शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
5
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
6
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
7
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
8
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
9
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
11
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
12
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
13
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
14
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
15
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
16
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
17
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
18
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
19
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
20
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

इतिहासातील वैराचे वर्तमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:27 IST

१ जानेवारी १८१८ या दिवशी इंग्रज फौजांनी मराठ्यांचा भीमा-कोरेगाव परिसरात झालेल्या युद्धात पराभव करून पेशवाईचा पाडाव केला. यावेळच्या इंग्रज फौजांत महार रेजिमेंटचे ३००० सैनिक सामील होते. त्यामुळे पुढील काळात त्या लढाईला दलित विरुद्ध ब्राह्मण असा रंग आला. ज्या जागेवर हे युद्ध इंग्रजांनी जिंकले तेथे त्याच्या विजयाचे स्मारकही उभारले गेले. त्याला भेट देणा-या दलितांची संख्या नंतरच्या काळात वाढती राहिली.

१ जानेवारी १८१८ या दिवशी इंग्रज फौजांनी मराठ्यांचा भीमा-कोरेगाव परिसरात झालेल्या युद्धात पराभव करून पेशवाईचा पाडाव केला. यावेळच्या इंग्रज फौजांत महार रेजिमेंटचे ३००० सैनिक सामील होते. त्यामुळे पुढील काळात त्या लढाईला दलित विरुद्ध ब्राह्मण असा रंग आला. ज्या जागेवर हे युद्ध इंग्रजांनी जिंकले तेथे त्याच्या विजयाचे स्मारकही उभारले गेले. त्याला भेट देणा-या दलितांची संख्या नंतरच्या काळात वाढती राहिली. १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरही त्या स्मारकाला भेट देऊन गेले. यावर्षी तेथे जमलेला जमाव कित्येक लाखांचा होता. त्यात जिग्नेश मेवाणी, मौलाना अजहर आणि उमर खलिद हे अन्य पुढारीही हजर होते. तेथील जमावात असलेली पेशवाईविरोधी (प्रत्यक्षात ब्राह्मणविरोधी) लाट मोठी होती. तिच्या उसळीने पेट घेतलेल्या दंगलीने तो सारा परिसरच वेढला गेला. गाड्या जाळल्या गेल्या, बसेसची मोडतोड झाली आणि बराच काळ वाहतूकही थांबली होती. सरकारची व्यवस्था अर्थातच अपुरी होती. या प्रकाराचे पडसाद मुंबई व औरंगाबादेत उठून तेथेही काही प्रमाणात बंद पाळला गेला. महाराष्टÑातही अनेक जागी त्याचे पडसाद उमटले. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी ज्या नेत्यांवर आरोप केले ते संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे या सवर्ण नेत्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र अशा घटनांचे लोण फार लवकर वणव्यासारखे पसरते तसे ते पसरताना दिसले आहे. प्रकाश आंबेडकरांनी बुधवारी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. दुपारनंतर ती त्यांनी मागे घेतली. यातील साºयात दुर्दैवी म्हणावा असा भाग हा की हे भांडण वर्तमानातले नाही. २०० वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका घटनेचा आधार घेऊन ते पेटविण्याचा हा प्रयत्न आहे. पेशवाईने दलितांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आता जुन्या झाल्या. त्यातून त्या लढाईत लढलेले महार रेजिमेंटचे सैनिक इंग्रज सत्तेच्या बाजूने लढत होते. या साºया बाबी आताच्या हिंसाचाराची वर्तमान निरर्थकता दाखविणाºया आणि आपण अजूनही आपल्या इतिहासाकडे पाठ फिरविली नसल्याचे सांगणाºया आहेत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमांचा अभिमान बाळगणे व त्यांची पूजा बांधणे हा समाजाचा हक्क आहे. मात्र त्या पराक्रमाभोवतीचे संदर्भ समजावून घेणे आणि त्यांचा आजच्या बदलत्या काळाशी संबंध जुळवून पाहणे हे अधिक समंजसपणाचे आहे. समाजाचे इतिहास हे स्नेहाएवढेच वैरांनी भरले आहेत. त्यात युद्धे आहेत, हाणामाºया आहेत, वैरे आहेत आणि अत्यंत खासगी म्हणावी अशी भांडणेही आहेत. ती आता उकरून काढून त्यावर वर्तमानात हाणामाºया करणे व इतिहासातले वैर पुन: जागवणे यात हंशील नाही. दुर्दैैवाने सध्याचे केंद्र सरकार सामाजिक ऐक्याहून त्यातील दुहीवर भर देणारे आहे. ते जेवढे अल्पसंख्यविरोधी तेवढेच दलितविरोधीही आहे. अल्पसंख्य समाजावर जास्तीत जास्त निर्बंध लादणे आणि दलितांचे आक्रोश दाबून टाकणे यावर त्याचा नको तसा भर आहे. ते योगी आदित्यनाथ तर दरदिवशी अशी कारणे शोधण्यात व त्यात आपली दांडगाई चालविण्यात वाक्बगार आहे. त्यांच्या संघपरिवारातील एक वास्तव अद्याप समजलेले नाही. ते हे की भाजपा व संघ या संघटना ज्या गोष्टी करतात त्यांचा बरा वाईट परिणाम हिंदू-मुस्लीम व सवर्णांवर (आणि विशेषत: त्यातील ब्राह्मण वर्गावर होतो.) पुढारी दूर राहतात. सामान्य माणसे भरडली जातात. या संघटनांनीही आपल्या सरकारांना त्यांच्या विषारी कारवाया करण्यापासून रोखणे आता आवश्यक आहे. आज दलितविरोधात, उद्या अल्पसंख्यकांविरोधात, परवा ओबीसीविरोधात असे होत राहिले तर सारा समाज शकलांमध्ये विभागला जाईल आणि मग त्यात जे ‘अल्पसंख्य’ उरतील ते काय करतील आणि त्यांचे काय होईल? समाजाच्या संतापापुढे लष्करेही हतबल होतात हा अनुभव या संघटनांनी अशावेळी लक्षात घ्यायचा की नाही. याचवेळी समाजातील दलित व अल्पसंख्यकांच्या वर्गांनीही त्यांची इतिहासातील भांडणे व वैरे वर्तमानात आणण्याच्या प्रयत्नांना आवर घालावा हे त्यांनाही सांगितलेच पाहिजे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtraमहाराष्ट्र