शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

'एक तर पिकत नाही, पिकले की विकत नाही'; कांदा उत्पादकांची अनुदानावर बोळवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:24 IST

नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगरसह मराठवाड्यातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनात देशात प्रसिद्ध आहे. परंतु कांद्याचे दर इतके घसरले की किलोमागे ५२ पैसे अन् ५५ पैसे मिळू लागले.

- धर्मराज हल्लाळे

नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगरसह मराठवाड्यातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनात देशात प्रसिद्ध आहे. परंतु कांद्याचे दर इतके घसरले की किलोमागे ५२ पैसे अन् ५५ पैसे मिळू लागले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील वैतागलेल्या शेतक-यांनी शेकडो हेक्टरवर नांगर फिरविला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये रस्त्यावर कांदा फेकला गेला. अशावेळी शेतकºयांना दिलासा देण्यासाठी क्विंटलमागे २०० रुपये अनुदान देऊन सरकारने एकप्रकारे बोळवण केली आहे. वास्तविक पाहता एकरभर कांद्याचे पीक घेण्यासाठी सुमारे ४१ हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये मशागतीसाठी ५ हजार रुपये, वाफे तयार करण्यासाठी ३ हजार रुपये, बियाणे ३२०० रुपयांचे, रोप लागवड ४ हजार, खते ३ हजार, खुरपणी ५ हजार, तणनाशक १२०० रुपये, फवारणी २ हजार आणि काढणीसाठी १४ हजार रुपये खर्च येतो. असे एकूण ४१ हजार रुपये खर्च करून एका एकरमध्ये साधारणत: ९ टन उत्पादन होते. विशेष म्हणजे वीज, पाणी आणि शेतक-याची मेहनत वेगळी.

एकंदर कवडीमोल भावाने कांदा विकला जात असल्याने शेतक-यांत असंतोष आहे. देशात कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यामध्ये एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. हे पीक जवळपास तीन महिन्यांचे असते. एकंदर खर्च आणि पदरात पडणारा पैसा याचा ताळमेळ लागत नाही. कांदा महागला की शेतक-यांच्या हाती नसतो. दर पडले की शेतक-याच्या दारात असतो. उत्पादन खर्च तर निघतच नाही. शिवाय बाजारपेठेत नेण्यासाठी वाहनाचा खर्चही परवडत नाही, अशी स्थिती आहे. सरकारने प्रतिक्विंटल २०० रुपये म्हणजेच किलोला २ रुपये अनुदान दिलेले आहे. तीही थट्टाच आहे. शासनाचे अनुदान म्हणजे जाचक अटी आल्या. शेतक-यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत बाजार समितीमध्येच कांदा विकलेला असावा, अशी अट आहे. साहजिकच त्याची पट्टी शेतक-याकडे असली पाहिजे.

मुळातच लातूर, उस्मानाबाद या भागातील शेतकरी महाराष्ट्रात कांद्याला भाव नसल्याने हैदराबाद, बेंगळुरू येथील बाजारपेठांमध्ये कांदा पाठवितात. त्यामुळे कांद्यावरील अनुदानाचा कसलाही लाभ येथील शेतक-यांना मिळणार नाही. शिवाय अटीवर अटी टाकणार नाही, ते सरकार कसले? क्विंटलला २०० रुपये अनुदान, तेही २०० क्विंटल मर्यादेपर्यंतच मिळणार आहे. ज्यामुळे अधिक उत्पादन झालेल्या शेतक-यांना लाभ होणार नाही. लातूर-उस्मानाबादचा बहुतांश कांदा परराज्यात गेला. उरलेल्या शेकड्यातील कांद्यावर तुटपुंजे अनुदान मिळेल. परंतु राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ७५ लाख क्विंटल कांदा विकला गेला आहे. त्यांना तेवढा लाभ होईल. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. जिथे पाणी होते, तिथे कांदा घेतला गेला. कांदा पिकला. नेहमीप्रमाणे एक तर पिकत नाही, आणि पिकले तर विकत नाही, हे दुष्टचक्र शेतक-यांच्या माथी आहे. परिणामी कांदा उत्पादक खर्चही काढू शकले नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा