शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:22 IST

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का?

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का? सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य एवढे बिघडलेच कसे, असे एक ना अनेक प्रश्न उपराजधानीतील नागरिकांना सतावत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. अलीकडेच माहितीच्या अधिकारांतर्गत शहरातील गुन्हेगारीची जी आकडेवारी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि समाजाची चिंता वाढविणारी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. या शृंखलेत गेल्या आठवड्यात झालेल्या प्राचार्य वानखेडे हत्याकांडाने तर केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे, सा-या पंचक्रोशीला हादरवून टाकले.

मृत प्राचार्यांच्या मुलीनेच आपल्या वडिलांची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून ही घटना आपले कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य किती बिघडत चालले आहे, याचे जळजळीत वास्तव मांडणारी आहे. खुनांची संख्या वाढली असतानाच लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. अत्यंत पाशवी, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनांचा विचार केला की एवढे प्रचंड क्रोैर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कुठून येते तेच कळत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होताना दिसतात. जगण्यात सहजता राहिलेली नाही. परस्पर अविश्वासाचे वातावरण आणि नकारात्मकतेने समाजजीवन ढवळून निघाले आहे.

गुन्ह्यांच्या या आकड्यांसोबतच आत्महत्येचे जे प्रमाण समोर आले आहे ते सुद्धा भयभीत करणारे आहे. राज्याच्या या उपराजधानीत अवघ्या नऊ महिन्यात दीड हजारावर लोकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याचा अर्थ दिवसाला सरासरी पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपूर शहरावर संपूर्ण देशाची नजर असते. त्या अनुषंगाने आता संपूर्ण देशाच्या गुन्हेगारीचा विचार होत असताना नागपूर शहराचीही आवर्जून दखल घेतली जात असते आणि अशा अध्ययनात नागपूरची तुलना आता मुंबई आणि कोलकाताशी व्हायला लागली आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी असल्याचे चित्र रंगवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री करीत असतात. त्यांचे म्हणणे बरोबर असले तरी वाढत्या गुन्ह्यांचे वास्तवही नजरअंदाज करता येणार नाही. त्याचप्रमाणे हा प्रश्न केवळ कायदा आणि व्यवस्थेवर सोपवूनही चालणार नाही. बदलती सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीही त्याला जबाबदार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस