शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

देशाचा येमेन किंवा सिरिया करायचा आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:29 AM

प्रज्ञा सिंग भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

प्रज्ञा सिंग भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिचा भगवा पोशाख पाहून एक वर्ग तिच्यामागे जाईलही. पण तिचे हिंदुरक्षक असणे कडव्या, कर्मठ, धर्मांध विचारांच्या चलतीसारखेच आहे.आपल्या देशाचा येमेन किंवा सिरिया करायचा आहे काय? त्या देशात शस्त्रधारी माणसे, मग ती वैध असोत वा अवैध, समाजावर आपली हुकूमत चालवितात. समाजातील बावळी माणसेही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या शब्दाखातर हिंसा करतात. ती न जमली तर तिच्याकडे गौरवाने नसले तरी कौतुकाने पाहतात. कर्नल पुरोहित असे आदरणीय नाव धारण करणारी व्यक्ती समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी ठरते. का? तर ती एक्स्प्रेस पाकिस्तानला जाणारी असते आणि त्यात भारतीयांसोबत पाकिस्तानचे नागरिकही बसले असतात. या व्यक्तीचा पाकद्वेष एवढ्या विषारी पातळीवरचा की पाकिस्तानी नागरिकांसोबत आपली भारतीय माणसे मृत्यू पावली तरी त्याला त्याचे फारसे काही वाटत नाही. त्याच्यावर खटला चालतो आणि वर्षानुवर्षे साक्षी-पुरावे होऊनही तपासात काही त्रुटी राहिल्याचे सांगून व संशयाचा फायदा देऊन न्यायालय त्याला निर्दोष सोडते. मायबाप सरकारही मग त्याचे लष्करात पुनर्वसन करते. परिणामी असा अधिकारी लष्करातील कनिष्ठांची पुन्हा सलामी घेऊ लागतो व देशातील बावळेही त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागतात. त्याच्यावरचे इतर खटलेही मग दुर्लक्षिले जातात. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी प्रज्ञा सिंग ठाकूर या स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या दहशतखोर स्त्रीची आहे. ती मालेगावच्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. सुमारे दोन डझन निरपराध माणसे तिने मारल्याचा आरोप आहे. मोटारसायकलला बॉम्ब बांधून व त्यांचा स्फोट घडवून तिने हा हिंसाचार केला आहे. भारतीय अन्वेषण विभागाच्या सर्वाधिक गौरवान्वित असलेल्या हेमंत करकरे या अधिकाºयाने तिला अटक केली होती. तिच्याविरुद्धचे सगळे साक्षी-पुरावे त्यांनी अतिशय काळजीपूर्वक एकत्र केले. परंतु आठ वर्षे तुरुंगात राहिल्यावर ती जामिनावर सुटली. तिचे सुटणे महत्त्वाचे नाही.

ती सुटल्यानंतर समाजातील एका वर्गाने तिचा केलेला गौरव व तिच्या काढलेल्या मिरवणुका अनाकलनीय असतात. एवढ्यावर न थांबता ती सत्तारूढ भाजपकडे निवडणुकीचे तिकीट मागते आणि ते तिला दिलेही जाते. आताही प्रज्ञा सिंग भोपाळ क्षेत्रातून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तिचा भगवा पोशाख व वय पाहून वेडावलेला एक वर्ग तिच्यामागे जाईलही. भाजप व संघ परिवार तिला हिंदुरक्षक म्हणून डोक्यावरही घेईल. पण तिचे हिंदुरक्षक असणे त्याच पातळीवरचे असेल ज्या पातळीवर तालिबान आणि अल कायदाचे ‘मुस्लीमरक्षक’ त्यांच्या धर्माचे रक्षक असतात. कडव्या, कर्मठ आणि धर्मांध विचारांची सध्या जगात चलती आहे. मूलतत्त्ववाद्यांचा वावर हा विषय सार्वत्रिक आहे आणि त्यांचे स्वागतही होते. हे आंधळे धर्मवेड केवळ अशिक्षितांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर समाजातील सर्वच थरांत ते पोहोचल्याचे पाहावयास मिळते. देशाच्या सर्वसामान्य नागरिकापासून ते अगदी देशप्रमुखापर्यंत हे अतिरेकी विचार पसरल्याचे अनेक देशांमध्ये दिसून येते.
ट्रम्पचा उर्मटपणा लोकांना आवडतो, इस्रायलमध्ये नेत्यान्याहूसारखा घमेंडखोर माणूस पाचव्यांदा पंतप्रधान होतो, रशियाच्या पुतीनला तहहयात अध्यक्षपद प्राप्त होते आणि चीनचे शी जिनपिंग आयुष्यभर देशाचे अध्यक्ष व चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचेही अध्यक्ष राहतील अशी व्यवस्था होते. भारतातील भाजपचा विजय, गुजरातमधील दंगलींच्या गुन्हेगारांची निर्दोष सुटका व त्यांची संसद आणि विधानसभेतील निवडणूक याच प्रकाराची निदर्शक असते. समाजाला समंजस, समन्वयी आणि समता व पुरोगामी विचार चालत नसावे. तसे विचारवंतही त्याला आवडत नसावे. दाभोलकर मारले जातात, पानसरेंचा खून होतो, कलबुर्गी व गौरी लंकेश यांना गोळ्यांनी ठार केले जाते. त्यांचे मारेकरी मोकळे असतात. त्यांना पकडणारी यंत्रणा सरकारजवळ नसते. ही स्थिती गुन्हेगारांना धर्माचे पाठबळ मिळाले की त्यांना सुटकेचे आश्वासन देणारी ठरते. याही पुढे जाऊन त्यांना सत्तेत सहभागी होता येते हे सांगणारीही असते. येमेन व सिरिया, इस्रायल व अरब देश यात याहून वेगळे काय होत असते? अशा राजकारणाने एखादा पक्ष सत्तेत येईलही पण देशाच्या भवितव्याचा विचार कोण करणार, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळ