शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

साक्षीभूत मन

By admin | Updated: January 13, 2015 02:39 IST

सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते.

‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।।’असे तुकोबांनी म्हटले आहे. या एका कडव्यात विचारांचा फार मोठा भरणा आहे. सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते. बौद्धिक पातळीवर हा खेळ खेळला जातो. आजची सकाळ प्रसन्न आहे असे एकाने म्हटल्यावर फारशी चांगली नाही असे दुसरा म्हणू शकतो. ही सापेक्षता. वास्तव सापेक्षतेच्या पलीकडे असू शकते. हवामानदृष्ट्या सकाळ निश्चित करणे हे वास्तव. हे शास्त्रीय वास्तव असते. अशा शास्त्रीयतेची कसोटी मनामुळे लागते. याला शास्त्रकाट्याची कसोटी म्हटले तरी चालेल. सत्य हेच आणि असत्य हेच असा ठामपणाचा निर्णय मन करू शकते. पण असे का होत नाही? कारण मतामतांच्या गलबल्यामध्ये मन डळमळीत होते किंवा बहुमताच्या बाजूला झुकते. मनाची दोलायमान अवस्था घालवणे, मनावरच अवलंबून असते. यासाठी मनाला ग्वाही करणे आवश्यक असते. साक्षीभूत मन निर्णय करून बसलेले असते; पण बहुमतांच्या रेट्यामुळे ते हेलकावते.मानवाच्या अंत:शक्तीचा हा उद्घोष आहे. कोणावर अवलंबून न राहता निर्णय करण्याची शक्ती प्रत्येकाच्या ठायी असते. कोणाला चटकन निर्णय करता येतो, कोणाला शांत चित्ताने विचार करून निर्णय करावा लागतो. पण मनाच्या ठायी निर्णायक शक्ती आहेच. तटस्थ राहाणे हाही मनाचा निर्णय असतो. पण तो परिस्थितीच्या संदर्भात असतो. आत्मपातळीवर मनाचा कौल हा निर्णायक असतो. हे शास्त्रीय तत्त्व तुकोबांनी मांडून मानव संसाधनाच्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. प्रत्येक व्यक्तीने मनाला साक्षीभूत केले, तर कित्येक अनवस्था प्रसंग टळतील. जन आणि मन हे द्वंद्व आहे. जनासाठी वर्तन वेगळे व मनासाठी वेगळे अशी कसरत करावी लागते. पण मनासाठी वर्तन हे आपल्या जगण्याला सार्थ करणारे ठरते, हे मात्र खरे !मनाचा अबलख वारू त्याच्या कलाने दौडत नाही, तर त्याला दौडायला लावणाऱ्या प्रेरणांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सामान्य व्यक्तीच्या संदर्भात बहुमतांचा दाब कारणीभूत ठरतो; तर विचारी व्यक्तीच्या संदर्भात बुद्धीचा दबाव प्रेरक ठरतो. विवेकी व्यक्तीच्या संदर्भात ह्या दोन्ही धोक्यांचा प्रश्न उद्भवत नाही. सत्य आणि असत्याला ग्वाही असणारे मन साक्षीभूत अर्थात विवेकी असते.