शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

मराठीत काय सांगतात ते कळत नाही - मग काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:08 IST

आदिवासी बोलीभाषा असलेल्या मुलांना मराठी कसे शिकवायचे? यासाठी सतत धडपडत राहून विशेष प्रयत्न करणाऱ्या या प्रयोगशील शिक्षकांची कहाणी !

- राजेश शेगोकारवृत्तसंपादक लोकमत, नागपूर

ज्यांना स्वतःची लिपी नाही, अशा बोली भाषिक आदिवासी भागात प्रमाण मराठी भाषेचा संसार सोपा नाही. राज्यातील काही भागांत शाळा आहेत; पण शाळेची मराठी मुलांना कळतही नाही अन् झेपतही नाही, हे वास्तव आहे. मराठीतून संवादाचे, भाषेचेच दार बंद झाल्याने ज्ञानाची कवाडे कशी उघडायची?

भाषेच्या अडचणीचा हा मोठा डोंगर पार करण्यासाठी काही प्रयोगशील शिक्षकांनी बोली भाषेच्या काठीचा आधार घेऊन मुलांनाच नव्हे, तर आदिवासी ग्रामस्थांनाही मराठीची गोडी लावली आहे.

गडचिरोली कोरची तालुक्यातील मोहगावातील विद्यार्थ्यांची मातृभाषा छत्तीसगडी. मराठी शाळा. शिक्षकही मराठीच. त्यामुळे छत्तीसगडीमध्ये मुलांना शिकवणे कठीण जायचे, या शाळेत फिरोज फुलकवर रुजू झाले. लहानपण छत्तीसगडी कुटुंबांसोबत गेल्याने त्यांचे या भाषेवर प्रभुत्व. विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी ते एकेक विषय मराठीतून छत्तीसगडीमध्ये भाषांतर करून शिकवू लागले, पण परीक्षेतला पेपर मराठीतच सोडवावा लागणार ! म्हणून मग पुन्हा छत्तीसगडीमधून मराठी भाषांतर करून त्यांनी मुलांना मराठीच्या मार्गावर आणले अन् शिक्षणाची गाडी मराठीचा झेंडा मिरवित पळाली.

गोंदिया जिल्ह्यातील रेहळी हे गाव. मुलांना मराठी येत नाही आणि शिक्षकांना छत्तीसगडी येत नाही. त्यामुळे शाळेकडे अनेक मुलांनी पाठ फिरविली होती. मंगलमूर्ती सयाम या शिक्षकाने छत्तीसगडीतून शिक्षण देत मुलांची गाडी हळूहळू मराठीकडे यशस्वीपणे वलवली आहे. गडचिरोलीतीलच अतिदुर्गम मोहगाव येथे ग्रामसभेच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षापासून गोंडी भाषिक पहिली आदिवासी निवासी शाळा चालविली जाते आहे. चौथीपर्यतच्या या शाळेला प्राथमिक शिक्षण विभाग व राज्य शासनाची मान्यता नाही, त्यामुळे १ लाखाचा दंड शिक्षण समितीवर ठोठावला आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामसभा शिक्षण समितीने न्यायालयात धाव घेतली आहे, पण शाळा सुरूच आहे. येथे गोंडीसह हिंदी, इंग्रजी आणि मराठीचीही गोडी मुलांना लागली आहे.

कोरकू भाषिक आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख देण्याची धडपड करणारे शिक्षक तुलसीदास खिरोडकर, 'आगरी शाला' चालवणारा सर्वेश तरे अशी कितीतरी उदाहरणे! सर्वत्र असे लहान मोठे नंदादीप मराठी भाषेसाठीच उजळत आहेत. प्रतिकूल हवेतही तग धरून आहेत. मराठीच कळत नाही तिथे बोलीचा आधार घेत भाषेची गोडी लावण्याचा हा 'संवाद' यशस्वी झाला आहे. यामागे अंतिमतः मराठी कळली पाहिजे अन् पुढे जगली पाहिजे हाच हेतू आहे हे नाकारून कसे चालेल?

टॅग्स :marathiमराठी