शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
7
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
8
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
9
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
10
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
11
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
12
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
13
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
14
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
15
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
16
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
17
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
18
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
19
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
20
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या झोपेची ‘शाळा’; वेळा बदलताना पालकांची गैरसोय तर होणार नाही ना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 08:06 IST

मुलं लवकर झोपतच नाहीत हा खरा प्रश्न आहे. झोपेचे तास कमी होतात, त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, एकाग्रतेवर, अभ्यासासह सामाजीकरणावर होतो. मुलं पेंगतात, चिडतात, त्यांना ताजंतवानं वाटत नाही, त्यांचा अटेंशन स्पॅन कमी झाला आहे, अभ्यास  झेपत नाही.

‘सकाळी लवकर उठणं’ हे मोठ्यांसाठीही मोठं कष्टप्रद काम असतं. ते काम लहान मुलांना मात्र रोज करावं लागतं. सकाळची शाळा ही बालपणीच्या आठवणीतली एक बोचरी गोष्ट असते. सकाळी साखरझोप मोडून उठायचं आणि भरभर आवरून शाळेत जायचं हे काम तसं ‘नावडीचंच!’ सांग-सांग भोलानाथ शाळा उशिरा भरेल काय? असं काही बालगीत नसलं तरी आता दुसरीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सकाळी ९ नंतर भरतील आणि मुलांनी अजिबात भल्या सकाळी शाळा गाठू नये, असा निर्णय सरकार दरबारी घेतला जातो आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यपालांनीही मुलांच्या सकाळच्या शाळांविषयी चिंता व्यक्त केली होती. आता मुलांचं शाळकरी जगणंच नर्सरीत असल्यापासूनच सुरू होतं.  म्हणजे साडेतीन वर्षांचं मूल सकाळी सात-साडेसात-आठ वाजताची शाळा गाठायला भल्या सकाळी शाळेची बस, रिक्षा, व्हॅन यासारख्या वाहनांत कोंबून रवाना होतं. त्यापूर्वी घरोघर मुलांना झोपेतून उठवण्यासाठी आईबाबा जंगजंग पछाडतात. उठा-उठाचा गजर सुरू असतो; पण मुलांची झोप काही पुरी होत नाही आणि मग रागावणे-मारणे-चिडणे यावळणाने रोज रामप्रहरी घराचं रूपांतर समरांगणात होतं. मात्र, मुळात प्रश्न सकाळी लवकर उठण्याचा आहे का? तर तमाम बालरोगतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सतत सांगतात की प्रश्न गंभीर आहे तो मुलांच्या झोपेचा.

मुलं लवकर झोपतच नाहीत हा खरा प्रश्न आहे. झोपेचे तास कमी होतात, त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, एकाग्रतेवर, अभ्यासासह सामाजीकरणावर होतो. मुलं पेंगतात, चिडतात, त्यांना ताजंतवानं वाटत नाही, त्यांचा अटेंशन स्पॅन कमी झाला आहे, अभ्यास  झेपत नाही यासाऱ्याचं मूळ कमी झोप आणि झोपण्यापूर्वी त्यांच्या समोर सतत हलणारे मोबाइल - टीव्हीचे स्क्रीन्स असतात. या समस्येचं सुलभीकरण करायचं तर सरसकट पालकांना आणि मोबाइलला दोष देता येईल की, पालक मुलांच्या हातात मोबाइल देतातच का? मुलांना टीव्हीसमोर बसवतातच का? मात्र, दोष देऊन प्रश्न सुटले असते तर काय हवं होतं? तसं होत नाही कारण या साऱ्याचं मूळ आजच्या बदललेल्या जीवनशैलीत आहे. पालकांच्या नोकऱ्या किमान आठ तासांच्या, मोठ्या शहरांत तर प्रवासाचा वेळ किमान दोन तासांचा. पालक दिवसाकाठी १२ -१४ तास घराबाहेर असतात. ऑफिस गाठायचं म्हणून सकाळी भरभर आवरून, मुलाला शाळेत रवाना करून आई स्वत: ऑफिसला जाते किंवा मुलांना पाळणाघरात सोडून गाड्यांच्या वेळा गाठते. शाळेत मुलं अडकलेली असतात ते ठीक; पण सकाळी पंच गाठण्यासाठी जिवाची शर्थ करणारे पालक जर मुलांच्या आधी घराबाहेर पडले तर शाळेच्या वेळेपर्यंत मुलं सांभाळायची कुणी? कुठे ठेवायची? आपल्याकडे पाळणाघरांसारख्या सोयी नाहीत. बालसंगोपनासाठी आवश्यक त्या कुठल्याच आधार व्यवस्था नाहीत. भल्या सकाळी तर उपलब्ध असलेलीही पाळणाघरंही उघडत नाहीत. मग मुलांच्या शाळेच्या वेळा बदलताना पालकांची गैरसोय होईल का हा प्रश्न दुर्लक्षितच राहतो.  

घरोघर अशा अवघड प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आईकडेच असतं कारण मुलांचं संगोपन, त्यांचा अभ्यास, शाळा, क्लासेस, खेळादीकलांचे क्लासेस हे सगळं करून संस्कारी मुलं घडवण्याची जबाबदारी आईचीच असते. दमछाक होईपर्यंत आईपालक धावत असतात आणि जरा मुलांना कमी गुण मिळाले किंवा वर्तनसमस्या आढळली की दोषही आईलाच दिला जातो.  मात्र, बदलत्या जीवनशैलीत नोकरीसह प्रवासाचे वाढलेले तास,  स्वयंपाक-जेवणं, घरकाम, मुलांचं अभ्यास, व्हॉट्सॲपसह घरी येणारे कामाचे ताण आणि वरिष्ठांचे आदेश हे सारं जुळवून घेत जगताना रोज झोपेची वेळ होताहोता मध्यरात्र झालेली असते. हा सगळा ताण अर्थातच मुलांवरही येतो. स्पर्धेच्या काळात आपले मूल मागे पडू नये म्हणून महागड्या शाळांमध्ये त्यांना घालणारे आणि प्रचंड फी भरणारे पालकही तितकेच अगतिक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे फक्त मुलांच्या शाळेची वेळ बदलली की मुलांना भरपूर झोप मिळेल आणि उशिरा शाळा हे मुलांच्या वाढीसाठी पोषक टॉनिक ठरेल, असा काही हा इन्स्टंट उपाय नाही.

नव्या जीवनशैलीने उभे केलेले हे नवे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं सापडत नाहीत हा खरा प्रश्न आहे. मुलांच्या शिक्षणाच्या आज ज्या अनेक गंभीर समस्या आहेत त्यापैकी काही समस्यांचं मूळ ताणानं पिचलेल्या नव्या जीवनशैलीतही आहे हे किमान मान्य केलं तर ही अवघड प्रश्नपत्रिका सोडवण्याचं सूत्र सापडेल. तोवर हा ताळा अपुराच राहणार...

टॅग्स :Schoolशाळा