शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मराठीत काय सांगतात ते कळत नाही - मग काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:08 IST

आदिवासी बोलीभाषा असलेल्या मुलांना मराठी कसे शिकवायचे? यासाठी सतत धडपडत राहून विशेष प्रयत्न करणाऱ्या या प्रयोगशील शिक्षकांची कहाणी !

- राजेश शेगोकारवृत्तसंपादक लोकमत, नागपूर

ज्यांना स्वतःची लिपी नाही, अशा बोली भाषिक आदिवासी भागात प्रमाण मराठी भाषेचा संसार सोपा नाही. राज्यातील काही भागांत शाळा आहेत; पण शाळेची मराठी मुलांना कळतही नाही अन् झेपतही नाही, हे वास्तव आहे. मराठीतून संवादाचे, भाषेचेच दार बंद झाल्याने ज्ञानाची कवाडे कशी उघडायची?

भाषेच्या अडचणीचा हा मोठा डोंगर पार करण्यासाठी काही प्रयोगशील शिक्षकांनी बोली भाषेच्या काठीचा आधार घेऊन मुलांनाच नव्हे, तर आदिवासी ग्रामस्थांनाही मराठीची गोडी लावली आहे.

गडचिरोली कोरची तालुक्यातील मोहगावातील विद्यार्थ्यांची मातृभाषा छत्तीसगडी. मराठी शाळा. शिक्षकही मराठीच. त्यामुळे छत्तीसगडीमध्ये मुलांना शिकवणे कठीण जायचे, या शाळेत फिरोज फुलकवर रुजू झाले. लहानपण छत्तीसगडी कुटुंबांसोबत गेल्याने त्यांचे या भाषेवर प्रभुत्व. विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी ते एकेक विषय मराठीतून छत्तीसगडीमध्ये भाषांतर करून शिकवू लागले, पण परीक्षेतला पेपर मराठीतच सोडवावा लागणार ! म्हणून मग पुन्हा छत्तीसगडीमधून मराठी भाषांतर करून त्यांनी मुलांना मराठीच्या मार्गावर आणले अन् शिक्षणाची गाडी मराठीचा झेंडा मिरवित पळाली.

गोंदिया जिल्ह्यातील रेहळी हे गाव. मुलांना मराठी येत नाही आणि शिक्षकांना छत्तीसगडी येत नाही. त्यामुळे शाळेकडे अनेक मुलांनी पाठ फिरविली होती. मंगलमूर्ती सयाम या शिक्षकाने छत्तीसगडीतून शिक्षण देत मुलांची गाडी हळूहळू मराठीकडे यशस्वीपणे वलवली आहे. गडचिरोलीतीलच अतिदुर्गम मोहगाव येथे ग्रामसभेच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षापासून गोंडी भाषिक पहिली आदिवासी निवासी शाळा चालविली जाते आहे. चौथीपर्यतच्या या शाळेला प्राथमिक शिक्षण विभाग व राज्य शासनाची मान्यता नाही, त्यामुळे १ लाखाचा दंड शिक्षण समितीवर ठोठावला आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामसभा शिक्षण समितीने न्यायालयात धाव घेतली आहे, पण शाळा सुरूच आहे. येथे गोंडीसह हिंदी, इंग्रजी आणि मराठीचीही गोडी मुलांना लागली आहे.

कोरकू भाषिक आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख देण्याची धडपड करणारे शिक्षक तुलसीदास खिरोडकर, 'आगरी शाला' चालवणारा सर्वेश तरे अशी कितीतरी उदाहरणे! सर्वत्र असे लहान मोठे नंदादीप मराठी भाषेसाठीच उजळत आहेत. प्रतिकूल हवेतही तग धरून आहेत. मराठीच कळत नाही तिथे बोलीचा आधार घेत भाषेची गोडी लावण्याचा हा 'संवाद' यशस्वी झाला आहे. यामागे अंतिमतः मराठी कळली पाहिजे अन् पुढे जगली पाहिजे हाच हेतू आहे हे नाकारून कसे चालेल?

टॅग्स :marathiमराठी