शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 23:20 IST

आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे.

- धर्मराज हल्लाळे

आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात होत असलेल्या दिरंगाईवर गडकरी लाज वाटत असल्याचे बोलून गेले. त्याचवेळी युपीए सरकारच्या कार्यशैलीवरही बोट ठेवले. गडकरींनी असे विधान पहिल्यांदाच केले असे नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर वर्षभरात अकोल्यात झालेल्या एका सोहळ्यातही ते लाज वाटत असल्याचे म्हणाले होते. कारण होते कृषी विकास दर शून्यावर असण्याचे. एकंदर अधूनमधून तत्कालीन सरकारला धारेवर धरताना आपल्याही कामाचे विश्लेषण गडकरींनी परखडपणे केले, असे म्हणू शकतो. मात्र प्रश्न हा आहे, महाराष्ट्रातील राज्य रस्त्यांची नियमित होणारी दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यावर कोणालाही लाज का वाटत नाही? स्वाभाविकच खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच पचनी पडत नाही. त्यामुळे लाज वाटण्याइतके काही घडले, याची जाणीवच होत नाही.

महाराष्ट्रात सुमारे ९० हजार किलोमीटर इतके राज्य रस्ते आहेत. त्यामध्ये साधारणत: ३० हजार किलोमीटरचे रस्ते ठिकठाक आहेत. ३० हजार किलोमीटरच्या मार्गावर खड्डे तर उर्वरित ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांचा खड्ड्यांमध्ये शोध घ्यावा लागतो. ३१ डिसेंबरपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करू, अशा घोषणा सर्वांच्या कानी पडल्या होत्या. त्याला आठ महिने उलटले आहेत. परिस्थिती जैसे थे आहे. जिथे मुरुमाने खड्डे बुजविले तिथे चिखल झाला आहे. नाही म्हणायला मंत्र्यांचे दौरे लक्षात घेऊन काही ठिकाणी डांबराने खड्डे बुजविले. एकूणच खड्ड्यांचे दुष्टचक्र कायम सुरू आहे. त्यातही गेल्या काही वर्षांत राज्य रस्त्यांची झालेली दुरवस्था संताप निर्माण करणारी आहे. एकीकडे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात धुमधडाक्यात राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू केले आहे. बहुतेक मार्ग प्रगतिपथावर आहेत. कामाची गती जनतेच्या लक्षात येण्यासारखी आहे. परंतु, त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे हजारो किलोमीटरचे राज्य रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. सर्वसामान्य कोट्यवधी जनता जिल्हा रस्त्यावरून सर्वाधिक वेळा प्रवास करते. त्यातही लाखोंची संख्या असलेल्या शहरातील मनपा रस्त्यांचे विचारायलाच नको. काही सन्माननीय अपवाद वगळले तर जिल्ह्यांची ठिकाणे असलेली शहरे खड्ड्यांमुळे चर्चेत आहेत. तिथे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतुचक्राप्रमाणे खड्डेही कालांतराने पडतच असतात, त्यामुळे लाज कशाला अन् कोणाला वाटेल! 

अर्थात सर्वजण निलाजरे नाहीत. खड्डेमुक्तीत पुणे जिल्ह्यात काम झाले. दिवसाला तीन किलोमीटर या गतीने रस्ते झाले. अशीच काही दुर्मिळ उदाहरणे अन्यत्रही आहेत. मात्र मराठवाड्यात एखाददुसरा  राज्य मार्ग वगळला तर सर्व रस्ते खड्डेग्रस्त आहेत. तूर्त पावसाळ्याचे कारण पुढे करून लोकांना खड्डेमय प्रवास करणे अनिवार्य केले आहे. त्याची लाज कसली?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPotholeखड्डे