शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 17:20 IST

विविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु...

- धर्मराज हल्लाळेविविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु, हे सगळे शिकणे आणि शिकविण्यापुरतेच मर्यादित राहते की काय, असे वर्तन पाहून वाटते. आज भाषा, प्रांत भेद आणि त्याहूनही जाती, धर्म भेद एकमेकांच्या जीवावर उठला आहे, अशी अनेक उदाहरणे घडतात. तरीही सद्भावना आणि भाईचाराचा संदेश देऊन देशभर फिरणारे थोर गांधीवादी नेते डॉ.एस.एस. सुब्बाराव यांच्यासारखी थोर माणसे हा देश एकसंघ ठेवण्यासाठी आयुष्य देतात. देशाच्या कानाकोप-यात राष्ट्रीय एकात्मतेची शिबिरे, महोत्सव घेऊन सामाजिक सलोख्याचे बिजारोपण करण्याचे महत्कार्य डॉ. सुब्बाराव उर्फ भाईजी यांच्या हातून घडत आहे. असाच एक राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव महाराष्ट्रात विशेष म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या महोत्सवामध्ये देशातील १८ राज्यांमधून लहान मुले-मुली सहभागी झाले आहेत. महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम होतील, परंतु त्यापेक्षाही अधिक मोलाचा संदेश मिळणार आहे, तो म्हणजे सद्भावनेचा. आज तो अमूक जातीचा, तो त्या धर्माचा, माझी भाषा ही, त्याची भाषा वेगळी असे भेद शाळेतच अनुभवायला मिळतात. न कळत्या वयात मुले आई-बाबांना गंभीर प्रश्न विचारतात. तू कोणत्या धर्माचा, आपली जात कोणती? मुळातच हे सर्व प्रश्न सभोवतालचे वातावरण पाहून निर्माण होत आहेत. जात आणि धर्माच्या भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, त्यावर लिहिणे दूरच दोन शब्द बोलणेही अवघड बनले आहे. अशावेळी कोणी तरी ठणकावून सांगितले पाहिजे, आपण सर्वजण एक आहोत. जाती-धर्म वेगळे असले तरी मानव आहोत. तुमच्या आणि माझ्या धमण्यांमध्ये वाहणारे रक्त हे सारखेच आहे. माझी वेशभूषा वेगळी आहे. मी बोलतो ती भाषा वेगळी आहे, आमच्या या विविधतेत एकता नांदते हे शिकविले पाहिजे. ९० वर्षीय डॉ. सुब्बारावजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य या एकमेव मूल्यासाठी वाहिले आहे. महोत्सवाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या राज्यांतून आलेली वेगवेगळ्या जाती-धर्माची मुले लातूर शहरातील वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या घरांत वास्तव्याला राहणार आहेत. ज्या पालकांनी समोरचा मुलगा कोणत्या प्रांताचा आहे, कोणती भाषा बोलणार आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याचे पालकत्व स्वीकारले आहे, त्यांचे मनस्वी अभिनंदन. लातूरच्या विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि दिल्लीच्या राष्ट्रीय युवा योजनेने पेरलेला हा राष्ट्रीय विचार उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणारा आहे. जाती-धर्माचे श्रेष्ठत्व आणि गौणत्व विसरून आपण मानव आहोत, हा मूक संस्कार बाल मनांवर कायमचा या महोत्सवाने कोरला जाणार आहे.डॉ. एस.एन. सुब्बाराव यांना देशप्रेमाचे बाळकडू मिळाले आहे. बालवयातच त्यांनी तिरंगा ध्वज हाती घेऊन इंग्रजांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यानंतर सबंध आयुष्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकात्मतेसाठी दिले आहे. त्यांनी एक राष्ट्रीय विचार घेऊन चंबळचे खोरे पिंजून काढले. जिथे ६५४ डाकूंनी भाईजींसमोर आत्मसमर्पण केले. अशा व्यक्तिमत्वाचा सहवास लातूरसह देशभरातील मुलांना लाभणार आहे.  विशेष म्हणजे विविध जाती-धर्माच्या कुटुंबात वेगवेगळ्या प्रवाहातील मुले आणि मुली रमणार आहेत. महाराष्ट्रातील संस्कृती त्यांना अनुभवायला मिळेल. शिवाय, मुलांबरोबरच लातूरच्या पालकांनाही अन्य राज्यांतील बाल पाहुण्यांकडून त्यांच्या राज्यांची संस्कृती समजणार आहे. एक निश्चित आहे की, लातूरच्या पाचशे कुटुंबाचे देशाच्या विविध राज्यांत कायमचे नाते जोडले जाणार आहे. हा प्रयोग राष्ट्रीय एकात्मतेचे वायूमंडळ तयार करील. ज्याचा प्रभाव आणि परिणाम दीर्घकाळ देशाच्या कानाकोपऱ्यात दिसत राहील.

टॅग्स :Indiaभारत