शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

घराणेशाहीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:39 IST

खान्देशचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत किमान डझनभर राजकीय वारसदारांना मतदारांनी घरी बसविले होते, हे लक्षात घेतले तरी सामान्य जनतेची मानसिकता समजून येईल.

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कवित्व अजून बरेच दिवस सुरु राहील. त्या निकालाचा मथीतार्थ आणि अन्वयार्थ प्रत्येक जण आपल्या कुवत, वकुब आणि आकलनानुसार काढेल. ‘हत्ती आणि सात आंधळे’ या कथेसारखी अवस्था होईल. पण या सगळ्यात अधोरेखित करणारा मुद्दा हा निवडणुकीतील घराणेशाही हा ठरला आहे.विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही प्रमुख नेत्यांनी याच मुद्याकडे गेल्या दोन दिवसांत अंगुलीनिर्देश केला आहे. राष्टÑीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्याच बैठकीत मोदी यांनी स्पष्ट केले की, आता तुम्हाला काम करावे लागणार आहे. जनहिताला प्राधान्य द्यावे लागणार आहे. पुढे तुम्हाला निवडून यायचे असेल तर तुम्हाला मोदी नाही तर तुमचे कामच हात देईल.दुसरीकडे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पराभवाचे चिंतन करताना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केवळ मुलांची उमेदवारी आणि त्यांचा प्रचार याभोवतीच स्वत:ला गुंतवून घेतले आणि पक्ष व इतर उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.जेव्हा दोन्ही प्रमुख पक्षांचे नेते या मुद्याविषयी गांभीर्याने बोलतात, याचा अर्थ हा विषय चिंताजनक आहे. निर्विवाद बहुमत मिळूनही मोदी जेव्हा नवनिर्वाचित खासदारांना जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात, याच अर्थ लक्षात घ्यायला हवा. पक्षाचा पराभव जेवढा प्रतिस्पर्धी पक्षाने केला, तेवढाच स्वकीयांनी केल्याची जाणीव राहुल गांधी यांना अस्वस्थ करीत असावी, म्हणूनच त्यांनी खडे बोल सुनावले.घराणेशाही याचा अर्थ सत्ता ही एकाच घराण्यात, कुटुंबात एकवटली जाणे, केंद्रित होणे. इंदिरा गांधी यांनी राजा-महाराजांची संस्थाने खालसा केली असली, तरी त्यांचे वंशज सत्तेत राहून त्याच आविर्भावात, तोºयात वागत असतात हे आपण बघत आहोत. लोकशाही व्यवस्थेमध्ये मताधिकार सगळ्यांना प्राप्त झाला, तसा निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळाला आहे. लोकशाहीमुळे शिक्षण, नोकरी-व्यवसायाचा अधिकार आणि त्यासोबतच हक्काची जाणीव प्रत्येक समाजघटकाला झाल्यामुळे राजकीय आशा-आकांक्षा निर्माण झाल्या. संविधानाला अपेक्षित अशीच ही कार्यवाही होती. त्याचा पहिला धक्का जमीनदार, भांडवलदार, संस्थानिकांना बसला. घराणेशाही नाकारायला सुरुवात झाली. परंतु, राजकीय सत्तेमुळे नवीन संस्थाने गावोगाव तयार झाली. साखर कारखाने, सुतगिरण्या, अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या माध्यमातून नवीन संस्थानिक तयार झाले. पक्ष कोणताही असला तरी आपली संस्थाने अबाधित रहावी, म्हणून प्रत्येक राजकीय पक्षामध्ये या घराण्यांचे सदस्य शिरले. वेगवेगळ्या निवडणुका जिंकले. आणि नवी घराणेशाही तयार झाली. या नव्या घराणेशाहीत जी मंडळी समाजाबरोबर, सामान्यांशी नाळ जोडून राहिली, ती टिकली. जे गढी, वाडे, बंगले न सोडता राजकारण करु लागले, ते लाट, त्सुनामीमध्ये पालापाचोळ्यासारखे उडून गेले.जनतेशी नाळ कायम ठेवा, असा उपदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करण्यामागे ही पार्श्वभूमी आहे. घराणेशाहीत केवळ स्वत:चा विकास होत असतो, जनतेला दृष्टीआड केले जाते. कार्यकर्ते, सामान्य जनतेला ठराविक मर्यादेपर्यंत सत्तेतील पदे, अधिकार, स्वातंत्र्य दिले जाते. त्याचा अतिरेक झाल्यामुळे सत्ता जाते. यंदाच्या निवडणुकीत अशी अनेक उदाहरणे आहेत. अगदी खान्देशचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत किमान डझनभर राजकीय वारसदारांना मतदारांनी घरी बसविले होते, हे लक्षात घेतले तरी सामान्य जनतेची मानसिकता समजून येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव