शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राजकारणातील गुन्हेगारी अन् नवी मुंबई! गुंडांचा बंदोबस्त करण्यात यश येईल?

By नारायण जाधव | Updated: August 21, 2023 10:52 IST

एका वक्तव्यानंतर नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत

नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

नवी मुंबई शहरात ३० टक्के राजकारणी गुंड प्रवृत्तीचे असून व्हाइट कॉलर म्हणून वावरणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन माजी मंत्री आणि ऐरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक अर्थात नवी मुंबईकरांचे लाडके दादा यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबेसह बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकुरांसह उरणचे महेश बालदी यांच्या साक्षीने केले. त्यांच्या वक्तव्यानंतर नवी मुंबईतील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दादांच्या या आवाहनाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. काहींना मिरच्या झोंबल्याने ते नाके मुरडत आहेत.

गणेशदादांनी पहिल्यांच असे वादळी वक्तव्य केलेले नाही. यापूर्वी त्यांनी हातभट्टीचे बळी टाळण्यासाठी देशीचे परवाने द्या, राज्यावरील कर्ज फेडण्यासाठी मुंबईतील मोकळ्या जागा, महालक्ष्मी रेसकोर्स विकण्यासह समुद्रात कृत्रिम बेट बांधा, अशा सूचना केल्या होत्या. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र, आज मुंबईतील मोकळ्या जागा झोपडपट्टीदादा, भूमाफियांनी घशात घातल्या आहेत. समुद्रात, खाडीत भराव टाकून झोपड्यांसह सी लिंक, कोस्टल रोड, बंदरे बांधली जात आहेत. हे चोरीचोरी, चुपकेचुपके समुद्रातील भराव टाकून बेट बांधून विकण्याचाच प्रकार आहे.

आताही त्यांनी नवी मुंबईतील ३० टक्के राजकारणी गुंड असल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता आर्थिक राजधानी मुंबई लगतचे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरात एकेकाळी गुंडांचा बोलबाला होता. दादागिरी करणारे यातील अनेक जण पुढे आमदार, मंत्री झाले. कधीकाळी मुंबईत अरुण गवळी, ठाण्यात पिंट्या दादा, भिवंडीत जयंत सूर्यराव, उल्हासनगरला पप्पू कलानी, वसईला भाई ठाकूर यांचे साम्राज्य होते.

नवी मुंबईतही त्यांचे अनुयायी आहेत. किंबहुना एमआयडीसी, सिडको, जेएनपीटी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यावर भौतिक सुब्बत्तेबरोबरच गुंडांची संख्या कैक पटीने वाढली. यातूनच शहरात सोमनाथ म्हात्रे, बबन पाटील, पप्पू सावंत, मीना मोरे, आनंद काळे, सुनील चौगुले अशा अनेक राजकीय हत्या, एपीएमसीचे सदस्य सचिव अण्णाराव तांभाळेंसारख्या अधिकाऱ्याच्या हत्येसह ऐरोलीत भंगारमाफियांनी पोलिसांचा बळी घेतला आहे. यात कथित माथाडी नेत्यांसह नवी मुंबईतील काही राजकीय नेत्यांकडे त्यावेळी संशयाची सुई वळली होती. अशाच गुन्हेगारांमधील काही जण आजही नवी मुंबईत दादा, भाई, अण्णा, नाना म्हणून वावरत आहेत. हेच लोक फेरीवाले, एमआयडीसीत वसुलीचे रॅकेट चालवत आहेत. यात मुक्तार अन्सारीला कधीकाळी दादांनीच अभय दिले होते.

...तरच गुंडांचा बंदोबस्त

  • नवी मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत एडीआरच्या रिपोर्टनुसार अर्ज भरलेल्या राष्ट्रवादीच्या १०१ पैकी १७, काँग्रेसच्या ८५ पैकी सात, शिवसेनेच्या ६१ पैकी ११ आणि भाजपचे ४२ पैकी पाच उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते.
  • आश्चर्याची बाब म्हणजे कुणाचा का दबाव असेना, दादांनीच राष्ट्रवादीच्या तिकीट वाटपात त्यांना तेव्हा प्राधान्य दिले होते. यावेळी अख्खी राष्ट्रवादीच भाजपवासी झालेली आहे.
  • भाजपमध्ये तर गुंड, आरोप असलेल्यांना पवित्र करून घेतले जात आहे. यामुळे नवी मुंबईतील ३० टक्के गुंडांचा बंदोबस्त करायचा असेल तर पक्षाच्या या धोरणाला फाटा देऊन गेल्या वेळी तिकीट दिलेल्यांच्या पेकाटात या खेपेला लाथ मारण्याची हिंमत दादांना दाखवावी लागेल. तरच पोलिस आयुक्त भारंबे हे राजकारणातील ३० टक्के गुंडांचा बंदोबस्त करू शकतील.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीGanesh Naikगणेश नाईक