शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

'त्या' वृद्धेच्या हत्येसाठी दोषी कुणाला धरायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 16:44 IST

गुन्हा कोणताही असो, त्यामागे स्वार्थ वृत्ती दडलेली असते. कोणाला शरीराची लालसा असते, कोणाला मालमत्तेची, तर कोणाला पैसा आणि दागिन्यांची. मोह आवरत नाही आणि मग तो कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही. 

विनायक पात्रुडकर

गुन्हा कोणताही असो, त्यामागे स्वार्थी वृत्ती दडलेली असते. कोणाला शरीराची लालसा असते, कोणाला मालमत्तेची, तर कोणाला पैसा आणि दागिन्यांची. मोह आवरत नाही आणि मग तो कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही. लहान मुलं, अंथरूणाला खिळलेले शरीर, अशा कोणत्याही अवस्थेतील व्यक्तीचा बळी स्वार्थासाठी जातो. सतत जागी असलेली मुंबईसारखी शहरेदेखील अशा घटनांसाठी अपवाद राहिलेली नाहीत. या मायानगरीत कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने ७० वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केला. ही महिला एकटी राहत होती. तिच्याकडे खूप दागिने होते. आरोपी जोडप्याचे या महिलेकडे रोजचे जाणे-येणे होते. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्या महिलेचे दागिने चोरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महिलेने त्याला विरोध केला. अखेर त्या दोघांनी महिलेचा खून केला. 

मुंबईपोलिसांची ख्याती जगभरात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना पोलिसांनी तयार केल्या आहेत. गेली दोन वर्षे या उपाय योजनांची घोषणा दणक्यात केली जाते. घरात एकट्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी पोलीस जाईल, त्यांची चौकशी करेल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे. असे असताना ७० वर्षीय महिलेच्या हत्येसाठी नेमके दोषी कोणाला धरावे. हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे की सर्वसामान्य नागरिकांचा निष्काळजीपणा. २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा अधिक अद्ययावत झाली. नवनवीन तंत्रज्ञान पोलीस ताफ्यात दाखल झाले. नाक्या नाक्यावर सीसीटीव्ही लागले. तरीही घरात एकट्या असलेल्या महिलेचा जीव जाणे हे पोलिसांना शोभनीय नाही. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही जबाबदारीने वागायला हवे. वयोवृद्ध महिला घरात एकटी राहते. तिच्याजवळ दागिने कशासाठी होते. बँकेत दागिने ठेवण्याची व्यवस्था असते. वेळेला आपण ते बँकेतून काढूही शकतो. मग घरात दागिने का ठेवावेत, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येणार नाही. जीवघेण्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतात, त्यासाठी नागरिकांचीही मदत आवश्यक असते. ज्येष्ठ नागरिक लहान मुलांप्रमाणे असतात. त्यांना काय द्यावे, काय देऊ नये, त्यांच्याजवळ काय असायला हवे किंवा त्यांना एकटे सोडू नये, अशी काळजी घ्यावी लागते. यात कसूर केल्यास अनुचित प्रकार घडतो. तेव्हा भविष्यात पैशासाठी ज्येष्ठ नागरिकाचा बळी जाऊ नये, यासाठी सर्वांनीच सर्तक राहायला हवे. कुटुंब, शेजारी, अशा प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सतर्क राहायला हवे. तरच अशा घटना टाळात येतील. अन्यथा मुली व महिलांसाठी असुरक्षित असल्याचा ठपका मुंबईला लागलाच आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचीही भर पडेल.

टॅग्स :MumbaiमुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी