शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus: कोरोना विषाणूबाबत होतेय रोज नवे आकलन, मिळतील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 06:35 IST

बोलण्या-गाण्यासारख्या क्रियेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे संसर्गाविषयीचे आकलन वाढून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मानवजातीला मिळतील.

विषाणूंचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिवर्तनीय असतात. भोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्या संरचनेत आणि संसर्गप्रसाराच्या पद्धतीत ते बदल करत असतात. कोरोनाचा विषाणू मानवजातीसमवेत नांदायला आल्यास आता किमान सात महिने होतील. मात्र, त्याची अनेक वैशिष्ट्ये अद्यापही अज्ञात आहेत. तज्ज्ञांच्या अनेक तर्कांना आजवर तो चकवा देत आला आहे. म्हणूनच जेव्हा २३९ वैज्ञानिकांनी त्याचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो, असे ठाम विधान सप्रमाण केल्याचे वृत्त आले तेव्हा आश्चर्य वाटले नाही. नवनव्या शक्यता गृहित धरून चालण्याशिवाय शास्त्रांना गत्यंतर नसते. जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणे आपलेच खरे असा दुराग्रह बाळगता येत नाही. केवळ शिंक आणि खोकल्याद्वारे नाका-तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्यातून कोरोना पसरतो, या विधानावर या संघटनेचे तज्ज्ञ आजवर ठाम होते. नव्या पुराव्यांची दखल त्यांना आता घ्यावी लागेल. या पुराव्यांमुळे बरीच गणिते उलटीपालटी होणार आहेत. काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरेही सापडतील.

संसर्गाचा ज्ञात इतिहास नसतानाही काही व्यक्तींना बाधा कशी झाली, असा प्रश्न कोविडचा मागोवा घेणा-या तज्ज्ञांना हल्ली वारंवार पडायचा. हे कोडे आता सुटले आहे. कोरोना विषाणू हवेत सोडण्यासाठी बाधित व्यक्तीने खोकण्या-शिंकण्याची आवश्यकता नाही. जोरजोरात बोलताना, श्वास घेताना आणि गातानाही बाधित व्यक्ती या विषाणूच्या प्रसारास हातभार लावू शकते. अशी कृती करताना त्या व्यक्तीच्या नाका-तोंडातून अतिसूक्ष्म असे थेंब बाहेर पडत असतात. या थेंबाच्या व्यासापेक्षा मानवी केसाचा व्यास पन्नास पटींनी मोठा असतो. यावरून ते थेंब किती सूक्ष्म असतील, याचा अंदाज करता येईल. बंदिस्त, पुरेसे वायूविजन नसलेल्या खोलीत हे वजनाने हलके असलेले थेंब बराच काळ हवेत विहरू शकतात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात. म्हणजे घरात बसून राहाणे, हा सुरक्षेचा हमखास उपाय आहे, असे यापुढे म्हणता येणार नाही. अनोळखी व्यक्तींच्या सोबतीने राहाणे धोक्याचे आहे, असा नवा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. कोविडचे विषाणू नेमके किती अंतर पार करू शकतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सर्वसाधारण आकाराच्या बंदिस्त खोलीत त्यांचा संचार सर्वत्र असू शकतो, असेही तज्ज्ञ सांगतात. घरातली हवा खेळती ठेवणे हा यावरला उपाय. अर्थात वरील निष्कर्ष पाश्चिमात्य देशांतील हवामानास गृहित धरून काढलेला आहे.भारतीय उपखंडातला मान्सून, आर्द्रता यामुळे हवेत विहरणाºया थेंबांचे आयुर्मान वाढेल की कमी होईल, यावर इथल्या वैज्ञानिकांना वेगळा अभ्यास करावा लागेल. मात्र, वैैयक्तिक सुरक्षेची अनिवार्यता या नव्या संशोधनानेही अधोरेखित केलेली आहे. दोन मीटरचे अंतर आपल्याला खोकल्या- शिंकांतल्या संसर्गापासून वाचवू शकेल; पण या सूक्ष्म थेंबांपासून तारू शकणार नाही, हे नवे आकलन नाका-तोंडावर मास्क घालण्याचे महत्त्व विषद करते. वरचेवर नाका-तोंडाला स्पर्श करण्याची सवय आता निर्धारपूर्वक सोडावी लागेल. २३९ वैज्ञानिकांच्या या नव्या संशोधनाने शाळा-विद्यालये सुरू करण्याच्या शक्यतेचाही पुनर्विचार करण्यास उद्युक्त केले आहे.

१२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांवर कोरोनाचा परिणाम अत्यंत नगण्य असतो, असे दिसून आल्याने मध्यंतरी काही पाश्चात्य तज्ज्ञांनी सातवीपर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. मात्र, अनेक विद्यालयांतील बंदिस्त खोल्यांचा लहान आकार आणि एकेका वर्गातली पटसंख्या यांचा विचार करता धोक्याची व्याप्ती वाढलेली आहे. वातानुकूलित यंत्रणेला कार्यक्षम फिल्टर्स बसविणे, हवा स्वच्छ करणारी संयत्रे बसविणे किंवा विषाणूंचे पारिपत्य करणाºया अतिनील किरणांना उत्सर्जित करणारे दिवे बसविणे, अशी उपाययोजना करणे आता रुग्णालयांनाही क्रम:प्राप्त झालेले आहे. कोरोनाचा विषाणू अजूनही मानवी प्रज्ञेला भारी ठरलेला आहे. जगभरातले संशोधन अद्यापही बचावात्मक पवित्रा सोडू शकलेले नाही. नव्या संशोधनाने सावधगिरी आणि सतर्कतेचा स्तर उंचाविण्याशिवाय पर्याय नसल्याचेच सूचित केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय