शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

घोषणांचा कोरडा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 03:28 IST

प्रत्येक मंत्रालयाने दिवसाकाठी एक घोषणा केली पाहिजे असा दंडकच बहुधा मोदींच्या व फडणवीसांच्या सरकारने काढला असावा.

प्रत्येक मंत्रालयाने दिवसाकाठी एक घोषणा केली पाहिजे असा दंडकच बहुधा मोदींच्या व फडणवीसांच्या सरकारने काढला असावा. त्याचमुळे त्यांचा पाऊस देशावर आणि राज्यावर पडताना दिसत आहे. खऱ्या पावसाची जागा या घोषणांनी घेतल्यामुळे खºया मेघगर्जना थांबल्या आणि पाऊसही यायचा राहिला. मुख्यमंत्री दरदिवशी किमान पाच घोषणा करतात. मुनगंटीवारही मग त्यांच्याशी स्पर्धा करतात. ही स्पर्धा आता अनिल बोंडे या ‘आल्सो रॅन’ मंत्र्यांपर्यंत पोहोचली असून त्यांच्या आश्वासनांच्या गर्जनांनीच आकाश व्यापले आहे. या गर्जना एकामागोमाग एक अशा येतात की त्या लक्षात राहत नाहीत आणि तसे काही झाले नाही की त्यांची शहानिशाही कुणी करीत नाही.

गावयुक्त शेतीचे काय झाले आणि गावमुक्त धरणांचे काय झाले? त्यातच गडकरींचे रस्ते, जावडेकरांच्या शालेय शिक्षणाच्या दुरुस्त्या असतात, त्याखेरीज अल्पसंख्याकांना दुरुस्त करून सडकेवर आणायचे केंद्राचे सांगणे असते. काश्मीर तत्काळ शांत करायचे असते, कर्नाटकचे सरकार पाडले आता बंगाल, मग राजस्थानची सरकारे पाडायची असतात. काम फार व त्यामुळे घोषणाही फार. गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यांनी अशा किती घोषणा केल्या आणि त्यातल्या जमिनीवर किती आल्या याचा हिशेब कधी तरी मांडला पाहिजे. बेकार तसेच राहिले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच राहिल्या. मग मनात येते की निदान आश्वासने थांबवा. समाजाला खोट्या आशा दाखवू नका, सुधारणा नकोत आणि घाईही नको. नेहरूंनी देशात अनेक मोठी धरणे, भाकरानांगल, हिराकुंड वगैरे बांधायला घेतली आणि ती वेळेत पूर्ण केली. शेतीचे उत्पन्न पंधरा वर्षांत बारा टक्क्यांनी वाढविले, औद्योगिक उत्पादन वीस टक्क्यांच्या पुढे नेले, दुष्काळ इतिहासजमा केले आणि शेतकºयांनाही शांत केले. त्यांना जे जमले ते या सरकारलाही जमावे. नेहरू घोषणा अमलात आल्यानंतरच त्याविषयी बोलत.

भाकरानांगल व हिराकुंड यांना त्यांनी आधुनिक तीर्थस्थाने म्हटले. आता तीर्थ नाही, गंगा शुद्ध नाही आणि गंगेत जहाजे चालवायच्या घोषणा हवेतच आहेत. हिंदूंच्या बालविवाहांना आळा घालणारा कायदा करून किती वर्षे झाली? स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे कधी व किती झाले? शेतकºयांना मदत, आदिवासींना साहाय्य वगैरे कधी पुरे होणार? बुलेटची घोषणा होणे, मेट्रोचे सांगाडे उभे होणे वा चांद्रयानाचे सोहळे साजरे होणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र यापैकी कितींचा सामान्य माणसांच्या आयुष्याशी संबंध येतो? की ही माणसे सरकारच्या लेखी राहिलीच नाहीत. सातवा आयोग आला, आठवाही आणा, पण नोकºया नसणाºया बेकारांना काही देणार की नाही? संपत्ती वाढली, पैसा वाढला, राष्ट्रीय उत्पन्न पाच टक्क्यांपर्यंत वाढल्याचे सांगितले गेले. मग हा पैसा गेला कुठे व जातो कुठे? यंदाच्या अंदाजपत्रकात कोणत्या विषयावर किती खर्च व्हायचा याचे निश्चित आकडे नाहीत. एखादा निबंध असावा तसे ते तयार केले गेले. परिणामी कोणत्या विषयाचे काय झाले, त्यावर किती खर्च झाला, त्याचे उत्पन्न वाढले की कमी झाले हे विचारायचीही सोय राहिली नाही. याला खरेपण म्हणत नाही, याला मुत्सद्दीपण म्हणतात. अंदाजपत्रकाचे दस्तऐवज बॅगेतून दिले काय आणि बासनात बांधून दिले काय, ते लोकांपर्यंत पोहोचतील तरच त्याचा उपयोग होईल. मात्र नुसत्या घोषणा व गर्जनांनीही आनंदी होणारा एक मोठा वर्ग आता समाजात तयार झाला आहे. त्याला महागाईची झळ नाही, सुधारणांचा जाच नाही आणि त्याला पाहता येणारा भ्रष्टाचार हा ‘त्यांच्याच माणसांचा’ असल्याने क्षम्यही आहे. सामान्य माणसांना व्यासपीठ नाही, माध्यमांना वाचा नाही, विरोधक दुबळे आहेत आणि गरीब? त्या बिचाºयांना तर त्यांचे प्रश्न पुरेसे कळायचेच राहिले आहेत. बोलका वर्ग प्रसन्न व समाधानी असला की समाज शांत व सरकारही प्रसन्न असते. आताशा अशी शांतता व प्रसन्नता आपण अनुभवत आहोत. ते तिकडे काही जण ओरडतात, पण ते सारे दुर्लक्ष करावे असे असते. कारण त्यांच्यामागे मतांचे गठ्ठे नसतात आणि ते दुबळेही असतात.

गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यांनी अशा किती घोषणा केल्या आणि त्यातल्या जमिनीवर किती आल्या याचा हिशेब कधी तरी मांडला पाहिजे. बेकार तसेच राहिले, शेतकºयांच्या आत्महत्या तशाच राहिल्या. मग मनात येते की निदान आश्वासने थांबवा.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी