शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ऑलिम्पिकमध्ये उगवतीची सोनेरी पहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:42 IST

टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे.

७ ऑगस्ट २०२१ हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. नीरज चोप्रा याने टोकियोत ऑलिम्पिकच्या मूळ मैदानी खेळांपैकी एक, भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकले. अथेन्स येथील १८९६च्या आधुनिक ऑलिम्पिकनंतर सव्वाशे वर्षांत भारताचे हे ॲथलेटिक्सचे पहिले पदक. मिल्खा सिंग, पी.टी. उषा वगैरे दिग्गजांना त्याने हुलकावणी दिली होती. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश इंडियाकडून खेळलेले नॉर्मन पिचार्ड यांची दोन रौप्यपदके आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ इंग्लंडची मानतो. नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज दुसराच. याशिवाय भारताला मिळाली ती आठही सुवर्णपदके सांघिक, हॉकीची. आठ वर्षांपूर्वीचा लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम टोकियोत मोडला गेला. चार दशकांनंतर हॉकीचे कांस्य व नीरजचे सुवर्णपदक हा ऐतिहासिक यशाचा कळस. मीराबाई चानू व रवीकुमार दहिया यांची रौप्यपदके आणि पी. व्ही. सिंधू, लवलीना बोरगोहेन, बजरंग पुनिया यांची कांस्यपदके अशी टोकियोची एकूण कमाई सात पदकांची. भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी.

टोकियोत भारतीयांनी सोनेरी युगाची पहाट अनुभवली. अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड वगैरेच्या तुलनेत ही कामगिरी किरकोळ, तरी भारतीय खेळाडूंचे हे यश उद्याच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. गरिबी, निरक्षरता, कुपोषण, अनारोग्य वगैरे मूलभूत समस्यांचा सामना करणाऱ्या भारतात केवळ लोकसंख्या प्रचंड आहे म्हणून जगज्जेते खेळाडू तयार होतील, असे नाही. मूलभूत प्रश्न आधी सोडविणे महत्त्वाचे. अशीच प्रचंड लोकसंख्या असलेला चीनदेखील गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडल्यानंतरच क्रीडा महासत्ता बनू शकला. पदकतालिकेतील वरच्या देशांशी भारताची तुलना शक्य नाही. आर्थिक संपन्नता व शारीरिक क्षमतांची जनुकीय वैशिष्ट्ये यांची सांगड घातली जाते तेच देश जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करतात. आफ्रिकन, मंगोलियन, युरोपियन खेळाडूंच्या क्षमतांपुढे दक्षिण आशियातील खेळाडू कमी पडतात. तरीदेखील आर्थिक महासत्ता बनू पाहणारा भारत क्रीडा विश्वगुरू का बनू शकत नाही, हा प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे.
एकतर क्रिकेट हा देशाच्या क्रीडा विकासात मोठा अडथळा आहे. इतर खेळांचा पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, वलय सारे काही क्रिकेटने बळकावले आहे. पंधरा दिवस ऑलिम्पिकची चर्चा झाली तेवढेच. मॅच फिक्सिंगसारखी कीड लागल्यानंतरही क्रिकेटचा बाजार थांबला नाही. क्रिकेटची मैदाने व स्टेडियमवर जितका खर्च केला त्याच्या चौथा हिस्सा जरी अन्य खेळांवर केला असता तर आतापर्यंत डझनांनी ऑलिम्पिक पदके आली असती. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आदी प्रगत, संपन्न राज्यांचे क्रिकेटशिवाय अन्य खेळांकडे अजिबात लक्ष नाही. क्रिकेटसह देशातील प्रत्येक खेळ, नव्हे प्रत्येक कृतीत नको तितके राजकारण घुसले आहे. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहिली जाते. खेळाडूंच्या मेहनतीचे फुकट श्रेय घेणारे राजकारणी व त्यांना ते देऊ पाहणारे नागरिक दोन्हीही याला जबाबदार आहेत. याशिवाय, सगळ्याच जागतिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंचे वय खूप महत्त्वाचे असते. कॅच देम यंग किंवा अगदी चार-सहा वर्षे वयाचे उगवते खेळाडू शोधणे व त्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करणे ही प्रक्रिया भारतात जवळपास नाहीच. शालेय स्पर्धा औपचारिकता म्हणून पार पडतात. टोकियोतल्या यशाला खेलो इंडिया स्पर्धेचा फायदा झाला; पण हा अपवाद आहे. तिसरे कारण खेळांच्या पायाभूत सुविधांचा अभाव. सरकार, बडे उद्योग, अन्य संस्थांनी एकत्र येऊन या सुविधा दिल्या तरच चॅम्पियन्स घडतील. तसे होत नसल्याने ऑलिम्पिक पदकविजेत्यांची संख्या एका किंवा दोन हातांच्या बोटांवर मोजावी लागते.सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे. तेव्हा उद्योजकांनी समोर यायला हवे. नीरज चोप्राला जिंदाल समूहाने बळ दिले. इतरही उद्योग अशी मदत करतात. पण, ती वाढायला हवी. महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना भव्यदिव्य, जग जिंकण्याची स्वप्ने पडायला हवीत. ती सत्यात उतरविण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसायची तयारी हवी. ईशान्य भारतातील खेळाडूंचा आदर्श या बाबतीत घ्यायला हवा. रडगाणे गाण्याऐवजी प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द हवी. इतिहास घडविणारा नीरज चोप्रा चौदाव्या वर्षी घरातून बाहेर पडतो. भाल्याला सर्वस्व वाहून घेतो. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतरही त्याची भूक शमलेली नसते. यशाच्या शिखरावर असतानाही त्याला जागतिक विक्रम खुणावतो. ही अशी जिद्द अंगात असेल तरच कष्टाला, स्वप्नांना सोनेरी भाले फुटतात व सन्मानांची माळ गळ्यात पडते.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्रा