शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

हुकूमशाहीची पावले या भूमीवर कदापि उमटणार नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 12:46 IST

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेली पिछेहाट स्वीकारण्याचे धारिष्ट्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाखविले नाही

- धर्मराज हल्लाळे

यशाला कैक बाप असतात. मात्र अपयश अनाथ असते, असे विधान प्रचलित आहे. परंतु अनेकदा एखाद्या व्यक्तीभोवती यशाचे वलय उभे केले जाते अथवा उभे राहिलेले दिसते. अगदी खेळातही कर्णधार विजयाची पताका स्वत:च्या खांद्यावर घेतो. मात्र कुठलाही जय एकट्याचा असत नाही आणि पराजयही कोण्या एकाचे अपयश राहत नाही. परंतु देशातील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यशाचे एकमेव शिलेदार विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी राहिले. श्रेय घेण्याची नव्हे तर देण्याची इतकी स्पर्धा लागली की, महापालिकांपासून ग्रामपंचायतींपर्यंत जी विजयाची शृंखला उभारली त्याचे शिरोमणी मोदीच राहिले. त्यात तथ्य होते. देशातील १८ ते २५ वयोगटातील मतदारांनी मोदींमध्ये आपले नेतृत्व पाहिले. भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी या सर्वच मुद्यांवर नरेंद्र मोदी जितक्या त्वेषाने बोलत होते, तितक्याच गतीने त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावला होता. ज्याचे पडसाद लोकसभेच्या यशानंतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रारंभाला दिसले. देशाचा नकाशा न्याहाळला तर जिकडे तिकडे कमळ उमलताना दिसत होते. या सर्व यशकथांमध्ये गुंग झालेल्या भाजपा नेत्यांना जनतेत झालेल्या अपेक्षांच्या क्रांतीची म्हणावी तशी जाणीव झाली नाही, हे राज्यांच्या निकालावरून स्पष्ट होते. 

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोराममध्ये झालेली पिछेहाट स्वीकारण्याचे धारिष्ट्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दाखविले नाही. एका वाक्यात ही निवडणूक राज्याच्या कारभारावर होती, त्यात मोदी यांचा थेट संबंध नाही हाच आशयार्थ राजनाथ सिंह यांच्या बोलण्याचा होता. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार समोर केले असले, तरी प्रचाराच्या केंद्रस्थानी मोदी आणि त्यांचे ‘सुशासन’ होते. या राज्यांच्या निवडणुकीत यश मिळाले असते तर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या पदरी नव्हे, तर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्याच खात्यात विजयाचा करिश्मा जमा केला असता. परिणामी, पराभवाच्या जबाबदारीपासूनही ते आता दूर जाऊ शकत नाहीत. तुम्ही बदल घडवाल, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण कराल, काळा पैसा भारतात आणाल, या अपेक्षा जनतेने ठेवल्या होत्या. जे काही घडेल ते तत्काळ आणि विनाविलंब लाभ पदरात पडेल, अशीही सर्वसामान्यांची धारणा होती. नोटाबंदीनंतर प्रारंभीचा काळ संमिश्र प्रतिक्रियांचा होता. धनदांडग्यांचा पैसा जप्त होईल अन्यथा त्यांना कुठेतरी नदी-नाल्यांमध्ये सोडून द्यावा लागेल, असे चित्र काहींनी रंगविले. परंतु गरीब माणूसच रांगेत थांबून बेजार झाला. शेकडोंनी प्राण गमावले. अन् कोठेही चलनातून बाद झालेल्या नोटा रस्त्यावर, नदी-नाल्यात दिसल्या नाहीत. शिवाय पैसे दडवून ठेवणाºयांवर दृश्य स्वरुपात कारवाई झाली नाही. आॅनलाईन, डीजिटल अर्थव्यवस्थेच्या गप्पा झाल्या, प्रत्यक्षात दोन हजार रुपयांची नोट अल्पावधीत तिजोºयांमध्ये बंद झाली. घोषणाबाजी करून, रोज नव्या निर्णयांनी बदलाचे वलय निर्माण करून काही काळ जनतेचे रंजन झाले, परंतु त्यांचे मन परिवर्तन करण्यात शासकांना यश मिळाले नाही.

लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचंड बहुमतानंतर ज्या तऱ्हेने एकामागून एक राज्य भाजपाच्या ताब्यात येत होते, सर्व स्वायत्त संस्थांवर प्रभाव टाकला जात होता त्यावरून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे, असा आरोप विरोधक करू लागले. खरे तर संसदीय लोकशाही असलेल्या भारतात काही काळ एखादा पक्ष अर्थात एखादी व्यक्ती एककल्ली कारभार करू शकेल, परंतु हुकूमशाहीची पावले या भूमीवर कदापि उमटणार नाहीत, हेच या निकालाने ठणकावून सांगितले आहे. साक्षरता, सुशिक्षितपणा आणि राजकीय शहाणपण अशा सर्व कसोट्या पूर्ण करून भारतीय मतदारांनी ज्यांना बहुमत दिले त्यांच्याकडे सत्तेचे केंद्रीकरण दिसताच त्यांना बाहेरचाही रस्ता दाखविला. स्वातंत्र्यानंतर विकास किती झाला हे सर्वजण स्वअनुभवावरून सांगत राहतील, परंतु या देशाची लोकशाही प्रगल्भ आणि प्रगल्भ होत आहे. केंद्रात दांडगे बहुमत असले तरी देशातील राज्यांचे कारभारी वेगवेगळे राहतील, याची काळजी या निकालाने घेतली आहे. केंद्राची सूची आणि राज्याची सूची घटनेत नमूद आहे. केंद्र कोणते कायदे करू शकते, राज्य कोणते कायदे करू शकते, कोणाचे काय अधिकार आहेत, हे घटनेत नमूद आहे. सार्वभौम देशात राज्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. त्यामुळे देशात कोणीतरी हुकूमशहा जन्माला येईल आणि मनमर्जी करेल हे होणे नाही.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल