शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 02:58 IST

विकासाचा विचार, कार्यक्रम किंवा तात्त्विक नसली तरी किमान वैचारिक बैठक राजकारणाला स्थैर्य देते. आम्ही तीच गमावून बसलो आहोत. परिणामी, राजकारण अधांतरी बनले आहे. त्यात श्रद्धा, अंधश्रद्धा, देव आहेत. फक्त समाज नाही.

तत्त्वज्ञाने राजकारणातून कधीचीच बाद झाली आहेत. आता कुणी मार्क्सवादी नाही, समाजवादी नाही आणि गांधीवादीही नाही. असले तरी ते एकएकटे व सांदीकोपऱ्यात वा अधूनमधून वृत्तपत्रांत लिहून ‘आम्ही अजून आहोत’ हे सांगत असतात. विचारांभोवती माणसे येत नाहीत. त्यावर पक्ष संघटित होत नाहीत. एकेकाळचे वैचारिक पक्ष आता इतिहासजमा झाले व त्यांची जागा धर्म व जातीसारख्या जन्मदत्त बाबींनी घेतली. धर्म व जातीवर आधारलेल्या पक्षांना विचार नको असतो. तत्त्वज्ञानाचा तर त्यांना गंधही नसतो. एक नेता व त्याचे भाषण त्याला सांभाळायला पुरेसे असते. भारतात अडीचशेहून अधिक पक्ष आहेत. त्यातल्या किती जणांना तरी त्यांचा वैचारिक कार्यक्रम सांगता येतो? काही पक्ष तर एखादी व्यक्ती किंवा तिचा अहंकार यामुळेही निर्माण झालेले आपण पाहतो. एका विशिष्ट काळानंतर त्यांचा मुद्दा संपून गेला, की तो पक्ष-त्याचे अस्तित्वही त्याच पद्धतीने विरून जाते. भाषक अस्मिता किंवा त्या पद्धतीचा हुंकार देत स्थापन झालेल्या पक्षांचे स्वरूप कालांतराने कसे बदलेले हेही आपल्या लोकशाही व्यवस्थेने पाहिले. त्यांनी अनेकदा तो मूळ मुद्दा सोडून दिल्याचे दिसून आले,

तर कधी सोईस्कररीत्या त्याला बगल देत नवा मुद्दा हाती घेत त्याची भलामण केल्याचे पाहायला मिळाले. कधी एका दिवंगत महापुरुषाचे नाव सांगायचे, जातींचा आधार घ्यायचा. आरक्षणाची मागणी करायची आणि त्या साऱ्याला पक्षाचे नाव द्यायचे? आता भांडवलशाही नाही, समाजवाद नाही, मार्क्सवाद नाही आणि तसला विचार बाळगणारेही त्यांचा उच्चार करीत नाहीत. गांधी, आंबेडकर किंवा सावरकर यांची नावे चालतात. हिंदू, मुसलमान वा जातींची नावे चालतात. मात्र त्यांचे विचार त्यांच्या कुंपणापल्याड जात नाहीत. एकेका प्रश्नासाठी वा समूहासाठी येणाऱ्या संघटनांचे आयुष्य तरी केवढे असणार? प्रथम स्वातंत्र्यलढ्यात पक्ष निर्माण झाले. पुढे त्या काळातील विचारांचे विरोधक झाले. आता तो लढा नाही आणि त्याचे विरोधकही नाहीत. मध्यंतरी धर्माचे स्तोम माजविले गेले व धर्मवादी पक्ष आले. जनसंघ किंवा भाजप, अकाली किंवा नॅशनल कॉन्फरन्स, रिपब्लिकन किंवा बसपा यांचे नेमके स्वरूप वैचारिक नाही. ते धार्मिक, जातीय वा असलेच तर प्रादेशिक आहे.

धर्मांचे आयुष्य जरा मोठे म्हणून हे पक्ष टिकतात. पुढे मंडल आयोगानंतर जाती व पोटजातींचे पक्ष आले. आजही त्यांचा बुजबुजाट मोठा आहे. पासवान, लालू, नितीश, मुलायम आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी हे पक्ष व त्यांचे तसेच सोबती साऱ्या देशात आहेत. येथे संघटित लोकशाही किंवा द्विपक्ष पद्धती कशी येणार? विचार संवादाने साधता येतो, तो परस्परांच्या गळी उतरविता येतो. पण जाती-धर्माचे कसे करणार? आता त्याला पर्याय म्हणून क्षेत्रावर आधारलेले पक्ष तयार होत आहेत किंवा काही जुने पक्ष द्वेषाचा आधार त्यांच्या राजकारणासाठी घेऊ लागले आहेत. मग ते अल्पसंख्याकांचा राग करतात, दलितांवर रोष धरतात, ब्राह्मणांवर हल्ले चढवितात. आजही जात व धर्म सोडून बाकीच्यांना दोषी धरण्याचे राजकारण समाज तोडणारे व त्यात दुही माजविणारे असते. गांधी व आंबेडकरांसारखी माणसे ऐक्याचे राजकारण करू शकतात ते राष्ट्रवादी होतात. पण आताचे ममता, मुलायम, लालू, चंद्राबाबू किंवा शरद पवार हे कसे होणार? त्यासाठी राष्ट्रीय संघटन लागते किंवा राष्ट्रीय विचार लागतो. तो फक्त काँग्रेसजवळ आहे. भाजप हा पक्ष मोठा असला तरी त्याचा आधार विचार नाही. धर्मश्रद्धा आहे. पण सध्या धर्म व जातीची भाषा चालते.

ती अशिक्षितांहुनी सुशिक्षितांना अधिक भावते. हे नवशिक्षित व नवश्रीमंतांचे वर्ग विचारांमागे कधी जाणार की तेथेच राहून आहे तसेच आपल्या पुढल्या पिढ्यांनाही बनविणार? कार्यक्रम, विकासाचा विचार किंवा तात्त्विक नसली तरी किमान वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे. आम्ही तीच गमावून बसलो आहोत. परिणामी, राजकारण अधांतरी बनले आहे किंवा नुसतेच पूजा, आरत्या, बॅण्डबाजे, ईश्वर आणि अल्ला यातच गुंतले आहे. त्यात माणसे नाहीत. श्रद्धा आहेत, अंधश्रद्धा आहेत, देव आणि श्रद्धा आहेत. फक्त समाज नाही.

टॅग्स :IndiaभारतPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस