शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:22 IST

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का?

मरण खरच एवढे स्वस्त झाले आहे काय? माणसाच्या संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या? नकारात्मक भावनांचा एवढा उद्रेक का? सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य एवढे बिघडलेच कसे, असे एक ना अनेक प्रश्न उपराजधानीतील नागरिकांना सतावत आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. अलीकडेच माहितीच्या अधिकारांतर्गत शहरातील गुन्हेगारीची जी आकडेवारी समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आणि समाजाची चिंता वाढविणारी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात ६४ खून झाले आहेत. या शृंखलेत गेल्या आठवड्यात झालेल्या प्राचार्य वानखेडे हत्याकांडाने तर केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे, सा-या पंचक्रोशीला हादरवून टाकले.

मृत प्राचार्यांच्या मुलीनेच आपल्या वडिलांची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून ही घटना आपले कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य किती बिघडत चालले आहे, याचे जळजळीत वास्तव मांडणारी आहे. खुनांची संख्या वाढली असतानाच लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. अत्यंत पाशवी, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनांचा विचार केला की एवढे प्रचंड क्रोैर्य, विकृती, अमानुषता आणि पराकोटीची असहिष्णुता कुठून येते तेच कळत नाही. अगदी क्षुल्लक कारणांवरुन लोक हिंसक होताना दिसतात. जगण्यात सहजता राहिलेली नाही. परस्पर अविश्वासाचे वातावरण आणि नकारात्मकतेने समाजजीवन ढवळून निघाले आहे.

गुन्ह्यांच्या या आकड्यांसोबतच आत्महत्येचे जे प्रमाण समोर आले आहे ते सुद्धा भयभीत करणारे आहे. राज्याच्या या उपराजधानीत अवघ्या नऊ महिन्यात दीड हजारावर लोकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याचा अर्थ दिवसाला सरासरी पाच जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने नागपूर शहरावर संपूर्ण देशाची नजर असते. त्या अनुषंगाने आता संपूर्ण देशाच्या गुन्हेगारीचा विचार होत असताना नागपूर शहराचीही आवर्जून दखल घेतली जात असते आणि अशा अध्ययनात नागपूरची तुलना आता मुंबई आणि कोलकाताशी व्हायला लागली आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी असल्याचे चित्र रंगवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री करीत असतात. त्यांचे म्हणणे बरोबर असले तरी वाढत्या गुन्ह्यांचे वास्तवही नजरअंदाज करता येणार नाही. त्याचप्रमाणे हा प्रश्न केवळ कायदा आणि व्यवस्थेवर सोपवूनही चालणार नाही. बदलती सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीही त्याला जबाबदार आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस