शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

coronavirus: झुंज कोरोनाशी अन् हिंसक शक्तींशीही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 04:48 IST

गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते.

- सविता देव हरकरे

(उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षा दलासोबत पाठशिवणीचा खेळ खेळणारा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ‘पोस्टर बॉय’ रियाज नायकूला अखेर भारतीय जवानांनी टिपलेच. तीन वर्षांपूर्वी या संघटनेचा कमांडर बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर रियाजने त्याची जागा घेतली होती. मुळात गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. त्याच्यासह आणखी ६४ दहशतवाद्यांचा खात्मा हे एक मोठे यश मानले जात असले, तरी गेल्या पंधरवड्यात दहशतवादविरोधी लढ्यात देशाला सात सपुतांना गमवावे लागले, हे विसरून चालणार नाही.सध्या केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत आहे. अशात जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तान व त्या देशाद्वारे प्रायोजित दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या कारवाया म्हणजे अमानवीय वर्तुणुकीचा कळस आहे. अर्थात, त्यांच्याकडून मानवीयतेची अपेक्षा करणेही व्यर्थच म्हणायचे. जम्मू-काश्मिरात कोरोनाचा शिरकाव यापूर्वीच झाला आहे. पाकिस्तानलाही या विषाणूने विळखा घातला आहे; पण या परिस्थितीतही देश सावरण्याऐवजी शेजारील राष्टÑांत कुरापती करण्यातच त्यांना भूषण वाटावे, यापेक्षा लांच्छनास्पद दुसरे काय असू शकते? म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. एप्रिल-मे महिना घुसखोरीसाठी सोयीचा असतो. हीच संधी साधण्याचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलही सतर्क असते. ३०० दहशतवादी नियंत्रण रेषेवर व्याप्त काश्मिरात घुसखोरीसाठी तयार असल्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर खोºयात गेल्या एक मेपासून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.इकडे छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले; पण त्यांचीही शहादत कोरोनाच्या विळख्यामुळे विस्मरणात गेली. आपल्या देशात ही समस्या दुहेरी आहे. कारण आपल्या येथे जसजसे ऊन तापू लागते तसतसे दहशतवाद्यांच्या घुसखोरीसोबतच नक्षलीही डोके वर काढत असतात. या काळात ते अधिक आक्रमक होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे घडत आलेय. सुकमातील घटना ही त्याचीच चाहूल आहे. लॉकडाऊनच्या आड नक्षली मोठ्या प्रमाणात जमवाजमव करीत आहेत आणि बस्तर भागातच आणखी मोठे हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. नक्षलविरोधी मोहिमेवर लक्ष ठेवणाºया एका ज्येष्ठ अधिकाºयाने हा खुलासा केला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह नेपाळमधूनही नक्षलवादी एकत्र आले असून, त्यांच्या बैठका सुरू असल्याचेही या अधिकाºयाचे म्हणणे आहे.राज्यातील सर्वाधिक नक्षलग्रस्त समजल्या जाणाºया गडचिरोली जिल्ह्यातही अलीकडेच नक्षल्यांनी धुमाकूळ घातला होता. दुसरीकडे ओडिशात मात्र त्यांनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे; पण ती कितपत पाळली जाईल सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी झाला आहे. बहुदा त्यामुळेच ही चळवळ थंडावली, असा समज शासनाने करून घेतला असावा; पण तो किती चुकीचा आहे याचा प्रत्यय या हल्ल्याने आणून दिलाय. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते; पण हा विचार अथवा चळवळीचे समूळ उच्चाटन अशक्य नसले तरी वाटते तेवढे सोपेहीे नाही. देशाच्या सीमेवर आणि आतही आणखी किती वर्षे जवानांचे हे मरणसत्र सुरू राहणार, हा प्रश्न आहे. अशा घटनांनी मनाचा संताप होतो, तसेच दहशतवाद आणि नक्षलवादाच्या या किडीवर कायमस्वरूपी काहीच उपाय होऊ शकत नाही याची अगतिकताही असते.गेल्या अनेक दशकांपासून केंद्र व राज्य सरकारांतर्फे नक्षल्यांच्या बीमोडाकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या. मोहिमा आखण्यात आल्या. त्यामुळे ही चळवळ खिळखिळी करण्यास नक्कीच हातभार लागला आहे, याबद्दल कुणाचे दुमत नाही; पण हे प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत. नक्षलवादाचा जन्म हा मुळात शोषणातून झाला आहे. त्यामुळे अशा नक्षलग्रस्त भागात सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्या लागणार आहेत. गडचिरोलीत मागील दोन-तीन वर्षांत स्थानिक लोकच नक्षल्यांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हा एक आशेचा किरण आहे. सरकार आणि सुरक्षा दलांच्या कुठल्याही मोहिमेपेक्षा जनक्षोभाचे अस्त्र रामबाण ठरणार हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त लोक विकासगंगेत कसे सहभागी होतील हे बघावे लागेल. नक्षली नव्हे, तर हा समाज, सरकार आपला सच्चा मित्र आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजवावी लागेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत