शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दिव्याखाली अंधार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:24 AM

ग्रामपंचायतींना जादा स्वायत्तता मिळावी. गावाचा विकास करताना ग्रामपंचायतीला सरकार वा प्रशासकीय स्तरावर अडचणी येऊ नये यासाठी सक्षमीकरणाची मोहीम देशभरात राबविण्यात आली.

ग्रामपंचायतींना जादा स्वायत्तता मिळावी. गावाचा विकास करताना ग्रामपंचायतीला सरकार वा प्रशासकीय स्तरावर अडचणी येऊ नये यासाठी सक्षमीकरणाची मोहीम देशभरात राबविण्यात आली. यात आपला पुरोगामी महाराष्ट्रही मागे नाही. येथे तर सरपंचाची निवडणूक थेट जनतेच्या माध्यमातून करण्याचा कौतुकास्तपद निर्णय घेण्यात आला. मात्र लोकशाही कधी कधी अतिस्वायत्तता आणि त्यावर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेच्या अधिकारात कपात करण्यात आल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर महापालिकेत एलईडी लाईटच्या खरेदीचा घोटाळा ताजा असताना नागपूर जिल्ह्यातील ६३८ ग्रामंपचायतीमध्ये एलईडी लाईटच्या खरेदीवर अवास्तव निधी उधळल्याची बाब पुढे आली आहे. या घोटाळ्यात थेट जनेतून निवडून आलेल्या सरंपचावरही नागपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाने ठपका ठेवला आहे. अंदाजे २५ कोटी रुपयांच्या लाईट खरेदी घोटाळ्याप्रकरणी पंचायत राज विभागाने १३ विस्तार अधिकाºयांसह ६३८ सरपंच, सचिवांना नोटीस बजावली आहे. विकासाच्या प्रवाहात गावात प्रकाशव्यवस्था करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अधिकचा पैसा उधळल्याने ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण झाले की भ्रष्टाचार वाढला, ही निश्चितच चिंतनाची बाब आहे. दिल्लीतून येणारा एक रुपया गावापर्यंत पोहोचताना घटत येतो असा काँग्रेसचे सरकार असताना विरोधकांकडून आरोप होत होता. यानंतर आता वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळू लागला. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीला विकास निधी थेट मिळत असल्याने त्यांना गावात एलईडी लाईट बसवायचे होते. आयएसआय मार्क व ठरवून दिलेल्या आकृतिबंधानुसार ही खरेदी करायची होती़ परंतु ग्रामपंचायतींनी हजार रुपयांची होणारी खरेदी ५ ते १० हजार रुपयांना दाखविली़ या खरेदीत सर्वाधिक घोळ नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, कामठी, सावनेर तालुक्यात झाला आहे़. राजकीयदृष्ट्या विचार केला तर या तीनपैकी दोन तालुक्यात भाजपचे प्रभृत्व जास्त आहे. त्यामुळे घोटाळे केवळ कॉँग्रेसच्या काळात होत होते. भाजपच्या काळात याला थारा नाही, असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे ठरेल. मुळात ग्रामविकासात राजकीय पक्षापेक्षा गावाचा विकास आणि गावाच्या प्रमुखाला कायद्याने अधिक अधिकार दिले असले तरी भारतीय स्वातंत्र्यानंतर आजही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. उलट गावाच्या राजकारणात आणि तेथील पक्षीय कलहात वाढ झाली आहे. विद्यमान मोदी सरकारने देशात ‘साफ नियत, सही विकास’ हा नारा दिला असतानाच देशात, राज्यात आणि नागपूर जिल्ह्यात भाजपचे सरकार असताना साध्या एलईडी लाईटच्या खरेदीत भ्रष्टाचार होणे. चौकशी समितीत यावर शिक्कामोर्तब होणे, ही बाब मोदी सरकारच्या ‘साफ नियत, सही विकास’ या संकल्पाला हरताळ फासणारी आहे. त्यामुळे दिव्याखालीच अंधार असल्याने गावात उजेड पडणार कसा ?