शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

मराठीसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:24 AM

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे.

महापालिकेच्या मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या ४० हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या संस्थेने उघडकीस आणली आहे. ही मराठीसाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे मराठी साहित्य संमेलनाचा झेंडा अटकेपार रोवला जातो. दिवाळी अंक काढून मराठीचा उदोउदो केला जातो. दुसरीकडे मात्र मुंबईसारख्या शहरात मराठीची केविलवाणी अवस्था होत आहे. हे चित्र राज्याच्या दृष्टीने भयावह आहे. मराठी टिकावी, तिचे संवर्धन व्हावे, अशी ओरड नेहमीच राजकारणी, साहित्यिक करत असतात. प्रत्यक्षात मराठी टिकविण्यासाठी व रुजविण्यासाठी काहीच प्रयत्न होत नसल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट होते. मोबाइल, इंटरनेटमुळे संपूर्ण जग प्रत्येकाच्या हातात आले आहे. हे जग बघायचे असल्यास तुम्हाला इंग्रजी अनिवार्यच आहे. काही बोलीभाषेतील इंग्रजी शब्द तर सहज लक्षात येतात. त्यामुळे मराठीचा विसर थोड्याफार प्रमाणात अशिक्षित माणसालाही होतो. मराठीचा झेंडा हाती घेऊन काही जण राजकारणात मोठेही झाले. मात्र, मराठीचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मराठी टिकवायची असेल तर त्यासाठी लागणारे शिक्षक, त्यांचे प्रशिक्षण व अन्य आवश्यक गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पालाही मागे टाकेल एवढ्या मोठ्या रकमेची वर्षाला उलाढाल करणाºया मुंबई महापालिकेला मराठी टिकविण्यासाठी काही ठोस करावेसे न वाटणे, ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणारी शिवसेना व विरोधी बाकावर बसणाºया अन्य पक्षांनाही मराठीबाबत आस्था नाही. महत्त्वाचे म्हणजे मराठी शाळेचा दर्जा घसरला आहे, तेथे सुविधांचा अभाव आहे, असे मत मुंबईत राहणाºया बहुतांश मराठी जनांनी नोंदविले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार वर्षांत मराठी विद्यार्थ्यांची गळती सुरू झाली. तरीही मराठी टक्क्यावर निवडून येणाºया नगरसेवकांपैकी एक टक्का नगरसेवकांनी याबाबत दीर्घ चर्चा घडवून आणली नाही किंवा याविषयी आक्र मक झाले नाहीत, ही मराठीसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तरीही ‘प्रजा’च्या अहवालानुसार इंग्रजी व सेमीइंग्रजी वर्गाचे विद्यार्थी चार वर्षांत लक्षणीय वाढले आहेत ही एका अर्थाने जमेची बाजू आहे. इंग्रजीच्या आक्रमणात मराठी टिकविण्यासाठीही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मराठीचा वापर केवळ साहित्य संमेलनात किंवा राजकारण करण्यासाठी होऊ नये; अन्यथा २0२१पर्यंत महापालिकेच्या शाळांतून मराठी नष्ट होईल, ही प्रजा फाउंडेशनची भविष्यवाणी खरी ठरेल. ही भविष्यवाणी खरी ठरू नये, यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करायला हवा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळा