शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: झुंज कोरोनाशी अन् हिंसक शक्तींशीही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 04:48 IST

गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते.

- सविता देव हरकरे

(उप वृत्तसंपादक, लोकमत, नागपूर)गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षा दलासोबत पाठशिवणीचा खेळ खेळणारा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ‘पोस्टर बॉय’ रियाज नायकूला अखेर भारतीय जवानांनी टिपलेच. तीन वर्षांपूर्वी या संघटनेचा कमांडर बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर रियाजने त्याची जागा घेतली होती. मुळात गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. त्याच्यासह आणखी ६४ दहशतवाद्यांचा खात्मा हे एक मोठे यश मानले जात असले, तरी गेल्या पंधरवड्यात दहशतवादविरोधी लढ्यात देशाला सात सपुतांना गमवावे लागले, हे विसरून चालणार नाही.सध्या केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंजत आहे. अशात जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तान व त्या देशाद्वारे प्रायोजित दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या कारवाया म्हणजे अमानवीय वर्तुणुकीचा कळस आहे. अर्थात, त्यांच्याकडून मानवीयतेची अपेक्षा करणेही व्यर्थच म्हणायचे. जम्मू-काश्मिरात कोरोनाचा शिरकाव यापूर्वीच झाला आहे. पाकिस्तानलाही या विषाणूने विळखा घातला आहे; पण या परिस्थितीतही देश सावरण्याऐवजी शेजारील राष्टÑांत कुरापती करण्यातच त्यांना भूषण वाटावे, यापेक्षा लांच्छनास्पद दुसरे काय असू शकते? म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. एप्रिल-मे महिना घुसखोरीसाठी सोयीचा असतो. हीच संधी साधण्याचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलही सतर्क असते. ३०० दहशतवादी नियंत्रण रेषेवर व्याप्त काश्मिरात घुसखोरीसाठी तयार असल्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर खोºयात गेल्या एक मेपासून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.इकडे छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले; पण त्यांचीही शहादत कोरोनाच्या विळख्यामुळे विस्मरणात गेली. आपल्या देशात ही समस्या दुहेरी आहे. कारण आपल्या येथे जसजसे ऊन तापू लागते तसतसे दहशतवाद्यांच्या घुसखोरीसोबतच नक्षलीही डोके वर काढत असतात. या काळात ते अधिक आक्रमक होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे घडत आलेय. सुकमातील घटना ही त्याचीच चाहूल आहे. लॉकडाऊनच्या आड नक्षली मोठ्या प्रमाणात जमवाजमव करीत आहेत आणि बस्तर भागातच आणखी मोठे हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. नक्षलविरोधी मोहिमेवर लक्ष ठेवणाºया एका ज्येष्ठ अधिकाºयाने हा खुलासा केला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह नेपाळमधूनही नक्षलवादी एकत्र आले असून, त्यांच्या बैठका सुरू असल्याचेही या अधिकाºयाचे म्हणणे आहे.राज्यातील सर्वाधिक नक्षलग्रस्त समजल्या जाणाºया गडचिरोली जिल्ह्यातही अलीकडेच नक्षल्यांनी धुमाकूळ घातला होता. दुसरीकडे ओडिशात मात्र त्यांनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली आहे; पण ती कितपत पाळली जाईल सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी झाला आहे. बहुदा त्यामुळेच ही चळवळ थंडावली, असा समज शासनाने करून घेतला असावा; पण तो किती चुकीचा आहे याचा प्रत्यय या हल्ल्याने आणून दिलाय. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते; पण हा विचार अथवा चळवळीचे समूळ उच्चाटन अशक्य नसले तरी वाटते तेवढे सोपेहीे नाही. देशाच्या सीमेवर आणि आतही आणखी किती वर्षे जवानांचे हे मरणसत्र सुरू राहणार, हा प्रश्न आहे. अशा घटनांनी मनाचा संताप होतो, तसेच दहशतवाद आणि नक्षलवादाच्या या किडीवर कायमस्वरूपी काहीच उपाय होऊ शकत नाही याची अगतिकताही असते.गेल्या अनेक दशकांपासून केंद्र व राज्य सरकारांतर्फे नक्षल्यांच्या बीमोडाकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या. मोहिमा आखण्यात आल्या. त्यामुळे ही चळवळ खिळखिळी करण्यास नक्कीच हातभार लागला आहे, याबद्दल कुणाचे दुमत नाही; पण हे प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत. नक्षलवादाचा जन्म हा मुळात शोषणातून झाला आहे. त्यामुळे अशा नक्षलग्रस्त भागात सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्या लागणार आहेत. गडचिरोलीत मागील दोन-तीन वर्षांत स्थानिक लोकच नक्षल्यांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हा एक आशेचा किरण आहे. सरकार आणि सुरक्षा दलांच्या कुठल्याही मोहिमेपेक्षा जनक्षोभाचे अस्त्र रामबाण ठरणार हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त लोक विकासगंगेत कसे सहभागी होतील हे बघावे लागेल. नक्षली नव्हे, तर हा समाज, सरकार आपला सच्चा मित्र आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजवावी लागेल.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवादcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत