शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

महाराष्ट्राची ‘एकसष्टी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 05:40 IST

“जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे.

‘कोरोना लाॅकडाऊन’मुळे गतवर्षी महाराष्ट्राच्या स्थापनेचा हीरकमहोत्सव साजरा करता आला नाही. सर्वत्र कोरोना दबा धरून बसला होता. आता दुसरी लाट आल्याने महाराष्ट्राची ‘एकसष्टी’देखील वाजतगाजत साजरी करता येणार नाही. आम्ही पक्के हिंदुत्ववादी आहोत, असे जरी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत असले, तरी त्यांना मिळालेल्या वारशामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा वास्तववाद आणि बाळ ठाकरे यांच्या स्पष्टवक्तेपणाचा मिलाफ आहे. परिणामी, त्यांना कोणताही गाजावाजा करण्याचा मोह झाला नाही.

पंढरीच्या वारकऱ्यांना थांबायला सांगितले, गणरायाला साध्या पद्धतीने निरोप दिला, दिवाळी-दसरा घरूनच साजरा करायची साद घातली; आणि हे सर्व करता येईल, आधी माणसाला वाचवू या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास हा मोठा रोमांचकारी आहे. त्या लढ्याची प्रेरणा शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून मराठी माणसांच्या मनामनांत भिनली होती. त्याच परंपरेचे नेतृत्व पहिल्या (१ मे १९६०)पासून महाराष्ट्राला मिळाले. यशवंतराव ते विलासराव अशी परंपरा सांगितली जात होती. ती आता प्रबोधनकारांच्या नातवापर्यंत पोहोचली आहे. कविवर्य विंदा करंदीकर ‘जनता अमर आहे’ या कवितेत म्हणतात, “जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे.

जनतेच्या इच्छेमध्ये नियतीचा नेट आहे, जनतेच्या हातामध्ये भविष्याची भेट आहे.” कोरोनाचे संकट गेल्यावर भविष्याची भेट घेण्याचे नियोजन करावे लागणार आहे. रेटा-नेटाने मराठी माणसांनी महाराष्ट्र घडविला आहे. आजही ताे लढताे आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले, ते मराठी माणसांच्या भविष्यासाठी काही तरी देऊन गेले. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, “राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासनाने हाेय म्हणायला शिकले पाहिजे.” सलग ११ वर्षे राज्याचे नेतृत्व केलेले वसंतराव नाईक म्हणाले हाेते, “महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण केले नाही, तर पुण्यातील शनिवारवाड्यासमाेर मला जाहीर फाशी द्या.”

आज उद्धव ठाकरे म्हणताहेत, “आधी माणसांचा जीव वाचवू या, अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल. माणूसच संपला, तर राज्य काेणासाठी करायचे?” जनतेच्या भविष्याप्रति आत्मिक बळ देणारे असे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे. तेव्हा जी फलनिष्पत्ती झाली आहे आणि त्यापासून जे उपेक्षित राहिले आहेत, त्यांच्याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र म्हणजे मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे पट्टा नव्हे, हे आता ठासून सांगणे आणि राज्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची प्रगती एकत्रित केली तर ती हिमालयासारखी दिसते; पण गावाकडे गेले की ती टेकडी वाटू लागते. यात बदल घडविण्यासाठी परंपरागत विकासाचे नियाेजन बाजूला ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हा वादही आता मागे पडला पाहिजे. नद्यांचे खोरे आणि भौगोलिक रचना यांचा विचार करून महाराष्ट्राच्या विकासाचे नवे माॅडेल मांडण्याची गरज या एकसष्टीनिमित्त पुढे यायला हवी. कोरोनाच्या संकटाने सर्व काही बंद झाले तेव्हा महाराष्ट्रातून देशभर लाखो मजूर परत गेले. महाराष्ट्रात बाहेरून फारसे कोणी आले नाही. महाराष्ट्राच्या पोटातच ग्रामीण आणि गरीब महाराष्ट्र दडला आहे. तिकडे शहरांतून माणूस परतला. महाराष्ट्र केवळ मराठीच नव्हे, तर देशातून येणाऱ्या प्रत्येकास रोजगार देणारा प्रांत आहे. प्रगतीचे विविध निकष लावताना हादेखील एक निकष काेरोनामुळे समोर आला. आता सूक्ष्म नियोजन करून छोट्या छोट्या नद्यांची खोरी, भौगोलिक रचना आणि रोजगाराच्या संधी याचा विचार करावा लागेल. काही भागात सौरऊर्जेचीच शेती करता येऊ शकेल. शेती ही इतर व्यवसायांना पूरक झाली पाहिजे. शहरे, महानगरे ही रोजगार निर्मितीची केंद्रे आहेत. त्यांचा सुनियोजित विकास करावा लागेल.

मराठवाडा मागास राहिला म्हणतो; पण औरंगाबादला नवा चेहरा देणारे डॉ. रफिक झकेरिया हे ठाम उभे राहिले. तशी दिशा पश्चिम विदर्भाला, अतिपूर्व विदर्भाला, मराठवाडा आणि आदिवासी पट्टे असणाऱ्या पालघर ते नंदुरबार ते अमरावतीच्या मेळघाटापर्यंत देणारे नेतृत्व पुढे आले पाहिजे. ते केवळ राजकारणी नाही, तर शैक्षणिक, औद्योगिक, संशोधनात्मक नेतृत्व असायला हवे. महाराष्ट्राचा समतोल विकास हे एक  अवघड  आव्हान एकसष्टीच्या निमित्त स्वीकारण्यास आपण तयार झाले पाहिजे. विंदा म्हणतात तसे जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे, त्या बळाचा वापर करण्यासाठी नेटाने काम करण्याचा निर्धार आपण करू या. महाराष्ट्राची पताका उंच उंच फडफडत राहो, हीच यानिमित्त सर्वांना सदिच्छा!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरे