शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे हा आर्थिक दहशतवादच, सायबर सुरक्षेत भारत पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:30 IST

इंटरनेट वापरात दुसरा क्रमांक; पण सायबर सुरक्षेत भारत पिछाडीवर

विजय दर्डा

सुमारे १३ लाख भारतीयांच्या डेबिट व क्रेडिट कार्डांचा तपशील ‘डार्क वेब’वर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बातमी मोठी विचित्र आहे. सायबर गुन्हेगारच काळ्या बाजारातून ही माहिती खरेदी करतील व त्याचा वापर फसवणूक व सायबर दरोड्यांसाठी करतील, हे उघड आहे. हे असे होण्याची ही काही पहिली वेळ नाही. भारतामधील सुमारे ३२ लाख डेबिट/क्रेडिट कार्ड सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याची बातमी गेल्याच वर्षी आली होती. यातून या कार्डधारकांचे नेमके किती नुकसान झाले, याची नक्की माहिती समोर आली नाही, पण ‘नॉर्टन सायबर सेक्युरिटी इनसाइट’च्या अहवालात वर्ष २०१७ मध्ये भारतीयांची सायबर गुन्ह्यांमध्ये १८.५ अब्ज डॉलरची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

हा अहवाल असे सांगतो की, भारतात इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक पाचपैकी दोन व्यक्ती कोणत्या तरी स्वरूपाच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडत असतात. नुकसान होऊन गेल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे कळते. अशा नुकसानीची भारतात बहुधा कधीच भरपाई होत नाही. याची दोन कारणे आहेत. एक, आपल्याकडे सायबर गुन्हेगारी रोखण्याची सक्षम व्यवस्था नाही. तपासही तत्परतेने केला जात नाही. दुसरे म्हणजे, आपल्याकडे विम्याविषयी फारच कमी जागरूकता आहे. काही मोजक्याच विमा कंपन्या अशा प्रकारचा विमा उपलब्ध करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतात सायबर विम्याचा व्यवहार अमेरिकेच्या तुलनेत फक्त १.६ टक्के एवढा कमी आहे. अशा सायबर सुरक्षा विम्याच्या पॉलिसी बव्हंशी कंपन्या व मोठ्या संस्थांकडून घेतल्या जातात. व्यक्तिगत पातळीवर असा विमा उतरविणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. अशा विमा पॉलिसी मुख्यत: वसुली, फिशिंग आणि अनधिकृत आॅनलाइन व्यवहारांनी होणाºया नुकसानीच्या भरपाईसाठी असतात. अमेरिका व युरोपमधील विकसित देशांत सायबर सुरक्षेची स्थिती खूपच चांगली असल्याचे दिसते. माझा सुपुत्र देवेंद्र अमेरिकेत शिक्षण झाल्यावर तेथे नोकरी करत होता, तेव्हा एकदा त्याच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी सर्व रक्कम लंपास केली होती. बँकेकडे तक्रार केल्यावर अगदी जलदगतीने तपास झाला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण चोरट्यांनी लाटलेली सर्व रक्कम आठ दिवसांत पुन्हा देवेंद्रच्या बँक खात्यात जमा झाली होती, पण आपल्याकडे अजूनही असे शक्य होताना दिसत नाही. भारतीय रिझर्व्ह बँक माध्यमांमध्ये वेळोवेळी संदेश प्रसारित करून सावध करत असते, पण जागरूकतेअभावी लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडतातच.

तुमच्या प्रॉव्हिडंट फंडात ८० हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे, असा ‘एसएमएस’ अलीकडेच अनेक लोकांना आला. यादीत नाव आहे का, ते तपासा, असे त्या संदेशात सांगितले गेले. त्यात दिलेली साइट लोकांनी उघडली, तेव्हा त्यांच्याकडे त्यांचा पॅन कार्ड नंबर मागण्यात आला. ज्यांनी सावधानता बाळगली नसेल, ते यात नक्की फसले असणार. विविध बँकांच्या नावाने फिशिंग मेसेजेस व फोन तर सारखे येत असतात आणि बरेच जण त्यातून हातोहात फसविले जातात! खरे तर जग जेवढ्या वेगाने डिजिटल होत आहे, तेवढ्याच वेगाने सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढत आहे. तुमची अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिगत माहिती बेमालूमपणे चोरली जाते. अशा चोरलेल्या माहितीचा कुठे, केव्हा व कसा दुरुपयोग केला जाईल, याचा अंदाज करणेही कठीण आहे. हल्ली पैसे देण्या-घेण्याचे व्यवहार करण्यासाठी बरीच अ‍ॅप्स वापरली जातात. त्यामुळे आपले बँक खाते सायबर हल्ल्याला बळी पडण्याचा धोका कायम असतो. याच सप्टेंबरमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास व सायबर फॉरेन्सिक तंत्र या विषयावर दिल्लीत ‘सीबीआय’च्या मुख्यालयात पहिले राष्ट्रीय संमेलन आयोजित केले गेले होते. यातून भारत सायबर गुन्हेगारांचा पायबंद करण्याची ठोस व्यवस्था लवकरच उभी करू शकेल, अशी अपेक्षा ठेवू या. इंटरनेट वापरणाºयात दुसºया क्रमांकावर असल्याने भारताने सायबर गुन्ह्यांबाबत विशेष दक्ष राहण्याची गरज आहे.

एका इस्रायली कंपनीने तयार केलेले ‘स्पायवेअर’ भारतातील राजकीय नेते, व्यावसायिक, मीडिया हाऊस, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्ते अशा अनेकांची हेरगिरी करण्यासाठी व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून वापरले गेल्याची ताजी बातमीही तेवढीच चिंताजनक आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचाही फोन असाच हॅक केला गेल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही अशाच हेरगिरीचे शिकार झाले आहेत. साहजिकच ही हेरगिरी कोणी व कोणासाठी केली, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर मिळायलाच हवे. अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत की, अनेक शंकाकुशंका उत्पन्न होतात. सरकारने या सायबर गुन्हेगारांच्या कठोरतेने मुसक्या आवळायला हव्यात, जेणेकरून कोणाही भारतीयाच्या मनात त्याची व्यक्तिगत माहिती सायबर चोरांच्या हाती लागण्याची भीती राहणार नाही. लोकांनी याविरुद्ध आवाज उठवून सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी.लेखक लोकमत वृत्त समुह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbusinessव्यवसायBanking Sectorबँकिंग क्षेत्र