शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

विशेष लेख - न डरेंगे, न झुकेंगे! - शाह यांचा चीनला इशारा

By विजय दर्डा | Updated: April 17, 2023 10:09 IST

Amit Shah's warning to China: भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या गर्जनेचे पडसाद चीनला नक्कीच ऐकू गेले असतील.

- डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

चीनच्या आक्रमक वृत्तीला भारताकडून दिले जाणारे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराइतके कडक असत नाही, असा आरोप भारताच्या देशांतर्गत राजकारणात केंद्र सरकारवर कायमच होत आला. मग सरकार कुठल्याही पक्षाचे असी. सामान्य माणसालाही जवळपास असेच वाटत असते.

मात्र, गेल्या आठवडयात अरुणाचल प्रदेशात लागून असलेल्या सीमेपासून केवळ २९ किलोमीटर अंतरावरील फक्त १,२०० लोकसंख्या असलेल्या किबिथू या शेवटच्या भारतीय गावात जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निडर आणि स्पष्ट संदेश दिला आहे. हा १९६२ चा भारत देश नाही. आमची इंचभरही जमीन ... कोणी हडप करू शकत नाही।"

अगदी अलीकडेच चीनने त्यांच्या नकाशावर अरुणाचलमधील आणखी काही शहरांची नावे तिसऱ्यांदा बदलली. हे आम्हाला मान्य नाही, असे भारताने कळविले तेव्हा पुन्हा आरोप झाला की, चीनला इतका मवाळ प्रतिसाद का? त्यानंतर लगेच अमित शाह 'व्हायब्रंट व्हिलेज' योजना सुरू करण्यासाठी किबिथूला पोहोचले. हा व्हायब्रंट व्हिलेज' कार्यक्रम काय आहे? हे आधी सांगितले पाहिजे. सीमेवर वसलेल्या गावांच्या विकासाची हमी देऊन युद्धाची तयारी करत राहणे ही चीनची रणनीती सगळे जग जाणते. अरुणाचलपासून लडाखपर्यंत चीनने रस्ते तयार केले. जेणेकरून सीमेवर जलद गतीने आपले सैनिक पोहोचवता येतील. चीनने नवी गावेही वसवली. याला उत्तर एकच होते की. भारतानेही सीमेवरच्या आपल्या गावांपर्यंत सुविधा पोहोचविल्या पाहिजेत त्यासाठी ४,८०० कोटी रुपयांची एक केंद्रीय योजना मंजूर झाली आहे. केवळ रस्ते बांधण्यासाठी त्यात २,५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. अरुणाचल, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल आणि लडाखमध्ये सीमावर्ती १२ जिल्ह्यातील २,९६७ गावांमध्ये ही व्हायब्रंट व्हिलेज' निर्माण केली जाणार आहेत. किंवियू हे या योजनेतील पहिले गाव! 

किबिथू हेच गाव का? तर जरा इतिहासात डोकावून पाहू.  १९६२ साली याच गावात भारत आणि चीनची भीषण लढाई झाली होती. २१ ऑक्टोबर १९६२ ला विजय दर्डा कुमाऊं रेजिमेंटच्या सहा अधिकाऱ्यांनी कमालीचे शौर्य दाखवून इतिहास निर्माण केला. चिन्यांना मागे हटावे लागले. भारतीय सैन्याच्या इतिहासात या लढाईकडे अत्यंत सन्मानाने पाहिले जाते. केंद्रीय गृहमंत्री 'व्हायचं व्हिलेज' कार्यक्रम सुरू चीनला इशारा देण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. असे मानले जाते, ते त्यामुळेचा अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून हे गाव सुमारे ६०० किलोमीटर दूर आहे. चीनच्या सीमेच्या दिशेने असलेले हे शेवटचे गाव; परंतु नजरिया बदलला आहे हे सांगून अमित शाह म्हणाले, "हे शेवटचे नव्हे तर पहिले गाव आहे.

नजरिया बदलाचा संदेश भारताने 'जी २०' बैठकीतही दिला आहे. चीनने पुष्कळ विरोध केला. परंतु 'जी २०'ची बैठक इटानगरमध्ये झाली. ५० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला. 'जी २०' ची बैठक आता २२ ते २४ मे दरम्यान श्रीनगरमध्ये होईल. कदाचित चीन या बैठकीला येणारही नाही परंतु भारताने चीनची पर्वा करण सोडून दिले आहे. १९६२ च्या युद्धात अरुणाचल प्रदेशच्या जवळपास अर्ध्या भागावर चीनने कब्जा केला होता. त्यावेळी या भागाला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी' (नेफा)  म्हणून ओळखले जात असे. १९७२ मध्ये अरुणाचलला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली आणि १९८७ साली ते पूर्ण राज्य झाले. १९६२ च्या युद्धात चीनने केलेल्या कब्जाची गोष्ट मी सांगत होतो. चीनला वाटले असते तर त्यांनी या भागावरील हक्क सोडला नसता; मग चीनने तो भाग परत का दिला? वास्तवात चीनला हे माहीत होते की, झुकणार अरुणाचलमधील लोक चीनचे शासन कधीही स्वीकारणार नाहीत. मोठे दंड होईल म्हणून कब्जा सोडून देण्यात आपले हित आहे हे चीनने जाणले.

मग आता चीन अरुणाचलवर दावा का करतो ? असा प्रश्न निर्माण होईल. चीनला हे माहीत आहे की, भारत आपल्या सर्वांगीण विकासावर सध्या लक्ष देत आहे. अर्थव्यवस्था, उद्योगांपासून पायाभूत सुविधापर्यंत भारताने खूपच मोठी झेप घेतली आहे. हा देश आता पाचवी आर्थिक शक्ती झाला आहे आणि २०४० पर्यंत तिसरी शक्ती होईल. अरुणाचलातील शिओमी जिल्ह्यात युरेनियम शोधण्यात भारताने पुष्कळच प्रगती केल्याचे चीनला माहीत आहे. या प्रगतीने चीनचा भडका उडतो. मग तो भारताचे लक्ष विचलित करण्यासाठी असे चिमटे काढत राहतो, कधीही आपल्या शहरांची नावे परस्पर बदलतो तर कधी भारताचे पंतप्रधान मंत्री अरुणाचलच्या दौऱ्यावर गेले तर विनाकारण त्याला आक्षेप घेतो. कधी सीमेवर उत्पात करतो. आपले जवान चिन्यांना ठोकून काढतात, तर चकमकीत आपले किती सैनिक मरण पावले हेही तो देश सांगत नाही.अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध लढण्यासाठी पॅटन रणगाडे दिले होते आणि आपण त्याचे खेळ करून टाकले हे चीनला ठाऊक नाही काय ?

सीमेवरील गावात जाऊन अमित शाह यांनी चीनला कडक इशारा दिला आहे की, तू जर १०० किलो वजन गटातला पहिलवान असतील तर आम्ही काही १०  किलोचे पहिलवान नव्हे लक्षात ठेव, ६० किलोचा पहिलवान सुद्धा १०० किलो वजनगटातील पहिलवानाला चितपट करतो। शत्रूला आम्ही कमजोर मानत नाही; परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की. तुम्ही डोळे वटारावेत. आम्हाला चिमटे काढावेत १९६२ च्या युद्धात आमच्या सैनिकांकडे शून्यापेक्षा कमी तापमानात घालायचे कपडेही नव्हते. आता आमच्या सैनिकांकडे सहा पदरी गरम कपड़े आहेत आणि ते सियाचीन हिमनदीच्या प्रदेशात पूर्ण वर्षभर पहारा देत असतात. परिस्थिती कशीही असो, आम्ही ना घाबरणार, ना  झुकणार. 

व्यक्तिगत पातळीवर एक भारतीय नागरिक या नात्याने मी चीनला हे जरूर सांगू इच्छितो की, अशा खोड्या काढणे, बंद करावे आणि भगवान बुद्धाच्या रस्त्याने चालावे. बुद्धाला तसेही तुम्ही त्यागलेच आहे. आम्ही मात्र भगवान बुद्ध भगवान महावीर आणि गांधीजींनी दाखवलेल्या रस्त्यानेच आत आहोत. सत्य आणि अहिंसा आमची सर्वात मोठी ताकद आहे. आमच्याकडे सर्व धर्म समभाव आहे. तुम्ही तर धर्म सोडूनच दिला आहे लोक लपून छपून पूजा, प्रार्थना करतात. आमच्याकडे लोकशाही आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले नेतृत्त्व आहे. तुम्ही तर आपल्या लोकांचा आवाज बंद करून टाकला आहे. तुमच्या परी बडखोरी उपजते आहे. ती बंदुकीच्या जोरावर कुठपर्यंत रोखाल ? दुसऱ्याला नष्ट करण्याचे चक्र फिरवाल, तर एक दिवस जग तुमच्याकडचे सामान खरेदी करणे बंद करून टाकील. त्या दिवशी तुम्ही जमिनीवर यात तुमची ताकद आम्ही उत्तम प्रकारे जाणून आहोत. भ्रमात राहू नका. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशindia china faceoffभारत-चीन तणाव