शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

फाटाफूट करणाऱ्यांना दलित समाजानेच दूर लोटाव

By admin | Updated: April 14, 2016 03:14 IST

बाबासाहेबांच्या आशीर्वादाने दलित समाजाने शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. जिथे अन्याय होत असेल, तिथे दलित तरुण संघर्षासाठी पेटूनही उठत आहेत, परंतु ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’

- रामदास आठवलेबाबासाहेबांच्या आशीर्वादाने दलित समाजाने शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. जिथे अन्याय होत असेल, तिथे दलित तरुण संघर्षासाठी पेटूनही उठत आहेत, परंतु ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार आमच्यातील सर्व गटांना संघटित होणे मात्र, अनेक प्रयत्न करूनही जमलेले नाही. आता रिपब्लिकन ऐक्यासाठी केवळ नेत्यांवर अवलंबून न राहाता, कार्यकर्त्यांनी आणि दलित समाजानेच पुढाकार घ्यावा. ऐक्यापासून दूर जाऊन फाटाफूट करणाऱ्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी भूमिका घेऊन समाजापासून दूर लोटावे. मग रामदास आठवलेंनी जरी ऐक्यविरोधी भूमिका घेतली, तरी त्यालाही वेगळा न्याय नको.मी अनेकदा ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे. सन १९७४, १९८९, १९९५, २००३ असे तब्बल चार वेळा रिपाइं ऐक्य झालेही, परंतु प्रत्येक वेळी ते अल्पजिवी ठरले. ऐक्य न होण्याची किंवा न टिकण्याची अनेक कारणे आहेत. त्यातही युती कुणाशी करायची, प्रमुख नेता कोण होणार, हीच फाटाफुटीची मुख्य कारणे होती. फाटाफूट टाळून, टिकावू ऐक्य साधण्याची शक्ती केवळ जनरेट्यातच आहे. प्रकाश आंबेडकर सक्षम नेते आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा ऐक्याची मशाल पेटणार असेल, तर मी दुय्यम भूमिका घ्यायला तयार आहे.एवढेच नव्हे, तर मी भाजपाशी सध्या असलेली युती तोडूनही बाहेर पडेन.उत्तर प्रदेशात मायावती सत्तेची शिडी चढू शकल्या, कारण तेथे दलितांचा टक्का अधिक आहे, तसेच त्यांनी ओबीसी आणि ११ टक्के असलेल्या ब्राह्मणांनाही सोबत घेतले. त्यामुळे बहुजन समाज पक्षात अनेक गटतट असूनही सर्वांची मोट बांधून मायावती यशस्वी झाल्या. मात्र, रिपाइंचे सर्व गट एकत्र आले, तरीही महाराष्ट्रातील मतांची गणिते पाहाता, केवळ दलित मतांच्या आधारे सत्तेपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे बहुजन आणि अन्य सर्व जातींनाही सोबत घेणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचा विरोध ब्राह्मणांना नव्हे, तर ब्राह्मणत्वाला होता. त्यामुळे कोणत्याही जातीला विरोध करण्यापेक्षा आम्ही जातीपाती संपविण्याचे काम करत आहोत. त्यासाठीच ‘जाती तोडो, समाज जोडो’ अभियानसुद्धा राबविण्यात येत आहेत. गेल्या निवडणुकीपासून आमच्या पक्षाने ५० टक्के तिकिटे दलितेतरांना देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. भाजपाने इंदुमिलचा विषय मार्गी लावला, लंडनमधील बाबासाहेबांचे घर विकत घेतले, आरक्षणावर गदा येऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदी ठासून सांगत आहेत. आता ‘झोपडपट्टी संरक्षण विधेयक’ आणून २०१४ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यात यावे, गावातील जमिनीचे सर्वेक्षण करून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५-५ एकर जमिनीचे वाटप करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.दलितांची परिस्थिती सुधारत आहे. दलित तरुणांनी आता केवळ नोकऱ्यांवर अवलंबून न राहाता, उद्योगांमध्येही आघाडी घ्यावी. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आम्ही दलितांचे १२५ नवे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करीत आहोत. े