शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

बये, ग्रामसभे, तुला माहीत आहे काय; निवडणुका उरकल्या आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 03:36 IST

आपली गावे अनेक शासकांना समजली नाहीत किंवा सर्व प्रकारच्या उलथापालथीतही ती बचावली, असा एक श्लेष या मांडणीतून निघतो. हा संदर्भ यासाठी, की आपल्या राजकीय पक्षांनाही आपले ग्रामस्वराज्य व ग्रामपंचायती अजून नीट उमगलेल्या नाहीत.

‘एकामागून एक राजघराणी कोसळतात, क्रांतीमागून क्रांती येते. हिंदू, पठाण, मुगल, मराठा, शीख, इंग्रज हे आळीपाळीने शासक होतात. पण, ग्राम समूह आहे तसाच राहतो’, असे वर्णन ‘मेटकाफ’ने भारतातील ग्रामसरकारांचे केले होते. आपली गावे अनेक शासकांना समजली नाहीत किंवा सर्व प्रकारच्या उलथापालथीतही ती बचावली, असा एक श्लेष या मांडणीतून निघतो. हा संदर्भ यासाठी, की आपल्या राजकीय पक्षांनाही आपले ग्रामस्वराज्य व ग्रामपंचायती अजून नीट उमगलेल्या नाहीत. अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल घोषित होताच त्यांच्या प्रवक्त्यांनी आपल्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे दावे ठोकले नसते. राज्यात मटका बंदी आहे, पण या पक्षीय आकड्यांना बंदी कशी करणार? मुळात आपल्या ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय चिन्हावर होत नाहीत. राज्यात एकूण २९ हजार ७०० ग्रामपंचायती आहेत. त्यातील १४ हजारांवर ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या. यातील एकाही उमेदवाराला पक्षाचा ‘एबी’ फॉर्म नव्हता. त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू नाही. गावांना मोकळीक मिळावी, त्यांना त्यांचे कारभारी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी कायद्यानेच पक्षांना या निवडणुकांपासून दूर ठेवले आहे. मात्र, पक्ष व नेते गावांना हे स्वातंत्र्य देण्यास तयार नाहीत. ते सतत बेडी बनून गावासोबत आहेत. नेते स्वत:, नातेवाईकांकरवी किंवा समर्थकांमार्फत गावांवर अंकुश ठेवण्यासाठी धडपडतात. अर्थात गावे त्यांना हिसकाही दाखवितात. या ग्रामपंचायत निवडणुकात चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे, उदयनराजे भोसले, राम शिंदे अशा अनेक नेत्यांना धक्के बसल्याचे दावे केले गेले. त्यांना मानणारे लोक त्यांच्या गावांत, दत्तक गावांत पराभूत झाले, म्हणून विरोधकांनी हे दावे केले असावेत. अर्थात या नेत्यांनीही आपला-तुपला असे न मानता या निवडणुकीपासून दूर राहायला हवे. जो निवडून येईल त्याला साथ व जो पराभूत होईल त्यालाही सोबत घेण्याचे धोरण त्यांनी घेतले पाहिजे.

कोकणात नारायण राणे यांनी निकाल पाहून नेहमीसारखी गर्जना ठोकली की, पुढील वेळी शिवसेना तेथे औषधालाही ठेवणार नाही. गंमत म्हणजे याहीवेळी तेथे कुठल्याच व्होटिंग मशिनवर ‘कमळ’ नाही. असे असताना राणे सेनेला गोळ्या घालायला निघाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे, ग्रामीण माणूस सावध व चतूर असतो. तो स्वार्थीही आहे. कधीकधी तो संकुचित होतो. जातीयवादीही होतो. तो ‘मेटकाफ’ला समजला नाही, तेव्हा या नेत्यांना कसा लवकर समजेल? यावेळी तर आदर्श म्हणविलेल्या गावांतही फड रंगले. पोपटराव पवारांसारख्या आदर्श सरपंचाला निवडणुकीला सामोरे जावे लागले. ते मतांची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण, परीक्षा द्यावी लागली. भास्करराव पेरे पाटील यांनी गाव आदर्श करूनही त्यांची मुलगी पराभूत झाली. अण्णा हजारे यांच्या गावात मतदारांना आमिष दाखिवले गेले. अर्थात असे करणाऱ्यांना राळेगणने पराभूत केले. निवडणुका बिनविरोध न होण्यामागे एका मुखियाच्या हातात गावगाडा राहण्याऐवजी तो ‘सर्वाहाती’ राहावा, सर्वसंमतीने राहावा, अशी भूमिका असेल तर ती स्वागतार्ह आहे.

सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक चांगले पाऊल उचलले. अन्यथा, सरपंच पद डोक्यात ठेवूनच काहीजण रिंगणात उतरतात. आता वादाचे फड गुंडाळून ग्रामसभेने एकीचा मार्ग धरावा. नेत्यांनी ग्रामपंचायतीवर नागोबासारखे बसण्यापेक्षा गावांना अधिकार व बळ द्यावे. राज्यात सात हजार ग्रामपंचायतींना ग्रामसेवक नाहीत. अनेक पंचायतींची कार्यालये उघडतच नाहीत. ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय आहे व सरपंच ग्रामपंचायतीचा ‘सीईओ’ आहे हेच सरपंच व सदस्यांनाही ठाऊक नसते. अशा बंद दारावर पक्ष व नेत्यांचे नाव चिकटविण्यापेक्षा ही दारे उघडण्याची तसदी सरकार व गावाने घ्यावी. कवी लहू कानडे हे सध्या आमदार आहेत. त्यांची एक कविता येथे उद्धृत करण्याचा आम्हाला मोह होतो. जमलेच तर विधानसभेनेही ती ऐकावी -बये, ग्रामसभे, तुला माहीत आहे कायकी आपल्याला पिकवायचंय सोनंगायचंय हरएक जिवाचं गाणंपुन्हा सुपीक करायचीय गावाची भूमीकुणीच राहणार नाहीय उपेक्षितअशी द्यायचीय हमी...निवडणुका उरकल्या आता गावाची भूमी सुपीक करायची आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक