शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

प्रबोधनाची ही परंपरा अशी नासवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:42 IST

नागपुरात सध्या कीर्तन महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आयोजित केला असल्याने त्याच विचारांचे कीर्तनकार इथे अपेक्षित आणि इतर उपेक्षित राहणार आहेत. त्याबद्दल कुणाचा विरोधही नाही.

- गजानन जानभोरनागपुरात सध्या कीर्तन महोत्सव सुरू आहे. हा महोत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आयोजित केला असल्याने त्याच विचारांचे कीर्तनकार इथे अपेक्षित आणि इतर उपेक्षित राहणार आहेत. त्याबद्दल कुणाचा विरोधही नाही. परंतु या महोत्सवात सहभागी होणाºया कीर्तनकारांचे श्रेष्ठत्व सांगताना विदर्भातील इतर कीर्तनकारांना नालायक ठरविण्याचा अश्लाघ्य प्रकार या महोत्सवाच्या आयोजकांकडून झाला असल्याने त्याची कठोर शब्दात दखल घेणे आणि पर्यायाने त्यांची लायकीही दाखवून देणे समाजहिताचे ठरते.या महोत्सवातील कीर्तनकारांना सामान्य जनता ओळखत नाही. संघपरिवाराच्या चौकटीपलीकडे त्यांना कुणी किंमत देत नाही. मग इथेच त्यांना का बोलावण्यात आले? पात्रता एकच, ते कट्टर हिंदुत्वाचे वाहक आहेत. इथे राष्टÑसंतांवर कीर्तन करणारे बुवा एरवी कुठे दिसत नाहीत. धर्माभिमान जागविणे आणि हिंदुत्वाचा प्रसार करणे एवढाच अंतस्थ हेतू अशा कीर्तन महोत्सवाच्या आयोजनामागे असतो. त्याबद्दलही आमचे काहीच दुखणे नाही. परंतु स्वत:ची थोरवी गाताना इतरांना तुच्छ लेखण्याची सडलेली मानसिकता समाजात अजूनही कायम आहे. गुणवत्ता असूनही केवळ जातीवरून लायकी ठरविणारे नवे भांडवलदार आता सर्वंच जातीत दिसतात. ते एकत्र येतात तेव्हा त्यांचा मेळावा किंवा महोत्सव होतो. हा कीर्तन महोत्सव त्यातीलच एक. या कीर्तन महोत्सवाच्या व्यासपीठावर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज कधी दिसणार नाहीत. कारण ते उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडताना गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनाचा प्रवाह पुढे नेतात, ज्ञानेश्वर-तुकारामही सांगतात. पण त्यांचे विचार हिंदुत्ववाद्यांना पचनी पडणारे नसतात. संघप्रणीत कीर्तन महोत्सवात भागवत-पुराणाच्या महतीचे बोधामृत पाजले जातात. सत्यपाल असोत किंवा इंजिनियर भाऊ थुटे, संदीप पाल, तुषार पाल. या कीर्तनकारांची परंपरा परिवर्तनाची असल्याने त्यांना अशा ठिकाणी कधीच बोलावले जात नाही. पण लोकं आपल्यावर टीका करतील या भीतीने मग हे आयोजक मानधनाचे किंवा लायकी नसल्याचे कारण समोर करतात.या कीर्तन महोत्सवाच्या आयोजकांनी विदर्भातील कीर्तनकारांची लायकी ठरविताना केवळ त्यांनाच अपमानित केलेले नाही तर बहुजन संतांशी नाते सांगणाºया प्रबोधनाच्या परंपरेला बदनाम करण्याचा कुटील डावही त्यामागे आहे. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला ‘संडास साफ करणारी गीता’ असे संबोधणाºया निवृत्ती वक्ते या महाराजाला अशा व्यासपीठावर स्थान दिले जाते आणि महाराष्टÑ सरकार त्याला पुरस्कृतही करीत असते. तुकारामाच्या भूवैकुंठगमनाची भाकड कथा लिहिणारेही या मंडळींना हवे असतात. आपल्या कीर्तनातून विकृती पसरवायची आणि समाजमन नासवायचे एवढेच काम या बुवांचे असते. सत्यपाल महाराजांसारखे प्रबोधनकार धर्माची चिकित्सा करतात. देवाच्या नावावर खारका-बदामा खाणाºयांना झोडपून काढतात. परिवर्तनाचा हा क्रांतिकारी विचार आपली धर्मसत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती अशा मंडळींना सतत वाटत असते. या धर्माभिमान्यांना आमचे एवढेच सांगणे आहे की, तुम्ही खुशाल तुमच्या व्यासपीठावर कुणालाही बोलवा, त्यांच्या आरत्या ओवाळा, त्यांचे बुरसटलेले विचार आत्मसात करा, तुमच्या परंपरेचा तो भागच आहे. पण विदर्भातील प्रबोधनाची ही परंपरा अशी नासवू नका.

टॅग्स :social workerसमाजसेवक