शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

अर्थमंचचे बॅकस्टेज आणि फ्रंटस्टेजही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 23:32 IST

राज्य नियंत्रित लायसन्सराजपासून बाजार नियंत्रित कॉर्पोरेटराजपर्यंतच्या अनेक बदलांमध्ये त्यांनी कळीची भूमिका वठवली.

- संजीव उन्हाळे 

मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी ‘बॅकस्टेज’ या ग्रंथात १९८० पासून तब्बल तीन दशक घडलेले राजकारण, अर्थकारण आणि अनेक चित्तथरारक घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आत्मचरित्र तर मुळीच वाटत नाही. ‘जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो,’ या बा.भ. बोरकरांच्या कवितेप्रमाणे मीपणा तर कोठेच जाणवत नाही.

राज्य नियंत्रित लायसन्सराजपासून बाजार नियंत्रित कॉर्पोरेटराजपर्यंतच्या अनेक बदलांमध्ये त्यांनी कळीची भूमिका वठवली. ते म्हणतात, ‘तीन दशके आपण शासनात होतो; पण राजकारणात नव्हतो. कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य तर राहिलोच नाही. तथापि, गेल्या सहा वर्षांपासून चर्वितचर्वण इतके तप्त व्हायचे की, आर्थिक प्रश्नावरून प्रेशर कुकरसारखे वातावरण व्हायचे. त्यातून हलके होण्यासाठी आणि त्यापेक्षाही सद्य:स्थितीत देशाला वाचविण्यासाठी कोणते आर्थिक धोरण असावे, याबद्दल पत्नी ईशर हिने लिहिते केले.’

राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील धोरणात्मक बदलावर या पुस्तकात जास्त भर आहे. ते म्हणतात, ‘या बदलासाठी पोषक वातावरण नव्हते. तथापि, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी हा बदल घडवून आणला. त्यासाठी राजकीय शक्तींना थोपविले आणि नोकरशाहीला याशिवाय पर्याय नाही, हे निक्षून सांगितले. या पुस्तकात लायसन्सराजमध्ये इन्फोसिसचे नारायणमूर्ती यांना कसा त्रास झाला, याचे मजेशीर वर्णन आहे. सोबत मनमोहन सिंग यांच्या स्वभावाचे अनेक पैलूही आहेत.

वॉशिंग्टनला जी-२० बैठकीनंतर रघुराम राजन यांनी भारतावर कठोर टीका केली. तरी मनमोहन सिंग यांनी राजन यांचे टिपण मागवून घेण्याची विनंती केली. सत्यम घोटाळ्यानंतर आयटी क्षेत्रासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असो वा आयसीआयसीआय बँक तोट्यात गेल्यानंतर तिला अरिष्टातून बाहेर काढण्याचे काम, अशा अनेक कथा इतिहासावर नवा प्रकाश टाकणाऱ्या आहेत.

सद्यस्थितीसाठी या पुस्तकाच्या उपसंहाराचा समाचार घेणे महत्त्वाचे वाटते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा आर्थिक कारभार वर्षभर चांगला चालला. तथापि, त्यांनी नवीनच राष्ट्रीय लेखा शृंखला २०१५ (नॅशनल अकाऊंटस् सिरिज) पासून वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे वृद्धीदर ८ टक्क्यांवर पोहोचला. या लेखा शृंखलेमुळे अवास्तव चित्र समोर येऊ लागले. अर्थमंत्रालयाचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी या नवीन लेखा पद्धतीमुळे २.५ टक्के वाढ अवास्तव दर्शविली जाते, हे साधार सिद्ध केले. म्हणणे कोणी ऐकेना, तेव्हा त्यांनी राजीनामा देत हॉर्वर्डची वाट धरली. अशीच गोष्ट राष्ट्रीय संख्याशास्त्र आयोगाची. त्यांनी नियतकालिक मजूर शक्ती सर्वेक्षणाचा अहवाल नोव्हेंबर २०१८ मध्ये वेळेवर सादर केला. तथापि, लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तो दडपून ठेवण्यात आला.

नोटाबंदी आणि जीएसटी ही या सरकारची धोरणात्मक चूक असल्याचे अहलुवालिया यांनी स्पष्ट केले आहे. त्यात सुधारणा केल्या, तर मोठा महसूल जमा होऊ शकतो. वस्तुगणिक अप्रत्यक्ष कराचे बदल करण्याऐवजी प्रत्यक्ष थेट करप्रणाली राबविण्याची गरज आहे. निराशाजनक खासगी गुंतवणुकीचे चित्र, ग्रामीण उपभोगाच्या वस्तूंच्या मागणीमध्ये झालेली प्रचंड घट आणि काही क्षेत्राला बसलेला फटका यामुळे आर्थिक स्थिती दोलायमान आहे.

राहुल बजाज यांनी एनडीए सरकारमध्ये ‘भीतीचे वातावरण’ निर्माण झाले, ही टीका यथार्थ असल्याचे स्पष्ट करून करप्रशासनामध्ये सुधारणा आणि प्रक्रिया यांचा वापर जागतिक स्तरावर कसा केला जातो, त्याप्रमाणे फेरबदल केले तरच गुंतवणूक योग्य वातावरण होईल, असे म्हटले आहे. शेती क्षेत्रातील रोजगार घटला असून, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. केवळ बांधकाम आणि सेवा क्षेत्रामध्ये नोकऱ्यांच्या थोड्याफार संधी आहेत. तथापि, कोणतीही सुरक्षा नसलेल्या कमी दर्जाच्या नोकºया निर्माण होत आहेत.

केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध ताणलेले राहण्यापेक्षा आर्थिक सुधारणांची परिणामकारकता वाढविण्यासाठी ‘सहकारी संघ राज्यवादा’ (को-आॅपरेटिव्ह फेडरॅलिझम)ची गरज त्यांनी प्रतिपादित केली आहे. तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये. शेवटी अर्थकारण आणि राजकारण यांची सांगड घातली तरच चांगले नेतृत्व घडू शकते. अहलुवालिया यांनी भारताचा वृद्धीदर येत्या काही वर्षांत वाढावा आणि तरुण पिढी त्यासाठी लायक आहे, असा दुर्दम्य आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारत