शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
4
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
5
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
6
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
7
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
8
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
9
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
10
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
11
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
12
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
13
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
14
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
15
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
16
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
17
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
18
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
19
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
20
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट

मध्य प्रदेशमध्ये होतेय संविधानाची गळचेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 5:03 AM

मंत्रिमंडळ म्हणजे एकटे मुख्यमंत्री असे संविधानाला कदापि अभिप्रेत नाही, पण संविधान सोयीस्करपणे गुंडाळून ठेवणे हाच राजधर्म मानणाऱ्यांना अशी संवैधानिक बंधने पाळण्याचा काहीच विधिनिषेध नसतो.

मध्य प्रदेश हे राज्य भारताचे ‘हृदय’ असल्याचा टेंभा मिरवत असते, पण सध्या त्या राज्याच्या बाबतीत ‘कामातुराणाम् न भयम न लज्जा’ हे संस्कृत वचन बदलून ‘सत्तातुराणाम् न भयम न लज्जा’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. गेल्या मार्चमध्ये मध्य प्रदेशात सत्तेच्या सारीपाटाचा खेळ सुरू झाल्यापासून तेथे भारतीय संविधानाचे धिंडवडे सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेले कमलनाथ यांचे काँग्रेसचे सरकार भाजपाने आमदारांचा घोडेबाजार मांडून पाडले, पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारची अवस्था ‘बुडत्याचा पाय अधिक खोलात’, अशी झाली. चौथ्यांदा मुख्यमंत्री होऊनही चौहान यांना मंत्रिमंडळ स्थापन करता आले नाही. देशाप्रमाणे राज्यातही कोरोना महामारीचा हाहाकार सुरू झाला, पण मुख्यमंत्री चौहान एकांडी शिलेदाराप्रमाणे ४० दिवस काम करत राहिले. मध्य प्रदेशात संविधानावर घातला गेलेला हा पहिला घाला होता. संविधानानुसार राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात व त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करायचा असतो. मंत्रिमंडळ म्हणजे एकटे मुख्यमंत्री असे संविधानाला कदापि अभिप्रेत नाही. किंबहुना मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांखेरीज किमान १२ मंत्र्यांचे असायलाच हवे, असा संविधानाचा दंडक आहे, पण संविधान सोयीस्करपणे गुंडाळून ठेवणे हाच राजधर्म मानणाऱ्यांना अशी संवैधानिक बंधने पाळण्याचा काहीच विधिनिषेध नसतो. ज्यांनी संविधानाचे रक्षण करायचे व संविधानभंजकांना वठणीवर आणायचे अशा संवैधानिक पदांवरील व्यक्तीच जेव्हा यात सामील होतात तेव्हा संविधान गुंडाळून ठेवण्याची चटक लागते. मध्य प्रदेशमध्ये याचाच अनुभव येत आहे.

खरे तर मार्च हा नव्या वर्षाचे बजेट व वित्त विधेयक मंजूर करून घेण्याचा महिना. हे जर वेळेत केले नाही तर नव्या वर्षात सरकारकडे खर्चाला एकही पैसा नाही, अशी अवस्था येऊ शकते, पण मध्य प्रदेशात मार्चचा महिना सत्तेच्या सारीपाटात गेला. कमलनाथ सरकारला विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन भरविण्याचे धाडस झाले नाही. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच ते पायउतार झाल्यावर शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत मार्चची २१ तारीख उजाडली. त्यानंतर चारच दिवसात देशात ‘लॉकडाऊन’ सुरू झाले. संविधानाला चूड लावण्यासाठी चौहान यांच्या हाती हे आयते कोलित मिळाले. यानंतर संविधानावर न भूतो असा दुसरा घाला घातला गेला. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने एप्रिलपासूनच्या चार महिन्यांच्या खर्चासाठी लेखानुदानाचा वटहुकूम काढण्याचा सल्ला राज्यपालांना दिला. राज्यपाल लालजी टंडन यांनीही त्यानुसार वटहुकूम काढून आधीच शवपेटिकेत टाकलेल्या संविधानावर आणखी दोन खिळे ठोकले. एका वटहुकूमाने १.६ लाख कोटींचे लेखानुदान व विनियोजन मंजूर केले गेले, तर दुसºया वटहुकूमाने ४,४४३ कोटी रुपयांच्या नव्या कर्जउभारणीस मंजुरी दिली गेली. संसदीय लोकशाहीत संपूर्ण मंत्रिमंडळाचे विधिमंडळाशी सामुदायिक उत्तरदायित्व असते; परंतु या वटहुकूमांमुळे प्रस्थापित व्यवस्था बाजूला ठेवून राज्याच्या संचित निधीतून १.६ लाख कोटी रुपये काढून ते खर्च करण्याचे अधिकार एकट्या मुख्यमंत्र्यांना दिले गेले. देशाच्या इतिहासात एखाद्या राज्याचे बजेट असे वटहुकूमाने मंजूर केले जाण्याची ही पहिलीच घटना होती. असे करणे पूर्णपणे घटनाबाह्य आहे, असा अनेक घटनातज्ज्ञांचा आक्षेप आहे.मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या विवेक तन्खा व कपिल सिब्बल या दोन मुरब्बी वकिलांनी याविरुद्ध राष्ट्रपतींना पत्रही लिहिले; परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. संविधानाची व्यवस्था पाहिली तर असे दिसते की, राज्याचे बजेट विधिमंडळापुढे सादर करणे व ते मंजूर करून घेणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. बजेट किंवा कोणतेही वित्त विधेयक राज्यपालांच्या पूर्वसंमतीखेरीज विधिमंडळात मांडता येत नाही. विधिमंडळाच्या मंजुरीनंतरही राज्यपालांनी संमती दिल्यावरच राज्याच्या संचित निधीतून पैसे काढता येतात. थोडक्यात राज्याच्या संचित निधीचे राज्यपाल हे रखवालदार आहेत. तरीही संविधानाने लोकप्रतिनिधींच्या मंजुरीची तरतूद त्यात केली आहे. वटहुकूमाने हा टप्पा पूर्णपणे वगळला जातो. संविधानास हे बिलकूल अभिप्रेत नाही. संविधान लागू झाल्याच्या ७५ व्या वर्षात संविधानाची अशी घोर प्रतारणा व्हावी, ही खूप मोठी शोकांतिका आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliticsराजकारण