शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

‘काँग्रेस हाच पर्याय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:11 AM

मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरेल हे शरद पवारांचे भाकीत जेवढे खरे तेवढेच ते मरगळलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे.

मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरेल हे शरद पवारांचे भाकीत जेवढे खरे तेवढेच ते मरगळलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. देशातील अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांची सरकारे सत्तारूढ आहेत. मात्र कितीही प्रयत्न केले आणि केवढ्याही दंडबैठका मारल्या तरी मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षाला, मायावतींच्या बसपाला, पटनायकांच्या बिजू (द)ला, नितीशकुमारांच्या जदला किंवा दक्षिणेतील द्रमुक, अण्णाद्रमुक, तेलंगण राष्टÑ समितीला, तेलगू देसमला, शिवसेना व खुद्द पवारांच्या राष्टÑवादी काँग्रेसला कधी अखिल भारतीय होता येणार नाही. ते डाव्यांना जमणारे नाही आणि अकाली दल किंवा नॅशनल कॉन्फरन्स वा मुफ्तींच्या पीडीपीलाही ते त्याच्या नैसर्गिक मर्यादांमुळे जमणार नाही. काँग्रेस पक्ष आज पराभूत अवस्थेत असला तरी त्याचे कार्यकर्ते व चाहते गावोगावी व खेडोपाडी आहेत. त्याचा इतिहास व त्यातील नौरोजी ते नेहरूंपर्यंतच्या नेत्यांची कर्तबगारी कुणाला पुसून टाकता येणारी नाही. शिवाय राहुल गांधींच्या स्वरूपात त्या पक्षाला राष्टÑीय पातळीवर तरुण नेतृत्व लाभले आहे आणि ज्योतिरादित्य शिंदे किंवा सचिन पायलट यांच्यासारख्या तरुणांनी त्यांची राज्यपातळीवरील धुराही चांगलीच सांभाळली आहे. पराभवाची मरगळ जायला काही काळ जाणे भाग असले तरी ती जायला सुरुवातही झाली आहे. मोदींचे सरकार आर्थिक आघाडीवर मोठ्या घोषणा व गर्जना करीत असले तरी त्या जमिनीवर उतरताना दिसत नाहीत आणि देशाची सामाजिक स्थिती उंचावली असली तरी तिने त्यांच्यातील विषमतेची दरीच अधिक रुंदावली आहे. याच काळात देशातील अल्पसंख्य, दलित व अन्य मोठे समाजवर्ग सरकारविरुद्ध संघटित झाले आहेत आणि भाजपाला संघाने दिलेल्या एकारलेल्या धार्मिकतेची जोड त्या पक्षाला टीकेचे लक्ष्यही बनविणारी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता व बंधुतेसारखी मूल्ये धर्माचे नावे सांगत तुडविली जाताना दिसली आहे. या बाबी सामान्य नागरिकांवरही परिणाम करणाºया आहेत. त्याचमुळे पवारांचे भाकीत सत्याच्या व भविष्याच्या जवळ जाणारे आहे. पवारांनी ही मुलाखत मनसेच्या राज ठाकरे यांना दिली. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला २५ हजारांहून अधिक श्रोते व प्रेक्षक हजर होते. ही बाब पवारांचे सत्तेत नसतानाचेही जनमानसातील वजन व मोठेपण अधोरेखित करणारी आहे. गेली ६० वर्षे महाराष्टÑ व देश यात राजकारण करणाºया पवारांचा अनुभव व आकलन राष्टÑव्यापी आहे. त्याच बळावर त्यांनी या मुलाखतीत मोदींना चार खडे बोल सुनावले आहेत. ‘आपण देशाचे पंतप्रधान आहोत, गुजरातचे मुख्यमंत्री नाहीत ही गोष्ट मोदी अजून लक्षात घेत नाहीत’, असे सांगताना कोणत्याही विदेशी पाहुण्याला मिठी मारण्याचे त्यांचे वर्तन व पुढे त्याला फक्तअहमदाबादला नेण्याचे धोरण त्यांच्या या ‘प्रादेशिक’ दृष्टीवर प्रहार करणारे आहे असे ते म्हणाले आहेत. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सहकारी बँकांचे कंबरडे मोडले, सहकारी उद्योगांचे क्षेत्र मोडीत काढले, त्याच्या नोटाबंदीमुळे गरीब माणूस नागवला गेला, त्याच्या जुन्या नोटांचा परतावा त्याला अद्याप सर्वत्र मिळाला नाही. जीएसटीच्या माºयाने व्यापारी वर्ग जेरीला आला आहे आणि आता त्यात नवनव्या आर्थिक घोटाळ्यांची भर पडत आहे असे सांगून पवार म्हणाले, दरवेळी जुन्या मनमोहनसिंग सरकारला व काँग्रेसच्या राजवटीला बोल लावून मोदींना व भाजपाला स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. आपल्या नाकर्तेपणाचे खापर जुन्यांच्या माथ्यावर फोडत राहण्याच्या त्यांच्या उद्योगातील फोलपण आता लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. पवारांच्या या मुलाखतीने व त्यातील स्पष्टोक्तीने त्यांची यापुढची वाटचाल कशी असेल हेही जनतेला दाखविले आहे. काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येणे अवघड नाही व त्यांना संयुक्तपणे भाजपाला पराभूत करणेही जमणारे आहे, हा त्यांचा राज्याला व देशाला सांगावा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस