शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:22 IST

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का?

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का? सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य एवढे बिघडलेच कसे, असे एक ना अनेक प्रश्न उपराजधानीतील नागरिकांना सतावत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. अलीकडेच माहितीच्या अधिकारांतर्गत शहरातील गुन्हेगारीची जी आकडेवारी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि समाजाची चिंता वाढविणारी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. या शृंखलेत गेल्या आठवड्यात झालेल्या प्राचार्य वानखेडे हत्याकांडाने तर केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे, सा-या पंचक्रोशीला हादरवून टाकले.

मृत प्राचार्यांच्या मुलीनेच आपल्या वडिलांची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून ही घटना आपले कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य किती बिघडत चालले आहे, याचे जळजळीत वास्तव मांडणारी आहे. खुनांची संख्या वाढली असतानाच लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. अत्यंत पाशवी, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनांचा विचार केला की एवढे प्रचंड क्रोैर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कुठून येते तेच कळत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होताना दिसतात. जगण्यात सहजता राहिलेली नाही. परस्पर अविश्वासाचे वातावरण आणि नकारात्मकतेने समाजजीवन ढवळून निघाले आहे.

गुन्ह्यांच्या या आकड्यांसोबतच आत्महत्येचे जे प्रमाण समोर आले आहे ते सुद्धा भयभीत करणारे आहे. राज्याच्या या उपराजधानीत अवघ्या नऊ महिन्यात दीड हजारावर लोकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याचा अर्थ दिवसाला सरासरी पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपूर शहरावर संपूर्ण देशाची नजर असते. त्या अनुषंगाने आता संपूर्ण देशाच्या गुन्हेगारीचा विचार होत असताना नागपूर शहराचीही आवर्जून दखल घेतली जात असते आणि अशा अध्ययनात नागपूरची तुलना आता मुंबई आणि कोलकाताशी व्हायला लागली आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी असल्याचे चित्र रंगवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री करीत असतात. त्यांचे म्हणणे बरोबर असले तरी वाढत्या गुन्ह्यांचे वास्तवही नजरअंदाज करता येणार नाही. त्याचप्रमाणे हा प्रश्न केवळ कायदा आणि व्यवस्थेवर सोपवूनही चालणार नाही. बदलती सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीही त्याला जबाबदार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस