शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

लेख: शिक्षण सक्तीचे हवे की ऐच्छिक? कशी दूर होईल विषमता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 09:13 IST

Dr. Babasaheb Ambedkar on Education: प्राथमिक शिक्षण हे सक्तीचेच हवे, मात्र त्यात एकसूत्रीपणा जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत शिक्षणातील विषमता दूर करणे शक्य होणार नाही, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा घेतलेला हा मागोवा. 

-डॉ. ह. नि. सोनकांबळे, सहायक प्राध्यापकभारतात शैक्षणिक धोरणाची जितकी चर्चा होते, तितकी शैक्षणिक वातावरणाची होत नाही. शिक्षण सक्तीचे असावे की ऐच्छिक असावे, हाच प्रश्न अजून सुटलेला दिसत नाही. म. फुले, राजर्षी शाहू महाराज आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर दीर्घ चर्चा केल्याचे आणि शाहू महाराजांनी, तर त्यांच्या राज्यात सक्तीच्या शिक्षणाचे धोरण राबविल्याचे दिसते. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, तर प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविल्यास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक शतके लागतील, म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा लागतो, असे सांगितले. 

जगातील सर्व देशांनी सक्तीचा कायदा करूनच निरक्षरता हद्दपार केली असल्याचेही ते सांगतात. भारतीय संविधानाने सुरुवातीला हा विषय मार्गदर्शक तत्त्वाचा भाग बनवला व तो राज्यांसाठी ऐच्छिक कर्तव्याचा भाग म्हणून ठेवला. 

२००२ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीने प्राथमिक शिक्षण हा विषय संविधानाच्या मूलभूत अधिकाराचा भाग बनला. संविधानाने प्राथमिक शिक्षण हक्काचे, सक्तीचे आणि मोफत असण्याबरोबरच तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे, हे निश्चित केले, परंतु आजघडीला शिक्षण हा ऐच्छिकच विषय असल्याचे जाणवते. शिवाय सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचे धोरण राबविण्यास सरकार इच्छुक नाही असेच दिसते. त्यामुळे भरमसाठ शुल्क, सक्तीच्या शिक्षणाऐवजी ते कुठे घ्यायचे हे लोकांच्या इच्छेवर सोडणे आणि यातून मूलभूत हक्काला डावलणे, असेच प्रकार सुरू झाले आहेत. या अनास्थेमुळे सरकारी शाळा बंद होत आहेत, तर खासगी शाळांचे पेव फुटले आहे. 

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण 

जोपर्यंत शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी सरकार आपल्या अंगावर घेणार नाही, तोपर्यंत शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण अपेक्षित होते. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून शिक्षण सक्तीचे केल्याशिवाय शेवटच्या घटकाला सुशिक्षित करता येणार नाही. ते म्हणतात की, आज भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. जर सरकारने त्यांना शिक्षण ऐच्छिक केले, तर त्यांना शिक्षित होण्यासाठी जगाच्या अंताची वाट बघावी लागेल. 

आज सरकार जरी असे सांगत असले की, भारताची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्वांना शिक्षण सक्तीचे करणे आणि मोफत देणे शक्य नाही, परंतु शिक्षण सर्वांनाच मोफत असावे का? याचे उत्तर देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. शिक्षण सर्वांना सक्तीचे केले, तरी मोफत देणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटत नाही. ज्यांच्यामध्ये फी देण्याचे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडून ती वसूल करण्यास मुळीच हरकत नाही.

इंग्लंडमध्ये देखील जेव्हा प्राथमिक शिक्षण सक्तीने देण्याचा उपक्रम झाला, तेव्हा ते सर्वांना मोफत ठेवण्यात आले नव्हते. परंतु, त्या शिक्षणात एकसूत्रीपणा होता. नवीन शैक्षणिक धोरणाने एकसूत्रीपणा आणला असला, तरी भेदभाव संपेल का? हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी