शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शिक्षणाशी खेळू नका, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणे थांबलेच पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 06:50 IST

कोरोनाचे संकट कधी संपणार, लस कधी येणार, याची खात्री नाही. त्यामुळेच निर्बंध हळूहळू उठविले जात आहेत. असे असताना अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा महाराष्ट्राने धरलेला आग्रह अयोग्य व चुकीचाच होता आणि आहे.

महाविद्यालयीन व विद्यापीठ पातळीवरील अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्याच लागतील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल्यामुळे महाराष्ट्रातही त्या होतील, हे निश्चित झाले. त्यामुळे परीक्षा होणार की नाहीत, अशा संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना घाईघाईने तयारीला लागावे लागेल. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितल्याप्रमाणे त्या ३० सप्टेंबरपर्यंत होणार की आणखी पुढे ढकलल्या जाणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. आधीच्या परीक्षांच्या मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण करता येणार नाही, हेही कोर्टाने ठणकावून सांगितले आहे.

कोरोना संकटकाळात परीक्षा न घेता आधीच्या मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल लावावा, असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे होते. ते कोर्टाने सपशेल अमान्य केले. याआधी जेईई व नीट परीक्षा घ्यायलाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतही कोर्टाची तीच भूमिका असेल, याचा अंदाज आला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असल्याने आता परीक्षा घेतल्यास रुग्ण वाढण्याची भीती महाराष्ट्र सरकारला वाटत आहे. तेच प्रतिपादन करताना संसर्गजन्य आजार कायद्यान्वये राज्यांना असलेल्या अधिकाराचा सरकारने कोर्टात उल्लेख केला होता. मात्र त्यावर सध्याच्या स्थितीत तुम्ही परीक्षा पुढे ढकलू शकता; पण त्या रद्द करता येणार नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. सद्यस्थितीत परीक्षा कधी घ्यायच्या, हा अधिकार महाराष्ट्राला असल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने विद्यापीठांशी बोलून त्या कधी होतील, हे लवकरात लवकर जाहीर करावे. त्या ३० सप्टेंबरपर्यंत घ्यायच्या असतील, तर घाईघाईने तयारीला लागावे लागेल. त्या आॅक्टोबर वा नोव्हेंबरमध्ये घ्यायच्या असतील, तर तसे विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवून तशी संमती मिळवावी लागेल. त्यात राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून वेळखाऊपणा होऊ नये, इतकीच अपेक्षा.

या गोंधळामुळे असंख्य विद्यार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यांत पुस्तकांना हात लावलेला नाही. विविध निर्बंधांमुळे त्यांना अभ्यास करता आलेला नाही. त्यामुळे आता तरी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यांचे सहा महिने आधीच वाया गेले आहेत. शिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याची राज्य सरकारची भूमिकाच अयोग्य होती. सध्याच्या स्पर्धेत परीक्षा न घेता सरसकट पास वा नापास करणे अन्यायकारक ठरले असते. या परीक्षा लगेच झाल्या तरी निकाल लागायला जानेवारी तरी उजाडेल. त्यामुळे ज्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना तो मार्च वा त्यानंतर मिळेल. म्हणजे त्यांचे एक संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. अर्थात त्याला राज्य सरकार जबाबदार नाही, कारण कोणत्याच राज्यांत या परीक्षा झालेल्या नाहीत आणि तसा निर्णय केंद्र सरकारनेच घेतला होता. आताही लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना महाराष्ट्रच नव्हे, तर सर्व राज्यांना प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. या परीक्षा साधारणपणे महिनाभर तरी चालतील. अमेरिकेत शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसे झाल्यास संकट अधिक वाढेल. लॉकडाऊननंतर हजारो विद्यार्थी आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा दुसऱ्या गावी वा शहरात जावे लागू नये, ही अपेक्षा आहे. त्यांना जवळच्या महाविद्यालयात परीक्षा देण्याची मुभा मिळायला हवी. कर्नाटकने शालान्त परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना ती सुविधा दिली होती.

जेईई, नीट परीक्षांसाठी काही लाख हातमोजे, मास्क आणि लाखो लिटर सॅनिटायझर विकत घेतले आहे. तसेच या परीक्षांसाठी करावे लागेल. केंद्रांवर ऑक्झिमीटर व थर्मल स्क्रिनिंग मशीन ठेवाव्या लागतील. त्यासाठी नेहमीपेक्षा अधिक मनुष्यबळ लागेल. हे वाटते, तितके सोपे नाही. कोर्टात वेळ दवडण्यापेक्षा ही तयारी केली असती तर विद्यार्थी तरी निश्चिंत राहिले असते. अंतिम वर्ष परीक्षा घ्याव्याच लागणार, हे स्पष्ट झाल्यानंतरही महाराष्ट्रासह सहा राज्यांनी या परीक्षांना पुन्हा कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. तसा मार्ग सर्वांनाच आहे. पण कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता, या दोन्ही परीक्षा सुरळीत पार पडतील, यासाठीची तयारी पूर्ण केली असेल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणे थांबलेच पाहिजे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय