शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

कोरोना : गांभीर्य हरवू देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:32 PM

मिलिंद कुलकर्णी एखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी ...

मिलिंद कुलकर्णीएखादे संकट आले तरी त्याचा हसतहसत सामना करा, तुमचे मनोधैर्य कायम ठेवा, सकारात्मक रहा, म्हणजे संकटाचा यशस्वी मुकाबला करता येईल, असे तत्त्व सांगितले जाते. त्यात तथ्यांश आहे. परंतु, हे करीत असताना संकटाविषयीचे गांभीर्य कायम राहील, उपाययोजनांकडे दुर्लक्ष होणार नाही, सतर्क आणि सजग राहणे आवश्यक आहे, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनासंदर्भात सार्वजनिक आणि वैयक्तीक जीवनातील आमचे वर्तन आणि समाजमाध्यमातून व्यक्त होणारी अभिव्यक्ती पाहिली तर कुठे तरी गांभीर्य हरवत आहे, असे निश्चित वाटते.चिनपाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. अनेकांना प्राण गमवावे लागले. भारत हा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा देश असल्याने या संसर्गजन्य आजाराचा सर्वात मोठा धोका आपल्याला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक देशांशी विमानसेवेद्वारे थेट दळणवळण आहे. त्यामुळे महाराष्टÑात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींचे प्रमाण त्यात जास्त आहे. हा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने आणि प्रभावीपणे पावले उचलली आहेत.नागरिक म्हणून आता आमची जबाबदारी आहे की, हा आजार आणखी पसरु नये, वाढू नये. त्यादृष्टीने गर्दी होईल, अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे. रेल्वे आणि एस.टी.च्या फेऱ्या कमी करुन शासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच प्रवास करावा म्हणून बाध्य केले आहे. चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल, शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा उद्देश सामूहिकरीत्या संसर्ग होऊ नये, हाच आहे. आठवडेबाजार बंद ठेवायचा असतानाही जळगाव शहरातील पिंप्राळ्याचा आठवडे बाजार बुधवारी भरला. गर्दी कमी होती, पण बाजार भरलाच. नियम, निर्बंध आम्ही पाळायचे नाही, आणि साथ पसरली तर शासनाच्या नावाने खडे फोडायला आम्ही तयार असतो.कोरोनाला प्रतिबंध करणारी लस, औषधांवर संशोधन सुरु आहे. रामबाण उपाय अद्याप सापडलेला नाही. हे सगळेच देश सांगत असताना आम्ही मात्र काही देशी उपायांचा प्रचार आणि प्रसार करुन काय साध्य करु इच्छितो हे कळायला मार्ग नाही. समाजमाध्यमांचा यासाठी दुरुपयोग केला जात आहे. वेगवेगळे व्हीडिओ आणि संदेश तयार करुन दिशाभूल केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही ठळक बाबी स्पष्ट केल्या असताना असे घडत आहे.मास्क आणि सॅनिटायझरची अचानक टंचाई होणे हे स्वाभाविक आहे. अचानक आलेल्या आपत्तीमुळे असे घडू शकते. परंतु, त्याची उपलब्धता होण्यासाठी काही प्रयत्न होणे, पर्याय उपलब्ध होणे यासाठी हालचाली दिसून येत नाही. टंचाई निर्माण झाली की, स्वार्थी मंडळी त्याचा काळाबाजार करतात. यापेक्षा रासायनिक कारखाने, प्रयोगशाळा यांनी पर्यायी जंतुरोधक द्रव्य उपलब्ध करण्यास काही हरकत नाही. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे या बाबी क्लिष्ट असल्याने कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.भारतीय संस्कृती आणि पुराणात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, असा दावा प्रत्येकवेळी करण्याचे वेड अलिकडे वाढले आहे. विज्ञानाचा आधार, प्रयोगातून सिध्द झाल्याचा पुरावा असे काहीही न देता भारतीय पुराणात म्हटले आहे, म्हणजे ते खरेच असे हटवादीपणे म्हटले जाते. कोरोनाचे भाकीत ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी केल्याचे संदेश असेच प्रसारीत होत आहेत. कधी ते संत तुकारामांचे म्हटले जाते तर कधी रामदास स्वामींचे म्हटले जाते. अशा प्रकारांमधून घटनेचे गांभीर्य कमी होते, हे जितक्या लवकर आम्हाला कळेल, तो सुदिन म्हणावा लागेल. 

टॅग्स :Jalgaonजळगाव