शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पेन्शनच्या टेन्शनवर उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 08:27 IST

लोकशाही व्यवस्थेत कोणाला नाही म्हणता येत नाही आणि एकदा दिलेले परतही घेता येत नाही. 

‘वाढता वाढे भार, कसं पेलावं सारं !’ असे म्हणत निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या नव्वदीच्या दशकात वाढल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनाला कशी कात्री लावता येईल, याचा विचार महाराष्ट्रासह सर्व राज्यांत सुरू झाला. शासनाच्या वाढत्या विस्ताराबरोबर वाढणारा कर्मचारीवर्ग आणि वाढते निवृत्तिवेतनधारक, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च हा गंभीर विषय होता. लोकशाही व्यवस्थेत कोणाला नाही म्हणता येत नाही आणि एकदा दिलेले परतही घेता येत नाही. 

महाराष्ट्र शासन वेतनावर १ लाख २७ हजार कोटी रुपये खर्च करते. शिवाय जुन्या निवृत्तिवेतनाच्या प्रणालीनुसार ५२ हजार ६८९ कोटी रुपये खर्ची पडतात. एवढी मोठी रक्कम रद्द करणे किंवा नाकारणे सरकारला अवघड जाते आहे. मात्र, निवृत्तिवेतन अनेक क्षेत्रांत आहे. आमदार-खासदारही निवृत्तिवेतन घेतात. शासकीय सेवा बजावल्यावर त्या कर्मचाऱ्याची, तसेच त्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशीच अपेक्षा असल्याने ही सर्वमान्य बाब आता नाकारताना जड जाते आहे. गेल्या वर्षी शासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्वीप्रमाणेच म्हणजे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळते तशी निवृत्तिवेतनश्रेणी मिळावी, यासाठी संप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यातून मार्ग काढण्यासाठी समिती नियुक्त करून अहवाल मागविला. या समितीने १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के अधिक महागाई भत्ता देण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. 

ही स्वागतार्ह बाब आहे. सरकारवरील खर्चाचा बोजाही थोडा कमी होईल आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर पती किंवा पत्नीस निवृत्तिवेतनाची साठ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेत, पुढील पिढीची प्रगती पाहता शासकीय कर्मचाऱ्यांना ही नवी सुधारित निवृत्तिवेतनश्रेणी स्वीकारायला हरकत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे श्रमही देशाच्या प्रगतीला हातभार लावत असतात. त्यांना त्यांच्या श्रमाचे लाभ मिळत नाहीत. त्या तुलनेत चांगली वेतनश्रेणी आणि ही नवी निवृत्तिवेतन सुधारणा दिलासा देणारी आहे. 

असंख्य शासकीय कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणी सेवा बजावताना कायमस्वरूपी उत्पन्नासाठी गुंतवणूक करता येणे शक्य होत नाही. अनेक जण आपल्या मूळ गावापासून दूरवर स्थिरस्थावर होतात. त्यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी थोडे तरी निवृत्तिवेतन देणे आवश्यक होते. त्यादृष्टीने सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समितीने मध्यम मार्ग निवडला आहे. तो स्वीकारार्ह आहे. शिवाय या निवृत्तिवेतनासाठी जो निधी उभा करायचा आहे, त्याची रक्कम कर्मचाऱ्यांनी दहा टक्के आणि राज्य शासनाने चौदा टक्के जमा करायची आहे. कर्मचाऱ्यांचे दहा टक्के जमा करून घेतले तरी सरकारही त्याहून अधिक रक्कम देणार आहे. त्या निधीचा विनियोग भांडवल बाजारातच व्हावा, ही संकल्पनाही चांगली आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभही नवी निवृत्तिवेतन योजना बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, या चढ-उतारात नुकसान किंवा तोटा झाल्यास त्याची जबाबदारी राज्य शासन घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. याचा अर्थ सरकारने मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. 

निवृत्तिवेतनासाठी जमणाऱ्या निधीची गुंतवणूक करण्यासाठी योग्य नियोजन व्हावे, ही अपेक्षा आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मूळ हेतूलाच बगल दिल्यासारखे होणार आहे. ‘उत्पन्नासाठी सारे आणि तोट्यासाठी शासन’ अशी अवस्था होऊ नये. अखेरीस, तो तोटा जनतेच्या पैशातूनच भरून काढावा लागेल. शिवाय त्याचा गैरफायदा भांडवली बाजारातील ठगांनी घेऊ नये, यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. एक मात्र निश्चित आहे की, या नव्या पेन्शन योजना सुधारणेतून २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्यांना दुरावा वाटत होता. किंबहुना शासन आणि कर्मचाऱ्यांमधील जिव्हाळ्याचा भाग होता. त्यावर कोठे तरी परिणाम होत होता. ती मानसिकता बदलण्यासाठीदेखील या नव्या पेन्शन सुधारणा याेजनेची मदत हाेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या याेजनेनुसार सरकारच्या खर्चावर येणाऱ्या मर्यादा आणि त्यावर करण्याच्या उपायांचा अधिक अभ्यास करण्यासाठी व्यापक समिती स्थापन करायला हवी. 

शासकीय खर्चावर मर्यादा घातल्या पाहिजेत. अनेक कामांवरील निधी वाया जाताे. अनेक याेजना कालबाह्य ठरल्या असतील. त्यांचा फेरआढावा घेऊन नवे निर्णय अपेक्षित आहेत. निवृत्त हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर एक मध्यममार्गी ताेडगा निघाला, हे चांगले पाऊल आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकार