शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

'एक तर पिकत नाही, पिकले की विकत नाही'; कांदा उत्पादकांची अनुदानावर बोळवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:24 IST

नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगरसह मराठवाड्यातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनात देशात प्रसिद्ध आहे. परंतु कांद्याचे दर इतके घसरले की किलोमागे ५२ पैसे अन् ५५ पैसे मिळू लागले.

- धर्मराज हल्लाळे

नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगरसह मराठवाड्यातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनात देशात प्रसिद्ध आहे. परंतु कांद्याचे दर इतके घसरले की किलोमागे ५२ पैसे अन् ५५ पैसे मिळू लागले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील वैतागलेल्या शेतक-यांनी शेकडो हेक्टरवर नांगर फिरविला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये रस्त्यावर कांदा फेकला गेला. अशावेळी शेतकºयांना दिलासा देण्यासाठी क्विंटलमागे २०० रुपये अनुदान देऊन सरकारने एकप्रकारे बोळवण केली आहे. वास्तविक पाहता एकरभर कांद्याचे पीक घेण्यासाठी सुमारे ४१ हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये मशागतीसाठी ५ हजार रुपये, वाफे तयार करण्यासाठी ३ हजार रुपये, बियाणे ३२०० रुपयांचे, रोप लागवड ४ हजार, खते ३ हजार, खुरपणी ५ हजार, तणनाशक १२०० रुपये, फवारणी २ हजार आणि काढणीसाठी १४ हजार रुपये खर्च येतो. असे एकूण ४१ हजार रुपये खर्च करून एका एकरमध्ये साधारणत: ९ टन उत्पादन होते. विशेष म्हणजे वीज, पाणी आणि शेतक-याची मेहनत वेगळी.

एकंदर कवडीमोल भावाने कांदा विकला जात असल्याने शेतक-यांत असंतोष आहे. देशात कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यामध्ये एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. हे पीक जवळपास तीन महिन्यांचे असते. एकंदर खर्च आणि पदरात पडणारा पैसा याचा ताळमेळ लागत नाही. कांदा महागला की शेतक-यांच्या हाती नसतो. दर पडले की शेतक-याच्या दारात असतो. उत्पादन खर्च तर निघतच नाही. शिवाय बाजारपेठेत नेण्यासाठी वाहनाचा खर्चही परवडत नाही, अशी स्थिती आहे. सरकारने प्रतिक्विंटल २०० रुपये म्हणजेच किलोला २ रुपये अनुदान दिलेले आहे. तीही थट्टाच आहे. शासनाचे अनुदान म्हणजे जाचक अटी आल्या. शेतक-यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत बाजार समितीमध्येच कांदा विकलेला असावा, अशी अट आहे. साहजिकच त्याची पट्टी शेतक-याकडे असली पाहिजे.

मुळातच लातूर, उस्मानाबाद या भागातील शेतकरी महाराष्ट्रात कांद्याला भाव नसल्याने हैदराबाद, बेंगळुरू येथील बाजारपेठांमध्ये कांदा पाठवितात. त्यामुळे कांद्यावरील अनुदानाचा कसलाही लाभ येथील शेतक-यांना मिळणार नाही. शिवाय अटीवर अटी टाकणार नाही, ते सरकार कसले? क्विंटलला २०० रुपये अनुदान, तेही २०० क्विंटल मर्यादेपर्यंतच मिळणार आहे. ज्यामुळे अधिक उत्पादन झालेल्या शेतक-यांना लाभ होणार नाही. लातूर-उस्मानाबादचा बहुतांश कांदा परराज्यात गेला. उरलेल्या शेकड्यातील कांद्यावर तुटपुंजे अनुदान मिळेल. परंतु राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ७५ लाख क्विंटल कांदा विकला गेला आहे. त्यांना तेवढा लाभ होईल. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. जिथे पाणी होते, तिथे कांदा घेतला गेला. कांदा पिकला. नेहमीप्रमाणे एक तर पिकत नाही, आणि पिकले तर विकत नाही, हे दुष्टचक्र शेतक-यांच्या माथी आहे. परिणामी कांदा उत्पादक खर्चही काढू शकले नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा