शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:42 IST

टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.

७ ऑगस्ट २०२१ हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. नीरज चोप्रा याने टोकियोत ऑलिम्पिकच्या मूळ मैदानी खेळांपैकी एक, भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकले. अथेन्स येथील १८९६च्या आधुनिक ऑलिम्पिकनंतर सव्वाशे वर्षांत भारताचे हे ॲथलेटिक्सचे पहिले पदक. मिल्खा सिंग, पी.टी. उषा वगैरे दिग्गजांना त्याने हुलकावणी दिली होती. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश इंडियाकडून खेळलेले नॉर्मन पिचार्ड यांची दोन रौप्यपदके आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ इंग्लंडची मानतो. नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज दुसराच. याशिवाय भारताला मिळाली ती आठही सुवर्णपदके सांघिक, हॉकीची. आठ वर्षांपूर्वीचा लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम टोकियोत मोडला गेला. चार दशकांनंतर हॉकीचे कांस्य व नीरजचे सुवर्णपदक हा ऐतिहासिक यशाचा कळस. मीराबाई चानू व रवीकुमार दहिया यांची रौप्यपदके आणि पी. व्ही. सिंधू, लवलीना बोरगोहेन, बजरंग पुनिया यांची कांस्यपदके अशी टोकियोची एकूण कमाई सात पदकांची. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी.

टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. गरिबी, निरक्षरता, कुपोषण, अनारोग्य वगैरे मूलभूत समस्यांचा सामना करणाऱ्या भारतात केवळ लोकसंख्या प्रचंड आहे म्हणून जगज्जेते खेळाडू तयार होतील, असे नाही. मूलभूत प्रश्न आधी सोडविणे महत्त्वाचे. अशीच प्रचंड लोकसंख्या असलेला चीनदेखील गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडल्यानंतरच क्रीडा महासत्ता बनू शकला. पदकतालिकेतील वरच्या देशांशी भारताची तुलना शक्य नाही. आर्थिक संपन्नता व शारीरिक क्षमतांची जनुकीय वैशिष्ट्ये यांची सांगड घातली जाते तेच देश जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करतात. आफ्रिकन, मंगोलियन, युरोपियन खेळाडूंच्या क्षमतांपुढे दक्षिण आशियातील खेळाडू कमी पडतात. तरीदेखील आर्थिक महासत्ता बनू पाहणारा भारत क्रीडा विश्वगुरू का बनू शकत नाही, हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे.
एकतर क्रिकेट हा देशाच्या क्रीडा विकासात मोठा अडथळा आहे. इतर खेळांचा पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, वलय सारे काही क्रिकेटने बळकावले आहे. पंधरा दिवस ऑलिम्पिकची चर्चा झाली तेवढेच. मॅच फिक्सिंगसारखी कीड लागल्यानंतरही क्रिकेटचा बाजार थांबला नाही. क्रिकेटची मैदाने व स्टेडियमवर जितका खर्च केला त्याच्या चौथा हिस्सा जरी अन्य खेळांवर केला असता तर आतापर्यंत डझनांनी ऑलिम्पिक पदके आली असती. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आदी प्रगत, संपन्न राज्यांचे क्रिकेटशिवाय अन्य खेळांकडे अजिबात लक्ष नाही. क्रिकेटसह देशातील प्रत्येक खेळ, नव्हे प्रत्येक कृतीत नको तितके राजकारण घुसले आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहिली जाते. खेळाडूंच्या मेहनतीचे फुकट श्रेय घेणारे राजकारणी व त्यांना ते देऊ पाहणारे नागरिक दोन्हीही याला जबाबदार आहेत. याशिवाय, सगळ्याच जागतिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंचे वय खूप महत्त्वाचे असते. कॅच देम यंग किंवा अगदी चार-सहा वर्षे वयाचे उगवते खेळाडू शोधणे व त्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करणे ही प्रक्रिया भारतात जवळपास नाहीच. शालेय स्पर्धा औपचारिकता म्हणून पार पडतात. टोकियोतल्या यशाला खेलो इंडिया स्पर्धेचा फायदा झाला; पण हा अपवाद आहे. तिसरे कारण खेळांच्या पायाभूत सुविधांचा अभाव. सरकार, बडे उद्योग, अन्य संस्थांनी एकत्र येऊन या सुविधा दिल्या तरच चॅम्पियन्स घडतील. तसे होत नसल्याने ऑलिम्पिक पदकविजेत्यांची संख्या एका किंवा दोन हातांच्या बोटांवर मोजावी लागते.सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे. तेव्हा उद्योजकांनी समोर यायला हवे. नीरज चोप्राला जिंदाल समूहाने बळ दिले. इतरही उद्योग अशी मदत करतात. पण, ती वाढायला हवी. महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना भव्यदिव्य, जग जिंकण्याची स्वप्ने पडायला हवीत. ती सत्यात उतरविण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसायची तयारी हवी. ईशान्य भारतातील खेळाडूंचा आदर्श या बाबतीत घ्यायला हवा. रडगाणे गाण्याऐवजी प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द हवी. इतिहास घडविणारा नीरज चोप्रा चौदाव्या वर्षी घरातून बाहेर पडतो. भाल्याला सर्वस्व वाहून घेतो. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतरही त्याची भूक शमलेली नसते. यशाच्या शिखरावर असतानाही त्याला जागतिक विक्रम खुणावतो. ही अशी जिद्द अंगात असेल तरच कष्टाला, स्वप्नांना सोनेरी भाले फुटतात व सन्मानांची माळ गळ्यात पडते.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्रा