शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : बंद दरवाजाआड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 06:09 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो, हे नव्या पिढीला समजले गेले.

माणूस भटकण्याच्या अवस्थेतून बाहेर पडला, त्याला हजारो वर्षे झाली. वस्ती करून राहू लागला. निवासाची सोय करून एकत्र राहू लागला. अधिक विकासासाठी आणि आनंदी जीवनासाठी तो बाहेर पडत असला तरी सायंकाळ होताच बंद दरवाजाच्या आड येऊन विश्रांती घ्यायची, हा त्याचा नित्यक्रम होता. मात्र, त्याची अधिक सुखी, समाधानी जीवनासाठीची गती इतकी वाढली की, तो चोवीस तास पुन्हा-पुन्हा भटकंती करू लागला. आठ-आठ तासांच्या पाळीत चोवीस तास काम करू लागला. वाहतुकीची अनेक साधने चोवीस तास चालू ठेवू लागला. आनंदात अखंड विहार करण्यासाठी त्याने ‘नाईट लाईफ’ची कल्पनाही मांडली आणि त्याचा उपभोग तो घेऊ लागला. उत्पादन, निर्मिती, व्यवहार आणि पैशांचा खेळ अहोरात्र करत राहिला. त्याची त्याला सवयच जडली. सर्वकाही अंगवळणी पडले. ऐशारामी समाजरचनेत समूहाने राहू लागला.

या सर्वांपासून उपेक्षित असणाराही मोठा वर्ग दोनवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बंद दरवाजे उघडून दुनियादारी करू लागला. तोच माणूस आज त्या दरवाजाच्या दिशेने मिळेल त्या मार्गाने मागे धावतो आहे. गेली चौपन्न दिवस संपूर्ण देश बंद दरवाजाच्या आड आहे. तो आणखीन तेरा दिवस ३१ मेपर्यंत दरवाजा बंदच ठेवण्यात येणार आहे. आपल्या देशात जवळपास एक लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आली आहे, त्यापैकी ३६ हजारजण बरे झाले असले तरी तीन हजारजणांना प्राणाला मुकावे लागले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग तरी कमी होत नाही. विशेषत: मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा धोका वाढतो आहे. परिणामी, या महानगरीतील गावाकडील माणूस ‘आपला गावच बरा’ म्हणून परत जातो आहे. कोट्यवधी स्थलांतरित मजूरवर्ग आपापल्या गावी जाऊन दरवाजाआड लपण्याचा प्रयत्न करतो आहे.

२४ मार्चला अचानक एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही, असा निर्बंध घालण्यात आला. आधुनिक जगात हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे होते. मात्र, उपायही नव्हता; तसेच तीनवेळा हा लॉकडाऊन वाढविण्यात आला. आता चौथ्यांदा वाढवून येत्या ३१ मेपर्यंत संपूर्ण देशातील दरवाजे बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या भागात कोरोनाचा प्रभाव किंवा लागण कमी आहे, तेथे थोडी सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तू मिळाव्यात म्हणून वाहतुकीत सूट दिली आहे. हे सर्व माणसाला तात्पुरते जगण्याला लागणाऱ्या वस्तूंसाठी आहे. तेवढ्यावर आता माणसाला जगता येत नाही. आर्थिक प्रश्नांची आणि व्यवस्थेची गुंतागुंत एवढी करून ठेवली आहे की, संपूर्ण समाजाचे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणावेच लागणार आहेत.

लॉकडाऊन करून, दरवाजे बंद करून आत बसलो तरी समाजात पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही. तो कोठे ना कोठे समाजात राहणार आहे. भारतात लॉकडाऊनचा परिणाम खूप सकारात्मक झाला. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी आहे. त्यापैकी मृत्यूंचे प्रमाण कमी आहे, असे मानले जाते. ते सिद्ध मात्र झालेले नाही. आपण संसर्गित किती लोक आहोत, याचा नेमका अंदाज येत नाही, हेदेखील मान्य करावे लागेल. बंद दरवाजाच्या आड याच्यासाठी राहूया की, जगलो तर जीवन आहे. मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांचे जीवन तेथेच संपले आहे. यातून एक धडा मात्र आपण शिकला पाहिजे की, संसर्गाच्या साथीने किंवा विषाणूने माणूस किती अडचणीत येऊ शकतो हे नव्या पिढीला समजले गेले.

प्लेग किंवा इतर महामारीने माणसाच्या समोर मृत्यू उभे राहण्याचे दिवस संपले होते. आपणास अलीकडे याची गंधवार्ताही नव्हती. ती आता कोरोनामुळे कानावर आली आहे. समाज समूहाने राहताना सार्वजनिक आरोग्यासाठी अद्याप किती काम करावे लागणार आहे. अन्न प्रत्येकास मिळावे; पण ते सुरक्षितही असावे आदी धडेपण शिकविण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा उगम कसा आणि कुठून झाला, याचा अद्याप शोध लागला नसला तरी अनेक गोष्टी शिकवून गेला आहे. यासाठी लॉकडाऊनमध्ये राहून सर्व मानवजातीच्या सुरक्षेचा विचार करण्याची ही एक संधी चालून आली आहे. अद्याप विषाणूचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी झालेलो नाही आहोत. त्यामुळे चौथा टप्पाही यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी थोडे कष्ट पडले, तरी ते स्वीकारावे लागतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या