणार आहे. त्याचे हे दुबळेपण जावे, आपले लोकप्रतिनिधी अधिक पक्षनिष्ठ व लोकनिष्ठ व्हावे आणि त्यांनी आपली लोकशाही आजच्यासारखी अस्थिर न ठेवता स्थिर व दृढ करावी, ही अपेक्षा भविष्याबाबत व्यक्त करणे आवश्यक आहे. लोकांनी निवडलेली सरकारे काही माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे पडणार असतील, तर लोकशाहीला फारसे भवितव्य उरत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :BJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस