शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

महाराष्ट्राची ‘एकसष्टी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 05:40 IST

“जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे.

‘कोरोना लाॅकडाऊन’मुळे गतवर्षी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हीरकमहोत्सव साजरा करता आला नाही. सर्वत्र कोरोना दबा धरून बसला होता. आता दुसरी लाट आल्याने महाराष्ट्राची ‘एकसष्टी’देखील वाजतगाजत साजरी करता येणार नाही. आम्ही पक्के हिंदुत्ववादी आहोत, असे जरी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत असले, तरी त्यांना मिळालेल्या वारशामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा वास्तववाद आणि बाळ ठाकरे यांच्या स्पष्टवक्तेपणाचा मिलाफ आहे. परिणामी, त्यांना कोणताही गाजावाजा करण्याचा मोह झाला नाही.

पंढरीच्या वारकऱ्यांना थांबायला सांगितले, गणरायाला साध्या पद्धतीने निरोप दिला, दिवाळी-दसरा घरूनच साजरा करायची साद घातली; आणि हे सर्व करता येईल, आधी माणसाला वाचवू या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास हा मोठा रोमांचकारी आहे. त्या लढ्याची प्रेरणा शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून मराठी माणसांच्या मनामनांत भिनली होती. त्याच परंपरेचे नेतृत्व पहिल्या (१ मे १९६०)पासून महाराष्ट्राला मिळाले. यशवंतराव ते विलासराव अशी परंपरा सांगितली जात होती. ती आता प्रबोधनकारांच्या नातवापर्यंत पोहोचली आहे. कविवर्य विंदा करंदीकर ‘जनता अमर आहे’ या कवितेत म्हणतात, “जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे.

जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे, जनतेच्या हातामध्ये भविष्याची भेट आहे.” कोरोनाचे संकट गेल्यावर भविष्याची भेट घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रेटा-नेटाने मराठी माणसांनी महाराष्ट्र घडविला आहे. आजही ताे लढताे आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, ते मराठी माणसांच्या भविष्यासाठी काही तरी देऊन गेले. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, “राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासनाने हाेय म्हणायला शिकले पाहिजे.” सलग ११ वर्षे राज्याचे नेतृत्व केलेले वसंतराव नाईक म्हणाले हाेते, “महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण केले नाही, तर पुण्यातील शनिवारवाड्यासमाेर मला जाहीर फाशी द्या.”

आज उद्धव ठाकरे म्हणताहेत, “आधी माणसांचा जीव वाचवू या, अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल. माणूसच संपला, तर राज्य काेणासाठी करायचे?” जनतेच्या भविष्याप्रति आत्मिक बळ देणारे असे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे. तेव्हा जी फलनिष्पत्ती झाली आहे आणि त्यापासून जे उपेक्षित राहिले आहेत, त्यांच्याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र म्हणजे मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे पट्टा नव्हे, हे आता ठासून सांगणे आणि राज्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची प्रगती एकत्रित केली तर ती हिमालयासारखी दिसते; पण गावाकडे गेले की ती टेकडी वाटू लागते. यात बदल घडविण्यासाठी परंपरागत विकासाचे नियाेजन बाजूला ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हा वादही आता मागे पडला पाहिजे. नद्यांचे खोरे आणि भौगोलिक रचना यांचा विचार करून महाराष्ट्राच्या विकासाचे नवे माॅडेल मांडण्याची गरज या एकसष्टीनिमित्त पुढे यायला हवी. कोरोनाच्या संकटाने सर्व काही बंद झाले तेव्हा महाराष्ट्रातून देशभर लाखो मजूर परत गेले. महाराष्ट्रात बाहेरून फारसे कोणी आले नाही. महाराष्ट्राच्या पोटातच ग्रामीण आणि गरीब महाराष्ट्र दडला आहे. तिकडे शहरांतून माणूस परतला. महाराष्ट्र केवळ मराठीच नव्हे, तर देशातून येणाऱ्या प्रत्येकास रोजगार देणारा प्रांत आहे. प्रगतीचे विविध निकष लावताना हादेखील एक निकष काेरोनामुळे समोर आला. आता सूक्ष्म नियोजन करून छोट्या छोट्या नद्यांची खोरी, भौगोलिक रचना आणि रोजगाराच्या संधी याचा विचार करावा लागेल. काही भागात सौरऊर्जेचीच शेती करता येऊ शकेल. शेती ही इतर व्यवसायांना पूरक झाली पाहिजे. शहरे, महानगरे ही रोजगार निर्मितीची केंद्रे आहेत. त्यांचा सुनियोजित विकास करावा लागेल.

मराठवाडा मागास राहिला म्हणतो; पण औरंगाबादला नवा चेहरा देणारे डॉ. रफिक झकेरिया हे ठाम उभे राहिले. तशी दिशा पश्चिम विदर्भाला, अतिपूर्व विदर्भाला, मराठवाडा आणि आदिवासी पट्टे असणाऱ्या पालघर ते नंदुरबार ते अमरावतीच्या मेळघाटापर्यंत देणारे नेतृत्व पुढे आले पाहिजे. ते केवळ राजकारणी नाही, तर शैक्षणिक, औद्योगिक, संशोधनात्मक नेतृत्व असायला हवे. महाराष्ट्राचा समतोल विकास हे एक  अवघड  आव्हान एकसष्टीच्या निमित्त स्वीकारण्यास आपण तयार झाले पाहिजे. विंदा म्हणतात तसे जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे, त्या बळाचा वापर करण्यासाठी नेटाने काम करण्याचा निर्धार आपण करू या. महाराष्ट्राची पताका उंच उंच फडफडत राहो, हीच यानिमित्त सर्वांना सदिच्छा!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे