शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

एक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 17:20 IST

विविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु...

- धर्मराज हल्लाळेविविधतेत एकतेचा नारा आपण नेहमी देतो. शाळेतील प्रतिज्ञा वर्षानुवर्षे आम्ही म्हटली. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही अभिमानाने म्हणतो. परंतु, हे सगळे शिकणे आणि शिकविण्यापुरतेच मर्यादित राहते की काय, असे वर्तन पाहून वाटते. आज भाषा, प्रांत भेद आणि त्याहूनही जाती, धर्म भेद एकमेकांच्या जीवावर उठला आहे, अशी अनेक उदाहरणे घडतात. तरीही सद्भावना आणि भाईचाराचा संदेश देऊन देशभर फिरणारे थोर गांधीवादी नेते डॉ.एस.एस. सुब्बाराव यांच्यासारखी थोर माणसे हा देश एकसंघ ठेवण्यासाठी आयुष्य देतात. देशाच्या कानाकोप-यात राष्ट्रीय एकात्मतेची शिबिरे, महोत्सव घेऊन सामाजिक सलोख्याचे बिजारोपण करण्याचे महत्कार्य डॉ. सुब्बाराव उर्फ भाईजी यांच्या हातून घडत आहे. असाच एक राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव महाराष्ट्रात विशेष म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या महोत्सवामध्ये देशातील १८ राज्यांमधून लहान मुले-मुली सहभागी झाले आहेत. महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम होतील, परंतु त्यापेक्षाही अधिक मोलाचा संदेश मिळणार आहे, तो म्हणजे सद्भावनेचा. आज तो अमूक जातीचा, तो त्या धर्माचा, माझी भाषा ही, त्याची भाषा वेगळी असे भेद शाळेतच अनुभवायला मिळतात. न कळत्या वयात मुले आई-बाबांना गंभीर प्रश्न विचारतात. तू कोणत्या धर्माचा, आपली जात कोणती? मुळातच हे सर्व प्रश्न सभोवतालचे वातावरण पाहून निर्माण होत आहेत. जात आणि धर्माच्या भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, त्यावर लिहिणे दूरच दोन शब्द बोलणेही अवघड बनले आहे. अशावेळी कोणी तरी ठणकावून सांगितले पाहिजे, आपण सर्वजण एक आहोत. जाती-धर्म वेगळे असले तरी मानव आहोत. तुमच्या आणि माझ्या धमण्यांमध्ये वाहणारे रक्त हे सारखेच आहे. माझी वेशभूषा वेगळी आहे. मी बोलतो ती भाषा वेगळी आहे, आमच्या या विविधतेत एकता नांदते हे शिकविले पाहिजे. ९० वर्षीय डॉ. सुब्बारावजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य या एकमेव मूल्यासाठी वाहिले आहे. महोत्सवाची खासियत म्हणजे वेगवेगळ्या राज्यांतून आलेली वेगवेगळ्या जाती-धर्माची मुले लातूर शहरातील वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या घरांत वास्तव्याला राहणार आहेत. ज्या पालकांनी समोरचा मुलगा कोणत्या प्रांताचा आहे, कोणती भाषा बोलणार आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता त्याचे पालकत्व स्वीकारले आहे, त्यांचे मनस्वी अभिनंदन. लातूरच्या विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि दिल्लीच्या राष्ट्रीय युवा योजनेने पेरलेला हा राष्ट्रीय विचार उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणारा आहे. जाती-धर्माचे श्रेष्ठत्व आणि गौणत्व विसरून आपण मानव आहोत, हा मूक संस्कार बाल मनांवर कायमचा या महोत्सवाने कोरला जाणार आहे.डॉ. एस.एन. सुब्बाराव यांना देशप्रेमाचे बाळकडू मिळाले आहे. बालवयातच त्यांनी तिरंगा ध्वज हाती घेऊन इंग्रजांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यानंतर सबंध आयुष्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन एकात्मतेसाठी दिले आहे. त्यांनी एक राष्ट्रीय विचार घेऊन चंबळचे खोरे पिंजून काढले. जिथे ६५४ डाकूंनी भाईजींसमोर आत्मसमर्पण केले. अशा व्यक्तिमत्वाचा सहवास लातूरसह देशभरातील मुलांना लाभणार आहे.  विशेष म्हणजे विविध जाती-धर्माच्या कुटुंबात वेगवेगळ्या प्रवाहातील मुले आणि मुली रमणार आहेत. महाराष्ट्रातील संस्कृती त्यांना अनुभवायला मिळेल. शिवाय, मुलांबरोबरच लातूरच्या पालकांनाही अन्य राज्यांतील बाल पाहुण्यांकडून त्यांच्या राज्यांची संस्कृती समजणार आहे. एक निश्चित आहे की, लातूरच्या पाचशे कुटुंबाचे देशाच्या विविध राज्यांत कायमचे नाते जोडले जाणार आहे. हा प्रयोग राष्ट्रीय एकात्मतेचे वायूमंडळ तयार करील. ज्याचा प्रभाव आणि परिणाम दीर्घकाळ देशाच्या कानाकोपऱ्यात दिसत राहील.

टॅग्स :Indiaभारत