शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

आमचा पगार तर चहा-पाण्याला पुरत नाही, आम्ही काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 09:52 IST

गावोगावच्या आरोग्य यंत्रणेचा मुख्य आधार असलेल्या ‘आशा सेविका’ त्यांच्या मागण्या घेऊन मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्याशी संवाद !

शर्मिष्ठा भोसले, मुक्त पत्रकार

आंदोलनाच्या बॅनरसमोर एक कुणी हाताचा पाळणा बनवून ३ महिन्यांच्या बच्च्याला झोपवतेय,  काहीजणी हाताची उशी करून धुळीनं माखलेल्या सतरंज्यांवर झोपलेल्या, काहीजणी जेवणाच्या रांगेत उभ्या... उरलेल्या आपापली बरीचशी सारखी आणि बरीचशी वेगळी सुख-दु:खं एकमेकींना सांगत रात्र जागवत राहिलेल्या. या साऱ्या ‘आशा’ सेविका. सरकारचं लक्ष वेधायला  पदरचे पैसे टाकून, उधारी-उसनवारी करून  मुंबईला आलेल्या ! पंचेचाळिशीच्या हसीना पठाण गेली १३ वर्षे ‘आशा’ म्हणून काम करतात. म्हणाल्या, “कोरोना था तब जान हथेलीपे लेके काम किया हम सबने. उसका ये सिला मिला देखो. उधर घर के लोगा हम को बोलते तुम्हारी पगार तो चाय को भी बस नै होती. अब तो यहीं बोलेंगे हम सरकारसे की आप हम को रोटी दो, तभी हम आप को वोट देंगे.” राजश्री स्वामी आणि कविता सोनकटले सांगतात, ‘‘आंदोलनाच्या ठिकाणी सत्तेतलं कुणीच फिरकलं नाही. विरोधी पक्षनेते येऊन पाठिंबा देऊन जातात. आम्ही आशा वर्कर गावातल्या सगळ्यांशी जोडलेल्या असतो. लोकांवर प्रभाव असतो आमचा हे विसरतात सत्ताधारी!”

सांगायला-विचारायलाही लाज वाटेल अशा मोबदल्यावर तब्बल ७८ इंडिकेटर्सवर काम करणाऱ्या या आशा सेविकांचं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे. गावोगावहून मुंबई गाठलेल्या आशांसोबत महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे विनोद झोडगे, दत्ता देशमुख, सचिन आंधळे, राधाबाई पांचाळ, मुगाजी बुरुड, राजू देसले यांच्यासह डाव्या चळवळीतील ‘सीटू’च्या आरमायटी इराणी, उज्ज्वला पडलवार आणि अर्चना घोगरे आंदोलन पुढं नेत आहेत.

झोडगे सांगतात, “राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यभरात सुमारे सत्तर हजार आशा आणि साडेतीन हजारांहून जास्त गटप्रवर्तक कार्यरत आहेत. १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरला रास्त मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला तेव्हा आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी तीन आश्वासनं दिली होती. २ हजार रुपयांची दिवाळीभेट, आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची वाढ. या मंजूर झालेल्या मागण्यांचे शासन निर्णय अजूनही काढण्यात आलेले नाहीत. त्याविरोधात आम्ही पुन्हा मैदानात उतरलो आहोत.’’ आंदोलनकर्त्या आशांपैकी अनेकजण आजारी पडल्या आहेत. दिवसभर ऊन-धूळ आणि रात्री डास-थंडी असा मारा; मात्र ‘जीआर हातात पडत नाही तोवर हटणार नाही.’ अशी जिद्द त्या बोलून दाखवतात. उषा अडांगळे सांगतात, “कोरोनाकाळात  मासिक १ हजार रुपये विशेष भत्ता सरकारनं मंजूर केला  दोन वर्षांतला फक्त पहिला महिना तो भत्ता मिळाला.”

सुरेखा हजारे म्हणतात, “क्षयरोग, कुष्ठरोग आणि विविध संसर्गजन्य आजारांनी बाधित व्यक्तीशी आम्ही थेट संपर्कात येतो.  आमच्या जिवाची बाजी लावून केलेल्या कष्टाचा मोबदला द्यायची वेळ आली की मात्र व्यवस्था हात वर करते. आशा आजारी पडल्यावर तिला विशेष प्राधान्यानं आरोग्य सेवाही मिळत नाही. ठरवलेली सुट्टी नसते. साधी पे-स्लीप मिळावी ही आमची मागणीही आजवर मान्य झालेली नाही. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे गर्भवती महिलांना वेळेवर मिळत नाहीत, अनेकदा उशिराही मिळत नाहीत. त्यांच्या घरचे आमच्यावरच पैसे खाल्ल्याचा आरोप करतात. कुठंकुठं तोंड द्यावं ?”

विदर्भातल्या आशा सांगतात, “आता गावाकडे कापूसवेचणी सुरू आहे. एक महिला दिवसाला पाचशे रुपये मजुरी कमावते . आम्ही आरोग्य सेवा देऊनही तिच्या तुलनेत तुटपुंजं काहीतरी पदरात पडतं. एकल महिला आहेत, विधवा, परित्यक्ताच प्रामुख्याने या कामात आहेत. सरकारने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे” ‘इतक्या त्रासात इथं तग धरून कशा दिवसरात्र काढताय”- या प्रश्नावर एक आशा म्हणाली, “आम्हाला गावी तरी कुठलं सुख आहे ? इथं येऊन दु:खातला जीव अजून थोडा दु:खात टाकलाय इतकंच.” न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गानं लढणाऱ्या या आशांचं दु:ख प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना कळेल का?