शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

साक्षीभूत मन

By admin | Updated: January 13, 2015 02:39 IST

सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते.

‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।।’असे तुकोबांनी म्हटले आहे. या एका कडव्यात विचारांचा फार मोठा भरणा आहे. सत्य आणि असत्य यांच्याबाबत निर्णय करणे ही प्रक्रिया सापेक्ष ठरते. एकाला जे सत्य वाटते ते दुस-याला असत्य वाटते. बौद्धिक पातळीवर हा खेळ खेळला जातो. आजची सकाळ प्रसन्न आहे असे एकाने म्हटल्यावर फारशी चांगली नाही असे दुसरा म्हणू शकतो. ही सापेक्षता. वास्तव सापेक्षतेच्या पलीकडे असू शकते. हवामानदृष्ट्या सकाळ निश्चित करणे हे वास्तव. हे शास्त्रीय वास्तव असते. अशा शास्त्रीयतेची कसोटी मनामुळे लागते. याला शास्त्रकाट्याची कसोटी म्हटले तरी चालेल. सत्य हेच आणि असत्य हेच असा ठामपणाचा निर्णय मन करू शकते. पण असे का होत नाही? कारण मतामतांच्या गलबल्यामध्ये मन डळमळीत होते किंवा बहुमताच्या बाजूला झुकते. मनाची दोलायमान अवस्था घालवणे, मनावरच अवलंबून असते. यासाठी मनाला ग्वाही करणे आवश्यक असते. साक्षीभूत मन निर्णय करून बसलेले असते; पण बहुमतांच्या रेट्यामुळे ते हेलकावते.मानवाच्या अंत:शक्तीचा हा उद्घोष आहे. कोणावर अवलंबून न राहता निर्णय करण्याची शक्ती प्रत्येकाच्या ठायी असते. कोणाला चटकन निर्णय करता येतो, कोणाला शांत चित्ताने विचार करून निर्णय करावा लागतो. पण मनाच्या ठायी निर्णायक शक्ती आहेच. तटस्थ राहाणे हाही मनाचा निर्णय असतो. पण तो परिस्थितीच्या संदर्भात असतो. आत्मपातळीवर मनाचा कौल हा निर्णायक असतो. हे शास्त्रीय तत्त्व तुकोबांनी मांडून मानव संसाधनाच्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. प्रत्येक व्यक्तीने मनाला साक्षीभूत केले, तर कित्येक अनवस्था प्रसंग टळतील. जन आणि मन हे द्वंद्व आहे. जनासाठी वर्तन वेगळे व मनासाठी वेगळे अशी कसरत करावी लागते. पण मनासाठी वर्तन हे आपल्या जगण्याला सार्थ करणारे ठरते, हे मात्र खरे !मनाचा अबलख वारू त्याच्या कलाने दौडत नाही, तर त्याला दौडायला लावणाऱ्या प्रेरणांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सामान्य व्यक्तीच्या संदर्भात बहुमतांचा दाब कारणीभूत ठरतो; तर विचारी व्यक्तीच्या संदर्भात बुद्धीचा दबाव प्रेरक ठरतो. विवेकी व्यक्तीच्या संदर्भात ह्या दोन्ही धोक्यांचा प्रश्न उद्भवत नाही. सत्य आणि असत्याला ग्वाही असणारे मन साक्षीभूत अर्थात विवेकी असते.