शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

लेख: शिक्षण सक्तीचे हवे की ऐच्छिक? कशी दूर होईल विषमता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 09:13 IST

Dr. Babasaheb Ambedkar on Education: प्राथमिक शिक्षण हे सक्तीचेच हवे, मात्र त्यात एकसूत्रीपणा जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत शिक्षणातील विषमता दूर करणे शक्य होणार नाही, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा घेतलेला हा मागोवा. 

-डॉ. ह. नि. सोनकांबळे, सहायक प्राध्यापकभारतात शैक्षणिक धोरणाची जितकी चर्चा होते, तितकी शैक्षणिक वातावरणाची होत नाही. शिक्षण सक्तीचे असावे की ऐच्छिक असावे, हाच प्रश्न अजून सुटलेला दिसत नाही. म. फुले, राजर्षी शाहू महाराज आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर दीर्घ चर्चा केल्याचे आणि शाहू महाराजांनी, तर त्यांच्या राज्यात सक्तीच्या शिक्षणाचे धोरण राबविल्याचे दिसते. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, तर प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतके लागतील, म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो, असे सांगितले. 

जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करूनच निरक्षरता हद्दपार केली असल्याचेही ते सांगतात. भारतीय संविधानाने सुरुवातीला हा विषय मार्गदर्शक तत्त्वाचा भाग बनवला व तो राज्यांसाठी ऐच्छिक कर्तव्याचा भाग म्हणून ठेवला. 

२००२ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीने प्राथमिक शिक्षण हा विषय संविधानाच्या मूलभूत अधिकाराचा भाग बनला. संविधानाने प्राथमिक शिक्षण हक्काचे, सक्तीचे आणि मोफत असण्याबरोबरच तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे, हे निश्चित केले, परंतु आजघडीला शिक्षण हा ऐच्छिकच विषय असल्याचे जाणवते. शिवाय सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचे धोरण राबविण्यास सरकार इच्छुक नाही असेच दिसते. त्यामुळे भरमसाठ शुल्क, सक्तीच्या शिक्षणाऐवजी ते कुठे घ्यायचे हे लोकांच्या इच्छेवर सोडणे आणि यातून मूलभूत हक्काला डावलणे, असेच प्रकार सुरू झाले आहेत. या अनास्थेमुळे सरकारी शाळा बंद होत आहेत, तर खासगी शाळांचे पेव फुटले आहे. 

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण 

जोपर्यंत शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी सरकार आपल्या अंगावर घेणार नाही, तोपर्यंत शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण अपेक्षित होते. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून शिक्षण सक्तीचे केल्याशिवाय शेवटच्या घटकाला सुशिक्षित करता येणार नाही. ते म्हणतात की, आज भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. जर सरकारने त्यांना शिक्षण ऐच्छिक केले, तर त्यांना शिक्षित होण्यासाठी जगाच्या अंताची वाट बघावी लागेल. 

आज सरकार जरी असे सांगत असले की, भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्वांना शिक्षण सक्तीचे करणे आणि मोफत देणे शक्य नाही, परंतु शिक्षण सर्वांनाच मोफत असावे का? याचे उत्तर देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिक्षण सर्वांना सक्तीचे केले, तरी मोफत देणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटत नाही. ज्यांच्यामध्ये फी देण्याचे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडून ती वसूल करण्यास मुळीच हरकत नाही.

इंग्लंडमध्ये देखील जेव्हा प्राथमिक शिक्षण सक्तीने देण्याचा उपक्रम झाला, तेव्हा ते सर्वांना मोफत ठेवण्यात आले नव्हते. परंतु, त्या शिक्षणात एकसूत्रीपणा होता. नवीन शैक्षणिक धोरणाने एकसूत्रीपणा आणला असला, तरी भेदभाव संपेल का? हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी