शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:22 IST

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का?

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का? सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य एवढे बिघडलेच कसे, असे एक ना अनेक प्रश्न उपराजधानीतील नागरिकांना सतावत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. अलीकडेच माहितीच्या अधिकारांतर्गत शहरातील गुन्हेगारीची जी आकडेवारी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि समाजाची चिंता वाढविणारी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. या शृंखलेत गेल्या आठवड्यात झालेल्या प्राचार्य वानखेडे हत्याकांडाने तर केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे, सा-या पंचक्रोशीला हादरवून टाकले.

मृत प्राचार्यांच्या मुलीनेच आपल्या वडिलांची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून ही घटना आपले कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य किती बिघडत चालले आहे, याचे जळजळीत वास्तव मांडणारी आहे. खुनांची संख्या वाढली असतानाच लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. अत्यंत पाशवी, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनांचा विचार केला की एवढे प्रचंड क्रोैर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कुठून येते तेच कळत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होताना दिसतात. जगण्यात सहजता राहिलेली नाही. परस्पर अविश्वासाचे वातावरण आणि नकारात्मकतेने समाजजीवन ढवळून निघाले आहे.

गुन्ह्यांच्या या आकड्यांसोबतच आत्महत्येचे जे प्रमाण समोर आले आहे ते सुद्धा भयभीत करणारे आहे. राज्याच्या या उपराजधानीत अवघ्या नऊ महिन्यात दीड हजारावर लोकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याचा अर्थ दिवसाला सरासरी पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपूर शहरावर संपूर्ण देशाची नजर असते. त्या अनुषंगाने आता संपूर्ण देशाच्या गुन्हेगारीचा विचार होत असताना नागपूर शहराचीही आवर्जून दखल घेतली जात असते आणि अशा अध्ययनात नागपूरची तुलना आता मुंबई आणि कोलकाताशी व्हायला लागली आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी असल्याचे चित्र रंगवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री करीत असतात. त्यांचे म्हणणे बरोबर असले तरी वाढत्या गुन्ह्यांचे वास्तवही नजरअंदाज करता येणार नाही. त्याचप्रमाणे हा प्रश्न केवळ कायदा आणि व्यवस्थेवर सोपवूनही चालणार नाही. बदलती सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीही त्याला जबाबदार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस