शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

संपादकीय - शहाणे करून सोडावे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 06:09 IST

विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत

सत्ताकारणाच्या धुराळ्यात जेव्हा समाजकारणाचा विसर पडतो त्या वेळी राजकीय नेतृत्वाला भानावर आणण्याचे काम बुद्धिवंतांचे असते; परंतु सध्याचा काळ हा तथाकथित बुद्धिवंतांचा आहे आणि त्यांचेही समाजभान हरवलेले असल्यामुळे या तथाकथित बुद्धिवंतांच्या टोळ्याही सत्ताकारणाची समीकरणे सोडविण्यात मश्गूल आहेत. खऱ्या बुद्धिवंतांची प्रभावळ या तथाकथित टोळ्यांनी झाकोळून टाकल्याने प्रसारमाध्यमांनाही त्यांचा विसर पडलेला दिसतो; पण अशा परिस्थितीत वास्तवाची जाणीव लक्षात घेऊन इतरांना उपदेशाचे डोस न पाजता आपल्या कृतीतून सर्वांना संदेश देत वर्तमानाचे भान देण्याचे पाऊल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने उचलले आहे. गेल्या चार वर्षांचा दुष्काळ आणि या वर्षाचा ओला दुष्काळ या अस्मानी संकटाने मराठवाडा-विदर्भ पिचून गेला आहे.

विद्यापीठात उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीही या माºयातून सुटले नाहीत. त्यांच्यासमोर शिकण्यासाठी पैशाचा प्रश्न उभा राहिला आहे. गावाकडून पैसा येणार नाही हेच वास्तव आहे. अशाही परिस्थितीत अनेक विद्यार्थी कमवा-शिका योजनेतून काम करीत परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. अगदी विद्यापीठाची फळबाग, उद्यान येथेही निंदणी, खुरपणीची कामे हे विद्यार्थी करतात; पण या वर्षीची परिस्थिती आणखीनच बिकट असल्याने शैक्षणिक शुल्काचे पैसे कोठून भरायचे, अशी मूलभूत समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क या वर्षी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि या प्रस्तावाचे स्वागत करीत व्यवस्थापन परिषदेने एकमुखाने त्याला मान्यताही दिली. कुलगुरूंची ही कृती राज्याचा विचार करता छोटी असली तरी मोठा संदेश देणारी आहे. सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या अधिकारक्षेत्रात काय करू शकतो, काही नाही तरी खारीचा वाटा उचलू शकतो, असा सकारात्मक संदेश देणारी ही त्यांची कृती आहे. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात. विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. अगदी तक्षशिला, पाटलीपुत्र अशा प्राचीन विद्यापीठांच्या कामाचा धांडोळा घेतला तर ती जशी ज्ञानाची केंद्रे होती तशी सामाजिक, राजकीय चळवळीचे प्रेरणास्रोतही होते. त्याही पूर्वीच्या आश्रम व्यवस्थेत ऋषिमुनींचे आश्रम म्हणजे ध्यान-धारणा, ईश्वर पूजांचे केंद्र नव्हतेच. मुळात वेगवेगळ्या ऋषींचे आश्रम हे प्रयोगशाळाच म्हणता येतील.

 उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रात कापसाची लागवड ही फार पूर्वीपासून आहे. वत्सगुल्म नावाचा ऋषी जो की कापूस शास्त्रज्ञ होता. त्याने प्रथम कापसाचा प्रयोग वºहाडात केल्याचे दाखले आहेत. त्याचा आश्रम वाशिम येथे असल्याचे म्हटले जाते. अणूच्या क्षेत्रात कणाद या ऋषीचे नाव घेतले जाते, तर शून्याचा शोध लावणाºया भास्कराचार्य या ऋषींचा आश्रम चाळीसगावजवळच्या पाटणादेवी येथे होता आणि त्याचा गणितातील ‘लीलावती’ हा ग्रंथही महत्त्वाचा मानला जातो. हे पूर्वीचे दाखले आहेत. राजसत्ता चुकत असेल तर तिच्याविरुद्ध वैचारिक आंदोलन उभे करण्याचे काम विद्यापीठातूनच होते. आणीबाणीविरुद्ध पहिले नवनिर्माण आंदोलन गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी सुरू केले होते. त्यातून पुढे राजकीय चळवळ उभी राहिली. दुसरे आंदोलन जे की, आसाममध्ये परकीय नागरिकांविरुद्ध घडले ते असम गणपरिषदेचे होते; पण ते छेडणारे भृगुकुमार फुकनपासून सगळेच नेते विद्यार्थी होते. जगभराचा विचार केला तर अशी ढीगभर उदाहरणे देता येतील. शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा विद्यापीठाचा निर्णय हा असाच इतरांसाठी दिशादर्शक आहे. ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ या भूमिकेचीच आज जास्त गरज आहे आणि ती या विद्यापीठाने बजावली म्हणून कौतुक़

विद्यापीठ हे केवळ पदवी देण्याचा कारखाना नाही, तर समाजाला दिशा देण्याचे केंद्र आहे आणि विद्यापीठाची खरी भूमिका हीच तर आहे. या निर्णयातून खूप वर्षांनंतर विद्यापीठाच्या खºया भूमिकेचा प्रत्यय आला. मातीशी नाळ आणि वास्तवाचे भान असेल तर असे मार्ग शोधता येतात. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा