शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

देवेंद्र फडणवीस सरकारची आश्वासक वाटचाल पण....

By यदू जोशी | Updated: October 30, 2017 02:18 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा, ‘येन्न रे बाबू, खेलनं रे गोया, आता काऊन म्हनतं फुटला डोया’, अशी आपली अवस्था असल्याचे वक्तव्य त्यांनीच केले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा, ‘येन्न रे बाबू, खेलनं रे गोया, आता काऊन म्हनतं फुटला डोया’, अशी आपली अवस्था असल्याचे वक्तव्य त्यांनीच केले होते. मुख्यमंत्रिपदाचा मुकुट सोनेरी पण काटेरीही असल्याचे त्यातून त्यांनी सूचित केले होते. उद्या ३१ तारखेला त्यांच्या नेतृत्वातील सरकार तीन वर्षे पूर्ण करीत आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि दुसरीकडे शिवसेनेचा विरोध सहन करीत त्यांनी त्यांची मांड तीन वर्षांत पक्की केली आहे. समृद्धी महामार्ग, छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, मुंबई मेट्रोचा विस्तार अन् पुणे, नागपुरात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात, शेतकºयांची कर्जमुक्ती, जलयुक्त शिवार, कृषीविकासाचा वाढलेला दर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस अंतर्गत उद्योगांच्या परवानग्या कमी करणे, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत गरजूंना केलेली कोट्यवधींची मदत, सीएसआर फंडातून खेड्यांचा चेहरामोहरा बदलविणारी योजना, विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंपांचा भरला जात असलेला अनुशेष, नमामि चंद्रभागा या त्यांच्या काही उपलब्धी आहेत. प्रचंड अभ्यास, आधुनिकतेचा ध्यास आणि त्याला दूरदृष्टीची जोड असलेला हा तरुण नेता निगर्वी आहे आणि त्याला राजकारणातून निर्माण होणाºया अर्थकारणात काडीचाही रस नाही. स्वत:शी स्पर्धा करणारा हा उमदा नेता आहे. त्यांच्या हेतूवर शंका घेण्यासारखे काहीही नसते. राज्याला कुठून कसे खरडून खाता येईल हा अ‘राष्ट्रवादी’ विचार नसतो कारण त्यांचे ‘आदर्श’ वेगळे आहेत. मात्र, ज्या वेगाने मुख्यमंत्री चालतात त्या वेगाने त्यांचे मंत्रिमंडळ चालताना आजही दिसत नाही. सरकार चालविण्याच्या सामुदायिक जबाबदारीची उणीव ही या सरकारची डावी बाजू. कामगिरीचाच निकष लावला तर भाजपा-शिवसेनेच्या किमान १५ मंत्र्यांना घरी पाठवावे लागेल, अशी स्थिती आहे. शेतकरी आंदोलन, अंगणवाडी सेविका, एसटी कर्मचाºयांचा संप हाताळताना तसेच तूर खरेदी गैरव्यवहारात संबंधितांचे अपयश अधोरेखित झाले. अंगणवाडी सेविकांना पंकजा मुंडेंनी बरेच काही दिले पण त्यांना श्रेय घेता आले नाही. सरकारचे चांगले निर्णय लोकापर्यंत पोहोचविण्यात पक्ष म्हणून भाजपा कमी पडल्याचे दिसते. केंद्र व अनेक राज्यात सरकार असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावरील टीकेने पुरते गोंधळले असून खरेच आपली सरकारे काहीच करीत नसल्याचा ‘कॉम्प्लेक्स’ त्यांना आलेला आहे. महापालिकांपासून ग्राम पंचायतींपर्यंत अत्यंत चांगले यश मिळूनही भाजपा कार्यकर्ते बॅकफूटवर दिसतात.जाता जाता : कुठल्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छाऐवजी पाहुण्यांना पुस्तक भेट द्यावे, असा एका विभागाचा कल्पक जीआर निघाला तेव्हा त्याच्या कौतुकाच्या बातम्या झाल्या. आज त्या खात्याच्या मंत्र्यांनाच अनेक कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ दिले जातात, तेव्हा हसू येते. १५०० चौरस फुटापर्यंतच्या जागेवर घर बांधायचे तर कोणतीही परवानगी लागणार नाही, हा लालफितशाहीतून मुक्ती देणारा मुख्यमंत्र्यांचा निर्णय महापालिका, नगरपालिकांपर्यंत अद्याप पोहोचू शकलेला नाही. गेल्या तीन वर्षांत सर्व विभागांचे मिळून १० हजार जीआर निघाले. त्यातील बदल्या, पदोन्नत्यांचे सोडा पण निर्णय असलेल्या जीआरची अंमलबजावणी किती झाली याचा धांडोळाही घेतला पाहिजे. नाहीतर हे जीआर सरकार असल्याची टीका होत राहील. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार